ETV Bharat / state

Nashik Drought : नाशिकमध्ये दुष्काळाच्या झळा; जिल्ह्यात सहा टँकरने पाणीपुरवठा

author img

By

Published : Apr 17, 2022, 8:37 PM IST

एप्रिलचा पंधरवडा सुरु होताच जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा असह्य होत असून, ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवू लागली ( Nashik Drought ) आहे. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात पहिला टँकर येवला तालुक्यात सुरु ( Six Tanker Water Supply ) झाला.

tanker water supply
tanker water supply

नाशिक - एप्रिलचा पंधरवडा सुरु होताच जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा असह्य होत ( Nashik Drought ) असून, ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात पहिला टँकर येवला तालुक्यात सुरु झाला. या ठिकाणी तीन टँकर आहे. तर, बागलाण व सिन्नर तालुक्यात प्रत्येकी दोन टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. येत्या काळात टँकरची संख्या वाढण्याची चिन्हे ( Six Tanker Water Supply ) आहेत.

तीन तालुक्यांत सर्वांधिक टंचाई - मागील दोन वर्षांपासून वरुणराजाने समाधानकारक हजेरी लावल्याने जिल्ह्यातील धरणांत आजमितीला पन्नास टक्क्यांहून अधिक जलसाठा आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत पाणी टंचाई फारशी जाणवली नाही. पण, एप्रिल सुरु होताच जिल्ह्यात अनेक गाव, वाड्या व वस्त्यांवर पाण्याच्या दुर्भिक्ष्याला तोंड द्यावे लागत आहे. त्याचपार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडे टँकरच्या मागणीचे प्रस्ताव प्राप्त होत आहे. सर्वाधिक टंचाई ही दुष्काळी भाग असलेल्या येवला, बागलाण, सिन्नर तालुक्यात आहे.

आठ कोटींचा आराखडा - येवल्यात तीन तर बागलाण व सिन्नर तालुक्यात प्रत्येकी दोन टँकरने पाणी पुरवठ‍ा सुरु आहे. जसे प्रस्ताव प्राप्त होतील तशी लगेच टॅकरला मंजुरी दिली जाईल, अशी माहिती टंचाई शाखेकडून देण्यात आली आहे. यंदा जिल्ह्यात दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी आठ कोटींचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. टंचाई शाखेच्या अहवालानुसार ५७९ गावे आणि ९२२ वाड्यांमध्ये टॅकरची गरज भासू शकते. यासाठी सव्वापाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा - Ajit pawar : मोबाईल रिचार्ज प्रमाणे विजेसाठी प्रिपेड कार्ड आणण्याचा राज्य सरकारचा विचार - अजित पवार

नाशिक - एप्रिलचा पंधरवडा सुरु होताच जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा असह्य होत ( Nashik Drought ) असून, ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात पहिला टँकर येवला तालुक्यात सुरु झाला. या ठिकाणी तीन टँकर आहे. तर, बागलाण व सिन्नर तालुक्यात प्रत्येकी दोन टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. येत्या काळात टँकरची संख्या वाढण्याची चिन्हे ( Six Tanker Water Supply ) आहेत.

तीन तालुक्यांत सर्वांधिक टंचाई - मागील दोन वर्षांपासून वरुणराजाने समाधानकारक हजेरी लावल्याने जिल्ह्यातील धरणांत आजमितीला पन्नास टक्क्यांहून अधिक जलसाठा आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत पाणी टंचाई फारशी जाणवली नाही. पण, एप्रिल सुरु होताच जिल्ह्यात अनेक गाव, वाड्या व वस्त्यांवर पाण्याच्या दुर्भिक्ष्याला तोंड द्यावे लागत आहे. त्याचपार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडे टँकरच्या मागणीचे प्रस्ताव प्राप्त होत आहे. सर्वाधिक टंचाई ही दुष्काळी भाग असलेल्या येवला, बागलाण, सिन्नर तालुक्यात आहे.

आठ कोटींचा आराखडा - येवल्यात तीन तर बागलाण व सिन्नर तालुक्यात प्रत्येकी दोन टँकरने पाणी पुरवठ‍ा सुरु आहे. जसे प्रस्ताव प्राप्त होतील तशी लगेच टॅकरला मंजुरी दिली जाईल, अशी माहिती टंचाई शाखेकडून देण्यात आली आहे. यंदा जिल्ह्यात दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी आठ कोटींचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. टंचाई शाखेच्या अहवालानुसार ५७९ गावे आणि ९२२ वाड्यांमध्ये टॅकरची गरज भासू शकते. यासाठी सव्वापाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा - Ajit pawar : मोबाईल रिचार्ज प्रमाणे विजेसाठी प्रिपेड कार्ड आणण्याचा राज्य सरकारचा विचार - अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.