पालघर- वसईमध्ये पाण्याचा व्हॉल्व फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. वसई पूर्वेकडील भोयदा पाडा नाका येथे ही पाण्याच्या पाईपलाईनचा व्हॉल्व फुटला आहे. ऐन वर्दळीच्या ठिकाणी ही गळती सुरू झाल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
वसई पूर्वेकडील भोयदा पाडा नाका येथे शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या पाईपलाईनचा व्हॉल्व फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. वसई विरार महानगरपालिकेची पाणीपुरवठा करणारी ही पाईपलाईन आहे. पाईपलाईनचा व्हॉल्व फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात कळवले असता, कोणीही फिरकले नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. ऐन वर्दळीच्या ठिकाणी पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.