ETV Bharat / state

'एखाद्या नेत्याची भाटगिरी किती करावी याचे भान ठेवायला हवे'

author img

By

Published : Jan 13, 2020, 4:38 PM IST

Updated : Jan 13, 2020, 8:05 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले होते. त्यांनी कधीही धर्मभेद जातिभेद केला नाही, त्यांच्याकडे काम करणाऱ्या सेनापतीमध्ये मुस्लीम सेनापतींची संख्या लक्षणीय होती. राज्याचा कारभार करत असताना शेतकऱ्यांच्या काडीला देखील हात लावता कामा नये, अशी व्यवस्था होती. आज मात्र मोदी सरकारकडून सर्वच व्यवस्था पायदळी तुडवल्या जात आहेत.

छगन भुजबळ, कॅबिनेट मंत्री
छगन भुजबळ, कॅबिनेट मंत्री

नाशिक - यापूर्वी देशात काहींची तुलना कधी प्रभुरामचंद्र तर कधी शिवशंभू बरोबर केली गेली. त्याकडे दुर्लक्ष केले गेले असेल. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केली जात असेल, तर जनता कदापी सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. भाजप नेते गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे पुस्तक प्रकाशित केले आहे, त्यावर भुजबळांनी नाशिकमध्ये प्रतिक्रिया दिली.

छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री

भुजबळ म्हणाले, कुठल्याही लेखकाने भाटगिरी तरी किती करावी आणि ती करत असताना आपण कुठल्या व्यक्तीची तुलना कोणाशी करत आहोत, याचेही भान ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा प्रश्नांवर तसेच पुस्तकांवर बंदी घातलीच पाहिजे, असे स्पष्ट मत भुजबळ यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले होते. त्यांनी कधीही धर्मभेद जातीभेद केला नाही, त्यांच्याकडे काम करणाऱ्या सेनापतीमध्ये मुस्लीम सेनापतींची संख्या लक्षणीय होती. राज्याचा कारभार करत असताना शेतकऱ्यांच्या काडील देखील हात लावता कामा नये, अशी व्यवस्था केली होती. आज मात्र मोदी सरकारकडून सर्वच व्यवस्था पायदळी तुडवल्या जात आहेत. राज्य ते ज्या प्रकारे कायदे करत आहेत, त्यात जनहित नसून कुठलीतरी एक विशिष्ट धर्माच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होत आहे.

देशात विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहे, जेएनयू सारख्या देशाच्या नामांकित विद्यापीठात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थेत, असे कधीही घडलं नाही. त्यांचे राज्य हे रयतेच राज्य होते, त्यांच्या नावावर निवडणुकीत मते मागितली गेली. त्यामुळे जनतेत रोष असणे सहाजिकच आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना करणे शक्य नसल्याची टीका भुजबळ यांनी केली.

नाशिक - यापूर्वी देशात काहींची तुलना कधी प्रभुरामचंद्र तर कधी शिवशंभू बरोबर केली गेली. त्याकडे दुर्लक्ष केले गेले असेल. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केली जात असेल, तर जनता कदापी सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. भाजप नेते गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे पुस्तक प्रकाशित केले आहे, त्यावर भुजबळांनी नाशिकमध्ये प्रतिक्रिया दिली.

छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री

भुजबळ म्हणाले, कुठल्याही लेखकाने भाटगिरी तरी किती करावी आणि ती करत असताना आपण कुठल्या व्यक्तीची तुलना कोणाशी करत आहोत, याचेही भान ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा प्रश्नांवर तसेच पुस्तकांवर बंदी घातलीच पाहिजे, असे स्पष्ट मत भुजबळ यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले होते. त्यांनी कधीही धर्मभेद जातीभेद केला नाही, त्यांच्याकडे काम करणाऱ्या सेनापतीमध्ये मुस्लीम सेनापतींची संख्या लक्षणीय होती. राज्याचा कारभार करत असताना शेतकऱ्यांच्या काडील देखील हात लावता कामा नये, अशी व्यवस्था केली होती. आज मात्र मोदी सरकारकडून सर्वच व्यवस्था पायदळी तुडवल्या जात आहेत. राज्य ते ज्या प्रकारे कायदे करत आहेत, त्यात जनहित नसून कुठलीतरी एक विशिष्ट धर्माच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होत आहे.

देशात विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहे, जेएनयू सारख्या देशाच्या नामांकित विद्यापीठात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थेत, असे कधीही घडलं नाही. त्यांचे राज्य हे रयतेच राज्य होते, त्यांच्या नावावर निवडणुकीत मते मागितली गेली. त्यामुळे जनतेत रोष असणे सहाजिकच आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना करणे शक्य नसल्याची टीका भुजबळ यांनी केली.

Intro:छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना कदापी पशक्य नाही -छगन भुजबळ


Body:या अगोदर देशात काहींची तुला कधी प्रभुरामचंद्र तर कधी शिवशंभू बरोबर केली गेली ,त्याकडे दुर्लक्ष केले गेले असेल, मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना केली जात असेल तर जनता कदापि सहन करणार नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना कदापि शक्य नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली,एका भाजप नेत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे पुस्तक प्रसिद्ध केले आहे, त्यावर नाशिकमध्ये पत्रकारांशी भुजबळ बोलत होते,


छगन भुजबळ म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केलं होतं, त्यांनी कधीही धर्मभेद जातिभेद केला नाही,त्यांच्याकडे काम करणाऱ्या सेनापती मध्ये मुस्लीम सेनापतींची संख्या लक्षणीय होती, राज्याचा कारभार करत असताना शेतकऱ्यांच्या कडील देखील हात लावता कामा नये अशी व्यवस्था होती, आज मात्र मोदी सरकारकडून व्यवस्था पायदळी तुडवली जात आहे ,राज्य ते ज्या प्रकारे कायदे करत आहेत त्यात जनहित नसून कुठलीतरी एक विशिष्ट धर्माच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होत आहे, देशात विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहे,जेएनयू सारख्या देशाच्या नामांकित विद्यापीठात हिंसाचाराच्या घटना घडत आहे ,त्यावर कुठलीही कारवाई होतांना दिसत नाही मात्र असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थेत असे कधीही घडलं नाही, त्यांचं राज्य हे रयतेच राज्य होतं, त्यांच्या नावावर निवडणुकीत मते मागितली गेली, त्यामुळे जनतेत रोष असणे सहाजिकच आहे, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना करणं शक्य नसल्याची टीका भुजबळ यांनी केली,भुजबळ म्हणाले की, कुठलीही लेखकाने भट गिरी तरी किती करावी ,आणि ती करत असतांना आपण कुठल्या व्यक्तीची तुला कोणाशी करत आहोत याचे भान ठेवणे आवश्यक आहे,त्या मुळे अशा प्रश्नांवर तसेच पुस्तकांवर बंदी घघातली पाहिजे असे स्पष्ट मत भुजबळ यांनी व्यक्त केला..

टीप फीड ftp
nsk bhujbal on modi book


Conclusion:
Last Updated : Jan 13, 2020, 8:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.