ETV Bharat / state

उस्मानाबादेतील 223 धरण कोरडी ठाक; असमाधानकारक पावसामुळे शेतकरी चिंतेत

यावर्षीच्या पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेले. मात्र या काळात दमदार पाऊस न झाल्याने विहिरी, विंधन विहिरी अद्यापही कोरड्या आहेत. जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी प्रशासनाकडून 1046 विहिरी व कूपनलिका यांचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे.

author img

By

Published : Aug 9, 2019, 4:55 AM IST

शेताचे छायाचित्र

उस्मानाबाद- अर्धा पावसाळा संपत आला तरीही जिल्ह्यातील धरणे आज घडीला कोरडी ठाक आहेत. लहान मोठी अशी सर्व धरणे मिळून जिल्ह्यात 223 प्रकल्प आहेत. समाधानकारक पाऊस न झाल्याने यातील 141 धरणे कोरडीठाक आहेत, तर 66 धरणांमध्ये मृत पाणीसाठा आहे. अत्यल्प पावसावर लावलेले पिक तग धरेल की नाही, अशी शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.

पावसाळा संपत आला तरीही जिल्ह्यातील धरणे कोरडी ठाक

यावर्षीच्या पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेले. मात्र या काळात दमदार पाऊस न झाल्याने विहिरी, विंधन विहिरी अद्यापही कोरड्या आहेत. जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी प्रशासनाकडून 1046 विहिरी व कूपनलिका यांचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या जरी रिमझिम पावसावर पिक हिरवेगार दिसत असले, तरी जास्त दिवस ते तग धरणारे नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीची अल्पदृष्टी आणि यावर्षीही पावसाने केलेले दुर्लक्ष, यामुळे शेतकरी चिंतेत आहे. आतापर्यंत पडलेल्या पावसामुळे थोडेबहूत खरिपाचे पीक हाती लागेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र, भविष्यात रब्बी पिकाला मुकावे लागेल की काय, अशी शेतकऱ्यांकडून भीती व्यक्त केली जात आहे.

उस्मानाबाद- अर्धा पावसाळा संपत आला तरीही जिल्ह्यातील धरणे आज घडीला कोरडी ठाक आहेत. लहान मोठी अशी सर्व धरणे मिळून जिल्ह्यात 223 प्रकल्प आहेत. समाधानकारक पाऊस न झाल्याने यातील 141 धरणे कोरडीठाक आहेत, तर 66 धरणांमध्ये मृत पाणीसाठा आहे. अत्यल्प पावसावर लावलेले पिक तग धरेल की नाही, अशी शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.

पावसाळा संपत आला तरीही जिल्ह्यातील धरणे कोरडी ठाक

यावर्षीच्या पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेले. मात्र या काळात दमदार पाऊस न झाल्याने विहिरी, विंधन विहिरी अद्यापही कोरड्या आहेत. जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी प्रशासनाकडून 1046 विहिरी व कूपनलिका यांचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या जरी रिमझिम पावसावर पिक हिरवेगार दिसत असले, तरी जास्त दिवस ते तग धरणारे नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीची अल्पदृष्टी आणि यावर्षीही पावसाने केलेले दुर्लक्ष, यामुळे शेतकरी चिंतेत आहे. आतापर्यंत पडलेल्या पावसामुळे थोडेबहूत खरिपाचे पीक हाती लागेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र, भविष्यात रब्बी पिकाला मुकावे लागेल की काय, अशी शेतकऱ्यांकडून भीती व्यक्त केली जात आहे.

Intro:223 धरण कोरडी ठाक जेमतेम पावसा वरती पिकांनी धरली तग

उस्मानाबाद -अर्धा पावसाळा संपत आला तरीही जिल्ह्यातील धरणे आज घडीला कोरडी ठाक आहेत लहान मोठे अशी सर्व धरणे मिळून जिल्ह्यात 223 प्रकल्प आहेत यातील 141 धरणे कोरडीठाक आहेत तर 66 धरणांमध्ये मृत पाणीसाठा आहे निम्न तेरणा धरण, मांजरा धरण, बोरी धरण यामध्ये आठ ते दहा दिवस पुरेल एवढाच मृत पाणीसाठा आहे
यावर्षीच्या पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेले असले तरी अद्याप एकही दमदार पाऊस झालेला नाही विहिरी विंधन विहिरी अद्यापही कोरडे आहेत नदी-नाल्यांना ही पाणी आलेले नाही जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी 1046 विहिरी व कूपनलिका यांचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे सध्या रिमझिम पावसावर पीक हिरवागार दिसत असले तरी जास्त दिवस तग धरणारे नाही गेल्या वर्षीचे अल्पदृष्टी आणि यावर्षीही पावसाने केलेले दुर्लक्ष यामुळे शेतकरी चिंतेत आहे आतापर्यंत पडलेल्या पावसामुळे थोडेबहुत खरिपाचे पीक हाती लागेल अशी आशा आहे मात्र भविष्यात रब्बी पिकाला मुकावे लागेल की काय अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे


Body:एकच स्क्रीन मध्ये दोन व्हिडिओ लावावेत

यातील vis मध्ये

खुरटी गवत व सोयाबीनच्या पिकाचे आणि धरणाचे vis आहेत हे एका स्क्रीनवर ते दाखवावे व बाजूलाच byte आणि माझा ptc दाखवावे





Conclusion:कैलास चौधरी
ईटीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.