ETV Bharat / state

नाशिक पतसंस्था धारकांचे सहकारी बँकेत धरणे आंदोलन

author img

By

Published : Jul 17, 2019, 12:24 PM IST

जिल्ह्यातील नागरी व बिगर शेती पतसंस्थांच्या जवळपास २५० ते ३०० कोटी रुपयांच्या ठेवी, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खात्यांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. नोटाबंदी झाल्यानंतर सरकारने बँकेच्या कामकाजावर बंदी आणली होती. मात्र, आता या जिल्हा मध्यवर्ती बँकेत अडकून पडलेल्या रकमेची मागणी पतसंस्था धारकांनी केली आहे.

आंदोलन करतांना पतसंस्था धारक

नाशिक - पतसंस्थांचे अडकलेले पैसे ताबडतोब देण्याची मागणी करत पतसंस्था धारकांनी नाशिक जिल्हा सहकारी बँकेत धरणे आंदोलन केले. नोटाबंदी नंतर पतसंस्थांचे जिल्हा बँकेत 300 कोटी रुपये अडकून पडले आहेत.

प्रकरणाबद्दल माहिती देताना आंदोलक

महाराष्ट्र राज्य सहकारी कायद्यानुसार मध्यवर्ती सहकारी बँकेत रिझर्व्ह फंड, इमारत निधी ,चालू खाते या सारखी खाते उघडणे व ठेवी ठेवणे पतसंस्थांना बंधनकारक होते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरी व बिगर शेती पतसंस्थांचे जवळपास २५० ते ३०० कोटी रुपयांच्या ठेवी, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खात्यांमध्ये ठेवण्यात आली होती. नोटाबंदी झाल्यानंतर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजावर सरकारने बंदी आणली. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच पतसंस्थांची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेत अडकून पडली होती. मात्र, पैसे न मिळाल्याने पतसंस्थांना दैनंदिन कामकाज करताना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.

ग्रामीण भागाच्या पतसंस्थेचे सभासद, खातेदार हे शेतकरी असून त्यांचे दैनंदिन व्यवहार करणे देखील कठीण झाले आहे. शिवाय बेरोजगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पतसंस्थांना ठेवी परत न मिळाल्यास भविष्यात मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याचे म्हणत, जिल्ह्यातील पतसंस्था संचालकांनी नाशिक जिल्हा सहकारी बँकेत धरणे आंदोलन केले.

या आंदोलनावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंतराव लोढा, नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष गोपाळ पाटील, अंजली पाटील, मधुकर भालेराव, नंदकुमार खैरनार, नरेंद्र बागडे, दिलीप गोगड, प्रकाश गवळी, निशिगंधा ताई मोगल यांच्यासह पदाधिकारी, संचालक, कर्मचारी व अल्पबचत प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाशिक - पतसंस्थांचे अडकलेले पैसे ताबडतोब देण्याची मागणी करत पतसंस्था धारकांनी नाशिक जिल्हा सहकारी बँकेत धरणे आंदोलन केले. नोटाबंदी नंतर पतसंस्थांचे जिल्हा बँकेत 300 कोटी रुपये अडकून पडले आहेत.

प्रकरणाबद्दल माहिती देताना आंदोलक

महाराष्ट्र राज्य सहकारी कायद्यानुसार मध्यवर्ती सहकारी बँकेत रिझर्व्ह फंड, इमारत निधी ,चालू खाते या सारखी खाते उघडणे व ठेवी ठेवणे पतसंस्थांना बंधनकारक होते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरी व बिगर शेती पतसंस्थांचे जवळपास २५० ते ३०० कोटी रुपयांच्या ठेवी, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खात्यांमध्ये ठेवण्यात आली होती. नोटाबंदी झाल्यानंतर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजावर सरकारने बंदी आणली. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच पतसंस्थांची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेत अडकून पडली होती. मात्र, पैसे न मिळाल्याने पतसंस्थांना दैनंदिन कामकाज करताना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.

ग्रामीण भागाच्या पतसंस्थेचे सभासद, खातेदार हे शेतकरी असून त्यांचे दैनंदिन व्यवहार करणे देखील कठीण झाले आहे. शिवाय बेरोजगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पतसंस्थांना ठेवी परत न मिळाल्यास भविष्यात मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याचे म्हणत, जिल्ह्यातील पतसंस्था संचालकांनी नाशिक जिल्हा सहकारी बँकेत धरणे आंदोलन केले.

या आंदोलनावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंतराव लोढा, नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष गोपाळ पाटील, अंजली पाटील, मधुकर भालेराव, नंदकुमार खैरनार, नरेंद्र बागडे, दिलीप गोगड, प्रकाश गवळी, निशिगंधा ताई मोगल यांच्यासह पदाधिकारी, संचालक, कर्मचारी व अल्पबचत प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:अडकलेले पैसे लवकर द्या, पतसंस्था धारकांचे जिल्हा सहकारी बँकेत आंदोलन...


Body:नाशिकच्या पतसंस्थांचे अडकलेले पैसे लवकर द्या म्हणत पतसंस्था धारकांनी नाशिक जिल्हा सहकारी बँकेत धरणे आंदोलन केलं,नोट बंदी नंतर पतसंस्थांचे जिल्हा बँकेत 300 कोटी रुपये अडकून पडले आहेत..

महाराष्ट्र राज्य सहकारी कायद्यानुसार मध्यवर्ती सहकारी बँकेत रिझर्व्ह फंड, इमारत निधी ,चालू खाते या सारखी खाते उघडणे व ठेवी ठेवणे पतसंस्थांना बंधनकारक होतं,त्यामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत,नाशिक जिल्ह्यातील नागरी व बिगर शेती पतसंस्थेचे जवळपास अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांच्या ठेवी खात्यामध्ये ठेवण्यात आल्या होत्या,नोटबंदी झाल्यानंतर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजावर सरकारने बंदी आणली, त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच पतसंस्थांची रक्कम यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेत अडकून पडली आहेत,

ह्यामुळे पतसंस्थांना दैनंदिन कामकाज करतांना अडचणी निर्माण होऊ लागल्या असून, पतसंस्थांना तारेवरची कसरत करावी लागत आहे,आज ग्रामीण भागातील पतसंस्थांना पैशा अभावी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, ग्रामीण भागाची पतसंस्थेत संस्थेचे सभासद, खातेदार हे शेतकरी असून त्यांचे दैनंदिन व्यवहार करणे देखील मुश्कील झाले असून,त्यामुळे बेरोजगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याने, पतसंस्थांना ठेवी परत न मिळाल्याने भविष्यात मोठे संकट निर्माण होऊ शकेल असं म्हणत जिल्हातील पतसंस्था संचालकांनी नाशिक जिल्हा सहकारी बँकेत धरणे आंदोलन केलं,


यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेत फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे ,नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंतराव लोढा, नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष गोपाळ पाटील, अंजली पाटील, मधुकर भालेराव, नंदकुमार खैरनार, नरेंद्र बागडे, दिलीप गोगड, प्रकाश गवळी, निशिगंधा ताई मोगल यांच्यासह पदाधिकारी संचालक, कर्मचारी व अल्पबचत प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

nsk patasantha money protest viu 1
nsk patasantha money protest byte







Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.