ETV Bharat / state

सटाण्यात शॉर्ट-सर्किटमुळे सात एकरातील ऊस जळून खाक

author img

By

Published : Nov 5, 2020, 4:53 PM IST

डांगसौदाणे इथल्या दिगंबर धर्मा बोरसे यांच्या शेतातील सात एकर तर वंदना काकुळते यांचा दोन एकरातील ऊस शॉट सर्किटमुळे जळून खाक झाला आहे. वीजवितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे या दोन्ही शेतकऱ्यांचे साधारण 20 लाखांपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाले आहे.

sugarcane
ऊस

सटाणा (नाशिक) - शेतात असलेल्या वीजतारांमुळे शॉर्ट-सर्किट होऊन आग लागली. या घटनेत एका शेतकर्‍याचा सात एकरातील ऊस जळाला आहे. ही घटना सटाणा तालुक्यातील डांगसौंदाने येथे घडली. दिगंबर बोरसे असे नुकसानग्रस्त शेतकर्‍याचे नाव आहे. या घटनेला दोन दिवसांचा कालावधी उलटूनही पंचनामा करण्यात न आल्याने शेतकऱ्याने नाराजी व्यक्त केली आहे.

डांगसौदाणे इथल्या दिगंबर धर्मा बोरसे यांच्या शेतातील सात एकर तर वंदना काकुळते यांचा दोन एकरातील ऊस शॉट सर्किटमुळे जळून खाक झाला आहे. विजवितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे या दोन्ही शेतकऱ्यांचे साधारण 20 लाखांपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांनी संपूर्ण क्षेत्रात आडसाली उसाची लागवड केली असुन थोड्याच दिवसात कारखान्याच्या गळपास जाणारा ऊस पूर्णपणे जळाला आहे. शिवाय उसामध्ये केलेले ठिबक सिंचनही पुर्णपणे जळाले आहे.

पंचनामे त्वरीत करण्याची मागणी

दरम्यान वीज वितरण कंपनी कर्मचाऱ्यांनी अद्याप पंचनामा केला नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकाचा पंचनामा करून लवकरात लवकर आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बोरसे यांच्या शेतात विजवितरणच्या तारांचे मोठे जाळे आहे. या तारा शेतात लोंबकळल्याने बोरसे यांनी विजवितरणच्या कार्यालयात जाऊन तक्रारही दिली होती. मात्र स्थानिक कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली.

या आधी देखील महावितरणाच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा महावितरणाच्या हलगर्जीपणाने शेतकर्‍याच्या हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाले आहे.

सटाणा (नाशिक) - शेतात असलेल्या वीजतारांमुळे शॉर्ट-सर्किट होऊन आग लागली. या घटनेत एका शेतकर्‍याचा सात एकरातील ऊस जळाला आहे. ही घटना सटाणा तालुक्यातील डांगसौंदाने येथे घडली. दिगंबर बोरसे असे नुकसानग्रस्त शेतकर्‍याचे नाव आहे. या घटनेला दोन दिवसांचा कालावधी उलटूनही पंचनामा करण्यात न आल्याने शेतकऱ्याने नाराजी व्यक्त केली आहे.

डांगसौदाणे इथल्या दिगंबर धर्मा बोरसे यांच्या शेतातील सात एकर तर वंदना काकुळते यांचा दोन एकरातील ऊस शॉट सर्किटमुळे जळून खाक झाला आहे. विजवितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे या दोन्ही शेतकऱ्यांचे साधारण 20 लाखांपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांनी संपूर्ण क्षेत्रात आडसाली उसाची लागवड केली असुन थोड्याच दिवसात कारखान्याच्या गळपास जाणारा ऊस पूर्णपणे जळाला आहे. शिवाय उसामध्ये केलेले ठिबक सिंचनही पुर्णपणे जळाले आहे.

पंचनामे त्वरीत करण्याची मागणी

दरम्यान वीज वितरण कंपनी कर्मचाऱ्यांनी अद्याप पंचनामा केला नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकाचा पंचनामा करून लवकरात लवकर आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बोरसे यांच्या शेतात विजवितरणच्या तारांचे मोठे जाळे आहे. या तारा शेतात लोंबकळल्याने बोरसे यांनी विजवितरणच्या कार्यालयात जाऊन तक्रारही दिली होती. मात्र स्थानिक कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली.

या आधी देखील महावितरणाच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा महावितरणाच्या हलगर्जीपणाने शेतकर्‍याच्या हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.