1960 ते 2019 नॉनस्टॉप मतदान; सखुबाई नामदेव चुंभळे यांचा अनोखा विक्रम - 1960 ते 2019 नॉनस्टॉप मतदान
1960 पासून आजपर्यंत महाराष्ट्र विधानसभेच्या 14 निवडणुका झाल्या. पहिल्या निवडणुकीच्या वेळी आपण मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत आपण मतदानाचा हक्क बजावला असल्याचे सखुबाईंनी चुंभळे सांगतात. हे त्यांचे विधानसभा निवडणुकीतील १४ वे मतदान आहे.

नाशिक - देशात महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच 1960 साली विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. या पहिल्या निवडणुकीपासून ते सोमवारी (21 ऑक्टोबर) झालेल्या 14 व्या विधानसभा निवडणुकीत, नाशिक मधील देवळाली मतदारसंघातून सखुबाई नामदेव चुंभळे या आजींनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
1960 पासून आजपर्यंत महाराष्ट्र विधानसभेच्या 14 निवडणुका झाल्या. पहिल्या निवडणुकीच्या वेळी आपण मतदानाचा हक्क बजावल्याचे सखुबाईंनी सांगितले. यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला असल्याचे त्या सांगतात. मतदान करणे ही सर्वाधिक आनंदाची गोष्ट असते, आपला तो हक्क आहे. हा हक्क बजावणे हे लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी आवश्यक असते. त्यामुळे न चुकता प्रत्येकवेळी मतदानाचा हक्क आपण बजावला. 14 व्या विधानसभेसाठी सोमवारी सकाळीच नातु विश्वास चुंभळे यांच्यासोबत गौळाणे येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर दाखल होत आपण मतदानाचा हक्क बजावल्याचे सखुबाईंनी सांगितले.
हेही वाचा - नाशिककरांनी बाहेर पडून मतदान करा; अभिनेता चिन्मय उद्गीरकरचे आवाहन
मतदानाने लोकशाही बळकट होते, भारतीय लोकशाही अतिशय प्रगल्भ आहे. जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा आपली लोकशाही मजबूत आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारी असल्यामुळे प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे. मतदानाशिवाय लोकशाहीला बळकटी येणे शक्य नाही. त्ययामुळे 1960 ते 2019 या कालावधीत झालेल्या प्रत्येक निवडणुकीवेळी आपण न चुकता मतदान केल्याचे सखुबाईंनी सांगितले.
हेही वाचा - नाशिकमध्ये सखी मतदान केंद्र सजले गुलाबी रंगात, महिलांमध्ये मतदानाचा उत्साह
त्यांनी आजपर्यंतच्या सर्व 14 विधान सभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे.
Body:देशात महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच 1960 साली विधान सभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. या पहिल्या निवडणुकीपासून ते सोमवारी (दि.21) झालेल्या 14 व्या विधान सभा निवडणुकीत, नाशिक मधील देवळाली विधान सभा मतदार संघातून सखुबाई नामदेव चुंभळे या आजींनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
Conclusion:1960 पासून आजपर्यंत महाराष्ट्र विधानसभेच्या 14 निवडणुका झाल्या. पहिल्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला असल्याचे ते सांगतात.मतदान करणे ही सर्वाधिक आनंदाची गोष्ट असते. आपला तो हक्क आहे. हा हक्क बजावणे हे लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी आवश्यक असते. त्यामुळे न चुकता प्रत्येकवेळी मतदानाचा हक्क बजावला. 14 व्या विधान सभेसाठी सोमवारी सकाळीच नातु विश्वास चुंभळे यांच्यासोबत गौळाणे येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर दाखल होत हक्क बजावला असल्याचे त्यांनी सांगितले .
मतदानाने लोकशाही बळकट होते भारतीय लोकशाही अतिशय प्रगल्भ आहे. जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा आपली लोकशाही मजबूत आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारी असल्यामुळे प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे. मतदानाशिवाय लोकशाहीला बळकटी येणे शक्य नाही. यामुळे 1960 ते 2019 या कालावधीत झालेल्या प्रत्येक निवडणुकीवेळी न चुकता मतदान केले.