ETV Bharat / state

अनिश्चित पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; हवामान अंदाजाची तारीख पे तारीख

शेतकरी सध्या मान्सूनच्या प्रतिक्षेत आहे. भातशेती हंगाम ही वेळेत साधता येणार नाही. त्यामुळे बळीराजा सध्या द्विधा मनस्थितीत अडकला आहे. मान्सुनबाबत हवामान खातेही बेभरवशाचा झाला आहे. त्यांच्याकडूनही पावसाबाबत तारीख पे तारीख असा प्रकार सुरू आहे.

author img

By

Published : Jun 24, 2019, 10:56 PM IST

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

पालघर (वाडा) - मान्सूनच्या प्रतिक्षेने क्षीण झालेला बळीराजा अखेर आज खरीप हंगामातील भात पिकाच्या पेरणीला सुरुवात केली आहे. लांबणीवर जाणारा शेती हंगाम वेळेत साधता यावा, यासाठी पालघर जिल्ह्यातील शेतकरी वर्ग पेरणीच्या हंगामाला सुरुवात केली आहे. पण पावसाच्या बेभरवशाचा फटका बसत असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील शेतकरीवर्ग भातशेती हंगामासाठी मान्सून पुर्वकाळात बी -बियाणांची, खते, शेती अवजारे आणि मजूर मार्गाच्या शोधात असतो. या सर्व बाबींची जुळवाजुळव करून बियाणे पेरणीची कामे हाती घेत असतो. पारंपरिक पद्धतीने वा आधुनिक यंत्राच्या साहाय्याने शेतजमीन नांंगरत असतो. यावेळी पावसाचा अंदाज काही हवामान खात्याला सापडत नाही. आज येईल दोन दिवसांत येईल या आशेने तर पाऊस पडला तर ठीक नाहीतर पेरलेलं पीक पावसाअभावी करपून जाऊ शकते? जास्त पावसात पेरणी करता येणार नाही.आणि भातशेती हंगाम ही वेळेत साधता येणार नाही. त्यामुळे बळीराजा सध्या द्विधा मनस्थितीत अडकला आहे. मान्सुनबाबत हवामान खातेही बेभरवशाचा झाला आहे. त्यांच्याकडूनही पावसाबाबत तारीख पे तारीख असा प्रकार सुरू आहे.

सलग तीन दिवस २५ मिमी पाऊस पडला असेल आणि जमीनीतून वाफसा येत असेल शेतकरी वर्गाने पेरणी करायला हरकत नाही. असे वाडा तालुक्यातील कृषी अधिकारी ए. हासे यांनी सांगितले आहे.

यावर पाऊसच पडत नाही तर पेरणी कशी करू? आणि पेरले तर ते पावसाअभावी मरुन जाईल, अशा परिस्थितीत पावसाची वाट पहाण्याशिवाय शेतकरीवर्गाकडे पर्याय नसल्याचे सुनील हरड या शेतकऱ्याने सांगितले.

पालघर (वाडा) - मान्सूनच्या प्रतिक्षेने क्षीण झालेला बळीराजा अखेर आज खरीप हंगामातील भात पिकाच्या पेरणीला सुरुवात केली आहे. लांबणीवर जाणारा शेती हंगाम वेळेत साधता यावा, यासाठी पालघर जिल्ह्यातील शेतकरी वर्ग पेरणीच्या हंगामाला सुरुवात केली आहे. पण पावसाच्या बेभरवशाचा फटका बसत असल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील शेतकरीवर्ग भातशेती हंगामासाठी मान्सून पुर्वकाळात बी -बियाणांची, खते, शेती अवजारे आणि मजूर मार्गाच्या शोधात असतो. या सर्व बाबींची जुळवाजुळव करून बियाणे पेरणीची कामे हाती घेत असतो. पारंपरिक पद्धतीने वा आधुनिक यंत्राच्या साहाय्याने शेतजमीन नांंगरत असतो. यावेळी पावसाचा अंदाज काही हवामान खात्याला सापडत नाही. आज येईल दोन दिवसांत येईल या आशेने तर पाऊस पडला तर ठीक नाहीतर पेरलेलं पीक पावसाअभावी करपून जाऊ शकते? जास्त पावसात पेरणी करता येणार नाही.आणि भातशेती हंगाम ही वेळेत साधता येणार नाही. त्यामुळे बळीराजा सध्या द्विधा मनस्थितीत अडकला आहे. मान्सुनबाबत हवामान खातेही बेभरवशाचा झाला आहे. त्यांच्याकडूनही पावसाबाबत तारीख पे तारीख असा प्रकार सुरू आहे.

सलग तीन दिवस २५ मिमी पाऊस पडला असेल आणि जमीनीतून वाफसा येत असेल शेतकरी वर्गाने पेरणी करायला हरकत नाही. असे वाडा तालुक्यातील कृषी अधिकारी ए. हासे यांनी सांगितले आहे.

यावर पाऊसच पडत नाही तर पेरणी कशी करू? आणि पेरले तर ते पावसाअभावी मरुन जाईल, अशा परिस्थितीत पावसाची वाट पहाण्याशिवाय शेतकरीवर्गाकडे पर्याय नसल्याचे सुनील हरड या शेतकऱ्याने सांगितले.

Intro:
पावसाच्या वाटेने क्षीणला बळीराजा

पेरणी बरोबर पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट?

हवामान अंदाजाची तारीख पे तारीख?

पालघर (वाडा) संतोष पाटील

मान्सुनच्या प्रतिक्षेने क्षीण झालेला बळीराजा आज घडीला खोळंबली खरीप हंगामातील भात पिकाची पेरणी सुरु केली आहे.लांबणीवर जाणारा शेती हंगाम वेळेत साधता यावा यासाठी पालघर जिल्ह्यातील शेतकरी वर्ग पेरणी हंगामाची सुरुवात केली आहे.
पण पावसाच्या बेभरवशाचा फटका हा शेतकरी वर्गाला दुबार पेरणी संकटाची भीती त्याच्या मनाला शीवू लागलीय.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील शेतकरीवर्ग
भातशेती हंगामासाठी मान्सून पुर्वकाळात बी -बियाणांची ,खते,शेती अवजारे आणि मजूर वर्गाची शोध मोहीम हाती घेत असतो.
या सर्व बाबींची जुळवाजुळव करून बियाणांची पेरणी कामे हाती घेत असतो.
पारंपरिक पद्धतीने वा आधुनिक यंत्राच्या साहाय्याने शेतजमीन नांंगरत असतो.
यावेळी पावसाचा अंदाज काही हवामान खात्याला सापडत नाही. आज येईल दोन दिवसांत येईल या आशेने तर पाऊस पडला तर ठीक नाहीतर पेरलेलं पीक पावसाअभावी करपून मरून जाऊ शकते? जास्त पावसात पेरणी करता येणार नाही.आणि भातशेती हंगाम ही वेळेत साधता येणार नाही. अशा द्विधा मनस्थिती अडकला आहे.
मान्सुन बाबत हवामान खात्याकडूनही अंदाजाची तारीख पे तारीख असा प्रकाराने आशाळभूत शेतक-याला पावसाची आस लागलीय.

प्रतिक्रिया-
सलग तीन दिवस 25 मिमी पाऊस पडला असेल आणि जमीनीतून वाफसा येत असेल शेतकरी वर्गाने पेरणी करायला हरकत नाही.
ए.हासे
वाडा तालुका कृषी अधिकारी

प्रतिक्रिया
पाऊसच पडत नाही तर पेरणी कशी करू? आणि पेरले तर ते पावसाअभावी मरुन जाईल अशा परिस्थितीत पावसाची वाट पहाण्या शिवाय शेतकरीवर्गाकडे पर्याय नाही.
सुनिल हरड
शेतकरी






Body:मान्सुनच्या प्रतिक्षेने क्षीण झालेला बळीराजा आज घडीला खोळंबली खरीप हंगामातील भात पिकाची पेरणी सुरु केली आहे.लांबणीवर जाणारा शेती हंगाम वेळेत साधता यावा यासाठी पालघर जिल्ह्यातील शेतकरी वर्ग पेरणी हंगामाची सुरुवात केली आहे.
पण पावसाच्या बेभरवशाचा फटका हा शेतकरी वर्गाला दुबार पेरणी संकटाची भीती त्याच्या मनाला शीवू लागलीय.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील शेतकरीवर्ग
भातशेती हंगामासाठी मान्सून पुर्वकाळात बी -बियाणांची ,खते,शेती अवजारे आणि मजूर वर्गाची शोध मोहीम हाती घेत असतो.
या सर्व बाबींची जुळवाजुळव करून बियाणांची पेरणी कामे हाती घेत असतो.
पारंपरिक पद्धतीने वा आधुनिक यंत्राच्या साहाय्याने शेतजमीन नांंगरत असतो.
यावेळी पावसाचा अंदाज काही हवामान खात्याला सापडत नाही. आज येईल दोन दिवसांत येईल या आशेने तर पाऊस पडला तर ठीक नाहीतर पेरलेलं पीक पावसाअभावी करपून मरून जाऊ शकते? जास्त पावसात पेरणी करता येणार नाही.आणि भातशेती हंगाम ही वेळेत साधता येणार नाही. अशा द्विधा मनस्थिती अडकला आहे.
मान्सुन बाबत हवामान खात्याकडूनही अंदाजाची तारीख पे तारीख असा प्रकाराने आशाळभूत शेतक-याला पावसाची आस लागलीय.






Conclusion:z
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.