ETV Bharat / state

वसंत कानेटकरांना मानवंदना..! "अश्रूंची झाली फुले" नाटकाचा पहिला प्रयोग नाशिकमध्ये

या नाटकाचे महाराष्ट्रभर ५१ प्रयोग होणार असून मुंबई पुण्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्यात सर्वत्र हे नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू असा विश्वास सुबोध भावे यांनी व्यक्त केला.

author img

By

Published : May 2, 2019, 10:48 AM IST

वसंत कानेटकरांना मानवंदना..!

नाशिक - लेखक वसंत कानेटकर यांना मानवंदना देण्यासाठी "अश्रूंची झाली फुले" या नाटकाचा पहिला प्रयोग नाशिकमध्ये घेतल्याचे कलाकार सुबोध भावे यांनी सांगितले. नाशिकच्या कालिदास कला मंदिरात झालेल्या या नाटकाला प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. या नाटकाचे लेखक वसंत कानेटकर यांनी नाटकाची अतिशय छान कलाकृती केल्यानं आम्ही त्याचं चांगल्या पद्धतीने सादरीकरण करू शकल्याचे सुबोध भावेने म्हटले.

नाटकाच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून आम्हाला प्रतिसाद दिला, त्यामुळे आम्हालाही एनर्जी मिळाल्याचं सुबोध यांनी सांगितले. या आधी काशीनाथ घाणेकर आणि रमेश भाटकर यांनी केलेलं "अश्रूंची झाली फुले" हे नाटक कधीच पाहिलं नव्हतं. त्यामुळे हे नाटक करणं नवीन असल्याचे सुबोध भावेने सांगितले.

वसंत कानेटकरांना मानवंदना..!

या नाटकाचे महाराष्ट्रभर ५१ प्रयोग होणार असून मुंबई पुण्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्यात सर्वत्र हे नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू असा विश्वास सुबोध भावे यांनी व्यक्त केला. या नाटकाचे दिग्दर्शन प्रतिमा कुलकर्णी यांनी केले आहे तर निर्मिती दिनेश पेडणेकर, मंजिरा भावे, राहुल कर्णिक, अभिजीत देशपांडे यांनी केली आहे. यात सुबोध भावेशिवाय शैलेश दातार, सीमा देशमुख, उमेश जगताप, प्रणव जोशी, रवींद्र कुलकर्णी,जितेंद्र आगरकर, प्रथमेश देशपांडे,भूषण गमरे, रोहित मोरे रोहित मोरे, श्रद्धा पोखरणकर या कलाकारांनीही भूमिका साकारल्या आहेत.

नाशिक - लेखक वसंत कानेटकर यांना मानवंदना देण्यासाठी "अश्रूंची झाली फुले" या नाटकाचा पहिला प्रयोग नाशिकमध्ये घेतल्याचे कलाकार सुबोध भावे यांनी सांगितले. नाशिकच्या कालिदास कला मंदिरात झालेल्या या नाटकाला प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. या नाटकाचे लेखक वसंत कानेटकर यांनी नाटकाची अतिशय छान कलाकृती केल्यानं आम्ही त्याचं चांगल्या पद्धतीने सादरीकरण करू शकल्याचे सुबोध भावेने म्हटले.

नाटकाच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून आम्हाला प्रतिसाद दिला, त्यामुळे आम्हालाही एनर्जी मिळाल्याचं सुबोध यांनी सांगितले. या आधी काशीनाथ घाणेकर आणि रमेश भाटकर यांनी केलेलं "अश्रूंची झाली फुले" हे नाटक कधीच पाहिलं नव्हतं. त्यामुळे हे नाटक करणं नवीन असल्याचे सुबोध भावेने सांगितले.

वसंत कानेटकरांना मानवंदना..!

या नाटकाचे महाराष्ट्रभर ५१ प्रयोग होणार असून मुंबई पुण्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्यात सर्वत्र हे नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू असा विश्वास सुबोध भावे यांनी व्यक्त केला. या नाटकाचे दिग्दर्शन प्रतिमा कुलकर्णी यांनी केले आहे तर निर्मिती दिनेश पेडणेकर, मंजिरा भावे, राहुल कर्णिक, अभिजीत देशपांडे यांनी केली आहे. यात सुबोध भावेशिवाय शैलेश दातार, सीमा देशमुख, उमेश जगताप, प्रणव जोशी, रवींद्र कुलकर्णी,जितेंद्र आगरकर, प्रथमेश देशपांडे,भूषण गमरे, रोहित मोरे रोहित मोरे, श्रद्धा पोखरणकर या कलाकारांनीही भूमिका साकारल्या आहेत.

Intro:लेखक प्रा वसंत कानेटकर यांना मानवंदना देण्यासाठी" अश्रूंची झाली फुले" ह्या नाटकाचा पहिला प्रयोग नाशिक मध्ये-सुबोध भावे..



Body:लेखक प्रा वसंत कानेटकर यांना मानवंदना देण्यासाठी "अश्रूंची झाली फुले "ह्या नाटकाचा पहिला प्रयोग नाशिक मध्ये घेतल्याचे कलाकार सुबोध भावे यांनी सांगितलं..नाशिकच्या कालिदास काला मंदिरात झालेल्या ह्या नाटकाला प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती...

"अश्रूंची झाली फुले "या नाटकाचे लेखक वसंत कानेटकर हे नाशिकचे असल्याने त्यांना मानवंदना देण्यासाठी नाशिक मध्ये पहिला प्रयोग घेतल्याचं कलाकार सुबोध भावे यांनी सांगितले कानिटकर यांनी नाटकाची अतिशय छान कलाकृती केल्यानं आम्ही त्याचं चांगल्या पद्धतीने सादरीकरण करू शकल्याने सुबोध भावे यांनी म्हटलेय,

नाटकाच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून आम्हाला प्रतिसाद दिला त्यामुळे आम्हालाही एनर्जी मिळाल्याचं सुबोध यांनी सांगितला,

या आधी काशीनाथ घाणेकर आणि रमेश भाटकर यांनी केलेलं "अश्रूंची झाली फुले" हे नाटक कधीच पाहिलं नव्हतं मात्र श्रेयस तळपदे यांनी केलेलं एक नाटक बऱ्याच वर्षांपूर्वी पाहिल्याचं त्यांनी सांगत माझ्यासाठी हे नाटक करणं नवीन असल्याचाही सुबोध भावे म्हटलेत..

या नाटकाचे महाराष्ट्रभर 51 प्रयोग होणार असून मुंबई पुण्या पाठोपाठ नाशिक जिल्ह्यात सर्वत्र हे नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू असा विश्वास सुबोध भावे यांनी व्यक्त केला

या नाटकाचे दिग्दर्शन प्रतिमा कुलकर्णी यांनी केलेय तर निर्माते दिनेश पेडणेकर, मंजिरा भावे ,राहुल कर्णिक ,अभिजीत देशपांडे यांनी केले आहे,पार्श्वसंगीत मिलिंद जोशी यांनी दिले,नेपथ्य व प्रकाशयोजना प्रदीप मुळे यांनी केली आहे,वेशभूषाकार गीता गोडबोले यांनी केली आहे ,यामध्ये सुबोध भावे यांच्या सोबत शैलेश दातार, सीमा देशमुख, उमेश जगताप, प्रणव जोशी, रवींद्र कुलकर्णी,जितेंद्र आगरकर, प्रथमेश देशपांडे,भूषण गमरे, रोहित मोरे रोहित मोरे, श्रद्धा पोखरणकर आदींनी सह कलाकारांची भूमिका साकारली आहे..


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.