ETV Bharat / state

साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात, आज अचलबेटवरून निघणार साहित्याची ज्योत

साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार असून ग्रंथप्रदर्शन, तुळजापूर, पारंपरिक गोंधळ, कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, कथा-कथन, कवी कट्टी, बालकुमार मेळावा, असे विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

author img

By

Published : Jan 3, 2020, 8:15 AM IST

Updated : Jan 3, 2020, 11:27 AM IST

93 akhil bhartiy marathi sahitya sammelan
साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

उस्मानाबाद - येत्या १० जानेवारीला सुरू होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरदार सुरू आहे. संत गोरोबाकाका साहित्यनगरी येथे हे संमेलन होणार आहे. यानिमित्त आज (३ जानेवारी) ला संमेलनाच्या जनजागृतीसाठी साहित्याची ज्योत निघणार असून अचलबेट येथून या ज्योतीची सुरुवात होणार आहे. त्याचा समारोप ४ जानेवारीला उस्मानाबाद येथे होणार असल्याचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी सांगितले.

साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार असून ग्रंथप्रदर्शन, तुळजापूर, पारंपारिक गोंधळ, कवी संमेलन, सांस्कृतीक कार्यक्रम, कथा-कथन, कवी कट्टी, बालकुमार मेळावा, असे विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. संमेलनासाठी ३ सभा मंडपाची उभारणी सुरू असून या सभामंडपाना शाहीर अमर शेख, दत्तो आप्पा तुळजापूरकर, सेतू माधव पगडी यांची नावे देण्यात आली आहेत.

हे वाचलं का? - ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, तयारीत चिमुकल्यांचा हातभार

तुळजाभवानीचे मंदिर आणि रूप असलेल्या देखाव्यासह भाई उद्धवराव पाटील यांच्या नावाने संमेलनाचे प्रवेशव्दार उभारण्यात येणार आहे. या संमेलनासाठी देशभरातून 600 कवी 3 दिवसात कवितांचे सादरीकरण करणार आहेत. त्याचबरोबर साहित्य संमेलनाची स्मरणिका 'पोत' या नावाने प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकभाषा, लोकजागर, साहित्य, संस्कृती आणि पर्यटनाची माहिती असणार आहे.

उस्मानाबाद - येत्या १० जानेवारीला सुरू होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरदार सुरू आहे. संत गोरोबाकाका साहित्यनगरी येथे हे संमेलन होणार आहे. यानिमित्त आज (३ जानेवारी) ला संमेलनाच्या जनजागृतीसाठी साहित्याची ज्योत निघणार असून अचलबेट येथून या ज्योतीची सुरुवात होणार आहे. त्याचा समारोप ४ जानेवारीला उस्मानाबाद येथे होणार असल्याचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी सांगितले.

साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार असून ग्रंथप्रदर्शन, तुळजापूर, पारंपारिक गोंधळ, कवी संमेलन, सांस्कृतीक कार्यक्रम, कथा-कथन, कवी कट्टी, बालकुमार मेळावा, असे विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. संमेलनासाठी ३ सभा मंडपाची उभारणी सुरू असून या सभामंडपाना शाहीर अमर शेख, दत्तो आप्पा तुळजापूरकर, सेतू माधव पगडी यांची नावे देण्यात आली आहेत.

हे वाचलं का? - ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, तयारीत चिमुकल्यांचा हातभार

तुळजाभवानीचे मंदिर आणि रूप असलेल्या देखाव्यासह भाई उद्धवराव पाटील यांच्या नावाने संमेलनाचे प्रवेशव्दार उभारण्यात येणार आहे. या संमेलनासाठी देशभरातून 600 कवी 3 दिवसात कवितांचे सादरीकरण करणार आहेत. त्याचबरोबर साहित्य संमेलनाची स्मरणिका 'पोत' या नावाने प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकभाषा, लोकजागर, साहित्य, संस्कृती आणि पर्यटनाची माहिती असणार आहे.

Intro:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तयारी अंतिम टप्प्यात


उस्मानाबाद- 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरदार सुरू झाली आहे. संत गोरोबाकाका साहित्यनगरी येथे होणार्‍या अखिल भारतीय साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे या निमित्त 3 जानेवारी रोजी संमेलनाच्या जनजागृतीसाठी साहित्याची ज्योत निघणार असून जिल्ह्यातील अचलबेट येथून या ज्योतीची सुरवात होणार आहे त्याचा समारोप 4 जानेवारी रोजी उस्मानाबाद येथे होणार असल्याची माहिती स्वागत अध्यक्ष नितीन तावडे यांनी दिली.10 ते 12 जानेवारी दरम्यान होणाऱ्या साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार असून ग्रंथप्रदर्शन, तुळजापूर पारंपारिक गोंधळ, कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, कथा-कथन, कवी कट्टा, बालकुमार मिळावा असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. संमेलनासाठी 3 सभा मंडपाची उभारणी सुरू असून या सभामंडपानां शाहीर अमर शेख, दत्तो आप्पा तुळजापूरकर, सेतू माधव पगडी यांची नावे देण्यात आली आहेत तर तुळजाभवानीचे मंदिर आणि रूप असलेल्या देखाव्यासह भाई उद्धवराव पाटील यांच्या नावाने संमेलनाचे प्रवेशव्दार उभा करण्यात येणार आहे या संमेलनासाठी देशभरातून 600 कवी 3 दिवसात कवितांचे सादरीकरण करणार आहेत त्याचबरोबर साहित्य संमेलनाची स्मरणिका या नावाने प्रकाशित करण्यात येणार आहे यात उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकभाषा, लोकजागर, साहित्य, संस्कृती आणि पर्यटनाची माहिती या पोत मध्ये असणार आहे


Body:या स्वागताध्यक्ष नितीन तावडे व रवींद्र केसकर यांचा byte आणि तयारीचे vis यात पाठवत आहे


हे व्हिओ देऊन pkg करायचा आहे


Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
Last Updated : Jan 3, 2020, 11:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.