ETV Bharat / state

नाशकात डाळ, कांद्यापाठोपाठ भाजीपालाही महागला; सर्वसामान्यांना झळ

author img

By

Published : Oct 25, 2020, 7:01 AM IST

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम बाजारात दिसू लागला आहे. पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे बाजारात होणारी भाज्याची आवक घटली आहे. परिणामी भाजीपाल्यांचे भाव कडाडले आहेत. डाळी, कांद्या पाठोपाठ आता भाजीपालाही महागला असल्याने सर्वसामान्य नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

vegetable rate increase
भाजीपालाही महागला


नाशिक - जिल्ह्यात मागील १५ दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पावसामुळे फळे भाजीपाला पीक वाया गेले आहे. त्यामुळे बाजारात होणारी आवकही मोठ्या प्रमाणत घटली आहे. परिणामी भाजीपाल्याचे भाव कडाडले असून ऐन सणासुणीदीच्या दिवसात ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन आणि त्यानंतर अतिवृष्टीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सध्या उपलब्ध मालास चांगला भाव मिळत आहे. मात्र, सर्वसामान्य जनतेच्या खिशाला फटका बसू लागला आहे.

भाजीपालाही महागला

किरकोळ बाजारात प्रत्येक भाज्यांचे भाव 25 ते 30 टक्क्यांनी वाढले आहेत. यामध्ये फ्लॉवर, कोबी, भेंडी, गवार, शिमला मिरची, मेथी आदींच्या भावात मोठ्या प्रमाणात भाववाढ झाली आहे. एकीकडे कांदा 90 रुपये किलोवर जाऊन पोहोचला असून डाळींच्या भावाने देखील शंभरी पार केली आहे. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या महिन्यांच्या खर्चावर झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात एकीकडे कोरोनामुळे नागरीकांची आर्थिक गणित बिघडले असून दुसरीकडे महागाईचा भडका उडाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे.

पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक भाजीपाल्याचे उत्पादन सिन्नर, त्र्यंबकेश्वर, निफाड, दिंडोरी इगतपुरी या भागात घेतले जाते. मात्र याच भागात अवकाळी पावसाने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले असून परिणामी बाजारत भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे प्रत्येक भाजीपल्याच्या दरात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सुदैवाने शाळा बंद..
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अद्याप शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नाही. शाळा सुरू असल्यावर पालक आपल्या मुलांच्या जेवणाच्या डब्यासाठी गवार, भेंडी, बटाटे, फ्लॉवर या फळभाज्यांना पसंती देत असतात. मात्र यंदा पावसामुळे याच फळभाज्यांचे मोठे नुकसान झाल्याने आवक कमी होऊन सगळ्यांच्या किमतीत 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे. मात्र शाळा सुरू असत्या तर भाज्यांचे दर आणखी वाढले असते असं भाजी विक्रेत्यांचे म्हणणं आहे.

असे आहेत भाज्यांचे दर..


भाजीपाला - रुपये..
भेंडी- 80 रुपये किलो
फ्लॉवर 55 रुपये कंद
कोबी- 55 रुपये कंद
कारले- 60 रुपये किलो
गवार- 140 रुपये किलो
घेवडा- 100 रुपये किलो
शिमला मिरची-100 रुपये किलो
कारले- 60 रुपये किलो
मेथी 40 रुपये जुडी
कोथंबीर- 40 रुपये जुडी
शेपू- 30 रुपये जुडी
टोमॅटो- 40 रुपये किलो
गाजर -80 रुपये किलो
दोडके- 80 रुपये किलो
गिलके- 80 रुपये किलो.



नाशिक - जिल्ह्यात मागील १५ दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पावसामुळे फळे भाजीपाला पीक वाया गेले आहे. त्यामुळे बाजारात होणारी आवकही मोठ्या प्रमाणत घटली आहे. परिणामी भाजीपाल्याचे भाव कडाडले असून ऐन सणासुणीदीच्या दिवसात ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन आणि त्यानंतर अतिवृष्टीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सध्या उपलब्ध मालास चांगला भाव मिळत आहे. मात्र, सर्वसामान्य जनतेच्या खिशाला फटका बसू लागला आहे.

भाजीपालाही महागला

किरकोळ बाजारात प्रत्येक भाज्यांचे भाव 25 ते 30 टक्क्यांनी वाढले आहेत. यामध्ये फ्लॉवर, कोबी, भेंडी, गवार, शिमला मिरची, मेथी आदींच्या भावात मोठ्या प्रमाणात भाववाढ झाली आहे. एकीकडे कांदा 90 रुपये किलोवर जाऊन पोहोचला असून डाळींच्या भावाने देखील शंभरी पार केली आहे. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या महिन्यांच्या खर्चावर झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात एकीकडे कोरोनामुळे नागरीकांची आर्थिक गणित बिघडले असून दुसरीकडे महागाईचा भडका उडाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे.

पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक भाजीपाल्याचे उत्पादन सिन्नर, त्र्यंबकेश्वर, निफाड, दिंडोरी इगतपुरी या भागात घेतले जाते. मात्र याच भागात अवकाळी पावसाने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले असून परिणामी बाजारत भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे प्रत्येक भाजीपल्याच्या दरात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सुदैवाने शाळा बंद..
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अद्याप शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नाही. शाळा सुरू असल्यावर पालक आपल्या मुलांच्या जेवणाच्या डब्यासाठी गवार, भेंडी, बटाटे, फ्लॉवर या फळभाज्यांना पसंती देत असतात. मात्र यंदा पावसामुळे याच फळभाज्यांचे मोठे नुकसान झाल्याने आवक कमी होऊन सगळ्यांच्या किमतीत 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे. मात्र शाळा सुरू असत्या तर भाज्यांचे दर आणखी वाढले असते असं भाजी विक्रेत्यांचे म्हणणं आहे.

असे आहेत भाज्यांचे दर..


भाजीपाला - रुपये..
भेंडी- 80 रुपये किलो
फ्लॉवर 55 रुपये कंद
कोबी- 55 रुपये कंद
कारले- 60 रुपये किलो
गवार- 140 रुपये किलो
घेवडा- 100 रुपये किलो
शिमला मिरची-100 रुपये किलो
कारले- 60 रुपये किलो
मेथी 40 रुपये जुडी
कोथंबीर- 40 रुपये जुडी
शेपू- 30 रुपये जुडी
टोमॅटो- 40 रुपये किलो
गाजर -80 रुपये किलो
दोडके- 80 रुपये किलो
गिलके- 80 रुपये किलो.


ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.