ETV Bharat / state

नाशकात मुसळधार पाऊस; बाजरीसह मका पिकाला फटका

author img

By

Published : Oct 20, 2019, 2:34 PM IST

नाशिकमधील अनेक तालुक्यांना परतीच्या पावसाने झोडपून काढले. त्यामुळे बाजरी, मका सारख्या पिकांना फटका बसला आहे.

नाशकात मुसळधार पाऊस

नाशिक - परतीच्या मुसळधार पावसाने मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यातील अनेक गावांना झोडपले. त्यामुळे शेतकऱ्यांची बाजरी, मका या पिकांचे नुकसान झाले आहे, तर शेतात पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान आर्थिक नुकसान झाले आहे.

नाशकात मुसळधार पाऊस; बाजरी, मका पिकाला फटका

शनिवारी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली, तर रात्रभर पावसाचा जोर सुरूच होता. अनेक शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला मका व बाजरी पावसात भिजून खराब झाली. कांद्याचे रोप आणि द्राक्षे बागांना देखील या पावसाचा फटका बसला.

पुणे वेधशाळेने 19 ते 21 राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. रविवारी देखील ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. उद्या सोमवारी असाच पाऊस झाला, तर त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे.

नाशिक - परतीच्या मुसळधार पावसाने मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यातील अनेक गावांना झोडपले. त्यामुळे शेतकऱ्यांची बाजरी, मका या पिकांचे नुकसान झाले आहे, तर शेतात पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान आर्थिक नुकसान झाले आहे.

नाशकात मुसळधार पाऊस; बाजरी, मका पिकाला फटका

शनिवारी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली, तर रात्रभर पावसाचा जोर सुरूच होता. अनेक शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला मका व बाजरी पावसात भिजून खराब झाली. कांद्याचे रोप आणि द्राक्षे बागांना देखील या पावसाचा फटका बसला.

पुणे वेधशाळेने 19 ते 21 राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. रविवारी देखील ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. उद्या सोमवारी असाच पाऊस झाला, तर त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे.

Intro:परतीच्या पावसाने मुसळधार बरसत मनमाड शहरासह नांदगांव तालुक्यातील अनेक गावांना तडाखा दिला त्यामुळे शेतकऱ्यांनी काढलेले बाजरी मका या पिकाचे नुकसान झाले तर शेतात पाणी झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेBody: मनमाड, नांदगाव, परिसराला परतीच्या जोरदार पावसाने झोडपून काढले काल दुपार पासून सुरू झालेला पाऊस रात्रभर बरसला.अनेक शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला मका व बाजरी पावसात भिजून खराब झाली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे .कांद्याचे रोप आणि द्राक्षे बागांना देखील या पावसाचा फटका बसला .पुणे वेधशाळेने 19 ते 21 राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे त्या अनुषंगाने अनेक ठिकाणी पाऊस पडलाही
आज ही ढगाळ वातावरण असून पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.जर उद्या सोमवारी असाच पाऊस झाला तर त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता असल्याचे पाहून सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेConclusion:परतीच्या पावसाने मुसळधार बरसत मनमाड शहरासह नांदगांव तालुक्यातील अनेक गावांना तडाखा दिला त्यामुळे शेतकऱ्यांनी काढलेले बाजरी मका या पिकाचे नुकसान झाले तर शेतात पाणी जमा झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आता पाऊस नको असे म्हणायची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.