पालघर - डहाणू तालुक्यातील धरमपूर झिरवापाडा येथील धर्मा जाधव (वय-50) या शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
यंदा परतीचा पाऊस लांबल्याने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळेच धर्मा जाधव हे मागील काही दिवसांपासून नैराश्यात होते. त्यातूनच आत्महत्या केल्याची माहिती जाधव कुटुंबीयांनी दिली आहे.
या आत्महत्याप्रकरणी कासा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. त्यांच्या पाठीमागे पत्नी व एक मुलगा आहे.