ETV Bharat / state

उस्मानाबादेत पाणीटंचाईबरोबर नारळाच्या पाण्याचीही टंचाई

author img

By

Published : Jul 26, 2019, 10:50 PM IST

Updated : Jul 26, 2019, 11:16 PM IST

केरळ आणि कर्नाटक राज्यात पडणाऱ्या पावसामुळे सध्या उस्मानाबादेत शहाळांची टंचाई जाणवू लागली आहे.

उस्मानाबादेत पाणीटंचाईबरोबर नारळाच्या पाण्याचीही टंचाई

उस्मानाबाद - जिल्ह्यात सध्या प्रचंड पाणीटंचाई आहे. यासोबत आता नारळाच्या पाण्याची टंचाईदेखील जाणवू लागली आहे. केरळ आणि कर्नाटक राज्यात पडणाऱ्या पावसामुळे ही टंचाई भासू लागली आहे.

उस्मानाबादेत पाणीटंचाईबरोबर नारळाच्या पाण्याचीही टंचाई

वजन कमी करण्यासाठी, उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी नारळाच्या पाण्याला जास्त मागणी असते. त्याचबरोबर रुग्णालाही नारळाचे पाणी दिले जाते. नारळाचे पाणी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. मात्र, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शहाळांची टंचाई भासू लागली आहे. कर्नाटक, केरळ राज्यात सध्या पाऊस सुरू आहे. पाऊस पडल्यानंतर झाडावर चढणे अवघड होते. त्यामुळे नारळ काढता येत नाही. याचा परिणाम शहाळ्याच्या उत्पादनावर होत आहे.

उस्मानाबादमध्ये ८ दिवसाला कमीत कमी दोन ट्रक शहाळे येतात. शहरातील अप्पा चांदणे हे शहाळ्याचे होलसेल व्यापारी आहेत. त्यांच्याकडूनच इतर ठिकाणी शहाळे विकली जातात. तर आज घडीला चांदणे यांच्याकडे फक्त १०० शहाळे शिल्लक आहेत. त्यामुळे जर उद्या नारळाचा ट्रक आला नाही तर रुग्ण आणि शहाळे शौकिनांची नारळाच्या पाण्यासाठी पंचाईत होण्याची स्थिती आहे.

उस्मानाबाद - जिल्ह्यात सध्या प्रचंड पाणीटंचाई आहे. यासोबत आता नारळाच्या पाण्याची टंचाईदेखील जाणवू लागली आहे. केरळ आणि कर्नाटक राज्यात पडणाऱ्या पावसामुळे ही टंचाई भासू लागली आहे.

उस्मानाबादेत पाणीटंचाईबरोबर नारळाच्या पाण्याचीही टंचाई

वजन कमी करण्यासाठी, उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी नारळाच्या पाण्याला जास्त मागणी असते. त्याचबरोबर रुग्णालाही नारळाचे पाणी दिले जाते. नारळाचे पाणी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. मात्र, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शहाळांची टंचाई भासू लागली आहे. कर्नाटक, केरळ राज्यात सध्या पाऊस सुरू आहे. पाऊस पडल्यानंतर झाडावर चढणे अवघड होते. त्यामुळे नारळ काढता येत नाही. याचा परिणाम शहाळ्याच्या उत्पादनावर होत आहे.

उस्मानाबादमध्ये ८ दिवसाला कमीत कमी दोन ट्रक शहाळे येतात. शहरातील अप्पा चांदणे हे शहाळ्याचे होलसेल व्यापारी आहेत. त्यांच्याकडूनच इतर ठिकाणी शहाळे विकली जातात. तर आज घडीला चांदणे यांच्याकडे फक्त १०० शहाळे शिल्लक आहेत. त्यामुळे जर उद्या नारळाचा ट्रक आला नाही तर रुग्ण आणि शहाळे शौकिनांची नारळाच्या पाण्यासाठी पंचाईत होण्याची स्थिती आहे.

Intro:हे pkg पाठवत आहे व्हिओ द्यावा. ही खालील स्क्रिफ्ट ही pkg ची आहे व body मध्ये बातमीची ची स्क्रिफ्ट पाठवत आहेत


उस्मानाबादेत पिण्याच्या पाणी टंचाई बरोबर नारळाच्या पाण्याची टंचाई भासू लागली

अँकर - जिल्ह्यात सध्या प्रचंड पाणीटंचाई आहे या टंचाई सोबत आता नारळाच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे सर्वांच्या आवडीचे असलेले नारळ पाणी जिल्ह्यात मिळतच नाहीये त्याचं कारणही असंच आहे कर्नाटक, केरळ राज्यात पाऊस सुरू असल्यामुळे सध्या शहाळी टंचाई भासू लागली आहे

byte - प्रा.दापके ( ग्राहक )

byte- महिला ( ग्राहक )

व्हिओ - वजन कमी करण्यासाठी नारळाच्या पाण्याला मागणी जास्त असते त्याचबरोबर रुग्णालाही नारळाचे पाणी दिले जाते नारळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम असते उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी नारळाचे पाणी पितात मात्र सध्या सुरू असलेल्या पावसामुळे नारळ टंचाई भासू लागली आहे पाऊस पडल्यानंतर नारळाच्या झाडावर चढणे अवघड होतं त्यामुळे नारळ तोडता येत नाही आणि यातूनच उत्पादन घटले आहे आणि याचा फटका नारळ शौकिनांना बसतो आहे

byte -अप्पा चांदणे ( शहाळ्याचे होलसेल व्यापारी )

व्हिओ - उस्मानाबाद मध्ये आठ दिवसाला कमीत कमी दोन ट्रक शहाळे येतात शहरातील अप्पा चांदणे हे शहाळ्याचे होलसेल व्यापारी आहेत यांच्याकडूनच इतर ठिकाणी शहाळे विकली जातात आज घडीला चांदणे यांच्याकडेच फक्त शंभर शहाळे आहेत त्यामुळे जर उद्या नारळाचा ट्रक आला नाही तर उद्यापासून रुग्णांना आणि शहाळे शौकिनांची या पाण्यासाठी की पंचाईत होईल


Body:उस्मानाबाद - पाणीटंचाई बरोबरच आता शहरात शाहाळेची टंचाई भासू लागली आहे केरळ कर्नाटक राज्यात पडणाऱ्या पावसामुळे ही टंचाई भासू लागली असून पाऊस पडल्यानंतर झाडावर चढणे अवघड होते त्यामुळे नारळ करता येत नाहीत आणि याचा परिणाम शहाळ्याच्या उत्पादनावर होतो आहे शहरात गेली आठ दिवसापासून शाळेचा ट्रक आलेला नाही आज घडीला जिल्ह्यातील होलसेल व्यापारी अप्पा चांदणे यांच्याकडे फक्त शंभर शाहाळे शिल्लक होते केरळ व कर्नाटक राज्यातील पाऊस कमी होऊन उन पडल्यानंतरच नारळाच्या झाडावर चढणे सोपे होईल आणि त्यानंतरच शहाळ्याचे उत्पादन घेता येईल तोपर्यंत शाहाळे शौकिनांना आणि रुग्णांना नारळाच्या पाण्या वाचूनच दिवस काढावे लागते


Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
Last Updated : Jul 26, 2019, 11:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.