ETV Bharat / state

नाशिक: अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

author img

By

Published : Dec 16, 2019, 6:15 PM IST

नवनाथ यांच्याकडे कुंदेवाडी येथे वडिलांच्या नावावर असलेल्या क्षेत्रात 3 एकर द्राक्ष बाग आहे. या द्राक्षबागेचे संगोपन नवनाथ आहेर करत होते. गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने त्यांच्या द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले.

farmer-committed-suicide-in-nshik
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

नाशिक- येथील कुंदेवाडी मधील तरुण शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अवकाळी पावसाने द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला हे टोकाचे पाऊल उचलावे लागले आहे. नवनाथ शिवाजी आहेर (वय३४) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा- मैत्रिणीने बोलावले असल्याचा बहाणा करत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नवनाथ यांच्यांकडे कुंदेवाडी येथे वडिलांच्या नावावर असलेल्या क्षेत्रात 3 एकर द्राक्ष बाग आहे. या द्राक्षबागेचे संगोपन नवनाथ आहेर करत होते. गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने त्यांच्या द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले. द्राक्ष लागवडीसाठी त्यानंतरच्या मशागतीसाठी त्यांनी मोठा खर्च केला. खर्च कसा फिटणार या विवंचनेत ते सतत होते. दरम्यान, रविवारी सकाळी 7 च्या सुमारास द्राक्षबागेत विषारी औषध त्यांनी घेतले. त्यांना तातडीने नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील तरुण शेतकरी द्राक्ष शेती करतात. मात्र, सतत तीन-चार वर्षापासून आस्मानी, सुलतानी संकटामुळे येथील शेतकरी संकटात सापडला आहे. नवनाथ आहेर यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबावर संकट कोसळले आहे. नवनाथ आहेर यांच्या मागे 2 मुले, पत्नी,आई, भाऊ असा परिवार आहे.

नाशिक- येथील कुंदेवाडी मधील तरुण शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अवकाळी पावसाने द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला हे टोकाचे पाऊल उचलावे लागले आहे. नवनाथ शिवाजी आहेर (वय३४) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा- मैत्रिणीने बोलावले असल्याचा बहाणा करत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नवनाथ यांच्यांकडे कुंदेवाडी येथे वडिलांच्या नावावर असलेल्या क्षेत्रात 3 एकर द्राक्ष बाग आहे. या द्राक्षबागेचे संगोपन नवनाथ आहेर करत होते. गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने त्यांच्या द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले. द्राक्ष लागवडीसाठी त्यानंतरच्या मशागतीसाठी त्यांनी मोठा खर्च केला. खर्च कसा फिटणार या विवंचनेत ते सतत होते. दरम्यान, रविवारी सकाळी 7 च्या सुमारास द्राक्षबागेत विषारी औषध त्यांनी घेतले. त्यांना तातडीने नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील तरुण शेतकरी द्राक्ष शेती करतात. मात्र, सतत तीन-चार वर्षापासून आस्मानी, सुलतानी संकटामुळे येथील शेतकरी संकटात सापडला आहे. नवनाथ आहेर यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबावर संकट कोसळले आहे. नवनाथ आहेर यांच्या मागे 2 मुले, पत्नी,आई, भाऊ असा परिवार आहे.

Intro:निफाड

अवकाळी पावसाने द्राक्ष बागेचे नुकसान व त्यामुळे वाया गेलेला खर्च यामुळे व्यथित झालेल्या कुंदेवाडी ता निफाड येथील तरुण शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे Body:नवनाथ शिवाजी आहेर (३४) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे कुंदेवाडी येथे वडिलांच्या नावावर असलेल्या क्षेत्रात 3 एकर द्राक्ष बाग आहे या द्राक्षबागेचे संगोपन नवनाथ आहेर करायचे गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने त्यांच्या द्राक्षबागेचे संपूर्ण नुकसान झाले त्यामुळे खर्च कसा फिटणार या विवंचनेत ते सतत होते असे त्यांच्या मित्रपरिवाराने सांगितले, रविवारी सकाळी 7 च्या सुमारास द्राक्षबागेत निऑन नावाचे विषारी औषध त्यांनी घेतले त्यांना तातडीने नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला Conclusion:निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील तरुण शेतकरी द्राक्ष शेती करत असताना सतत तीन-चार वर्षापासून आसमानी संकटामुळे व यावर्षी सतत पाऊस पडल्याने कर्ज वाढल्याने व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे या कर्जात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली नवनाथ आहेर यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबावर संकट कोसळले आहे नवनाथ आहेर यांच्यां पाश्च्यांत 2 मुले,पत्नी,आई ,भाऊ असा परिवार आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.