ETV Bharat / state

अवकाळीचा फटका; दिंडोरीत हतबल शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या

author img

By

Published : Nov 2, 2019, 11:39 AM IST

गुरुवारी (31 नोव्हेंबर)ला रात्रीचे जेवण झाल्यानंतर घराबाहेरील जागेत संजय देशमुख झोपले होते. सकाळी मुलगा उठल्यानंतर त्याने वडिलांच्या तोंडातून फेस येत असल्याचे पाहिले.

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील संजय भास्कर देशमुख या शेतकऱ्याने अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानमुळे न्यूऑन नामक विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.


नाशिक - दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील संजय भास्कर देशमुख या शेतकऱ्याने अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानमुळे न्यूऑन नामक विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

देशमुख यांच्यावर मोहाडी कार्यकारी सहकारी सोसायटीचे कर्ज असून, इतरही काही बँकांचे कर्ज असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्याकडे दीड एकर जमिनीवर द्राक्ष बाग होती. अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

गुरुवारी (31 नोव्हेंबर)ला रात्रीचे जेवण झाल्यानंतर घराबाहेरील जागेत संजय देशमुख झोपले होते. सकाळी मुलगा उठल्यानंतर त्याने वडिलांच्या तोंडातून फेस येत असल्याचे पाहिले. यावेळी त्याला वडिलांच्या बाजूलाच न्यूऑन औषधाची बाटली पडल्याचे दिसल्याने तत्काळ त्यांना रुग्णालयात हालवण्यात आले. काही वेळानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संबंधित घटनेनंतर दिंडोरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यंदा परतीचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच गारपीटीचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना बसल्याने आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांवरचा आर्थिक बोजा वाढण्याचे संकट आहे.

देशमुख यांच्या मृत्यूनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने 100 टक्के नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱयांकडून होत आहे.


नाशिक - दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील संजय भास्कर देशमुख या शेतकऱ्याने अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानमुळे न्यूऑन नामक विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

देशमुख यांच्यावर मोहाडी कार्यकारी सहकारी सोसायटीचे कर्ज असून, इतरही काही बँकांचे कर्ज असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्याकडे दीड एकर जमिनीवर द्राक्ष बाग होती. अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

गुरुवारी (31 नोव्हेंबर)ला रात्रीचे जेवण झाल्यानंतर घराबाहेरील जागेत संजय देशमुख झोपले होते. सकाळी मुलगा उठल्यानंतर त्याने वडिलांच्या तोंडातून फेस येत असल्याचे पाहिले. यावेळी त्याला वडिलांच्या बाजूलाच न्यूऑन औषधाची बाटली पडल्याचे दिसल्याने तत्काळ त्यांना रुग्णालयात हालवण्यात आले. काही वेळानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संबंधित घटनेनंतर दिंडोरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यंदा परतीचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच गारपीटीचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना बसल्याने आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांवरचा आर्थिक बोजा वाढण्याचे संकट आहे.

देशमुख यांच्या मृत्यूनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने 100 टक्के नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱयांकडून होत आहे.

Intro:दिंडोरी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यानी आत्महत्या करत संपवली जीवनयात्रा...


Body:दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील संजय भास्कर देशमुख या शेतकऱ्याने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे
न्यूऑन नावाचे विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली,

एक दिवाळीत अवकाळी पावसाने हाहाकार केला आहे...या अवकाळी पावसाचा फटका नाशिक जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना बसला आहे,गारपीट अवकाळी पावसाचा फटका सर्वाधिक द्राक्ष बागांना बसलाय,आता कर्जबाजारी होऊन द्राक्षबागा जगविण्याचे काम शेतकरी करीत आहे...द्राक्षबागेच्या नुकसानीमुळे दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील संजय भास्कर देशमुख वय 48 या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली, या शेतकऱ्यावर मोहाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे कर्ज असून इतरही काही बँकांचे कर्ज असल्याचं सांगण्यात येत आहे, या शेतकऱ्याकडे दीड एकर द्राक्ष बाग होती अवकाळी चा फटका द्राक्ष बागेला बसल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले ,

काल गुरुवार 31 नोव्हेंबर रोजी रात्री जेवण झाल्यानंतर बाहेरच्या जागेत संजय देशमुख झोपी गेले, सकाळी मुलगा उठल्यावर वडिलांच्या तोंडातून फेस आल्याचे लक्षात आले...त्यांच्या बाजूलाच न्यूऑन औषधाची बाटली पडल्याचे दिसून आलं..या नंतर दिंडोरी पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे..ह्यावेळी मृत संजय यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले,यावेळी परिसरात शेतकरी आत्महत्या मुळे हळहळ व्यक्त केली जाते असून
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने 100 टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतात आहे..


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.