ETV Bharat / state

नाशिकमधील घाऊक बाजारात कांद्याचे भाव घसरले; शेतकरी चिंताग्रस्त

author img

By

Published : Dec 21, 2019, 2:37 PM IST

नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये आज कांद्याचे भाव कोसळले. आज जास्तीत जास्त 6435 रुपये तर सरासरी 5000 रुपये इतका भाव मिळत आहे.

Falling onion rate in nashik
नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव घसरले; शेतकरी चिंताग्रस्त

नाशिक - बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून, सरासरी भावात 1 क्विंटल मागे 2500 रुपयांची तर जास्तीत जास्त भावात 2635 रुपयांनी भाव कोसळले आहेत. चार दिवसांपूर्वी कांद्याला प्रति क्विंटल जास्तीत जास्त 9100 रुपये तर सरासरी 7500 रुपये इतका भाव मिळाला होता. अवघ्या 4 दिवसात भावात मोठी घसरण झाल्याचे पाहून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव घसरले; शेतकरी चिंताग्रस्त

हेही वाचा -आपल्यात आता कोणतेही नाते उरले नाही... नात्यांचे तसे ओझेच होते, तेही उतरले!

नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये आज कांद्याचे भाव कोसळले. आज जास्तीत जास्त 6435 रुपये तर सरासरी 5000 रुपये इतका भाव मिळत आहे. असून आवक जास्त तर मागणी कमी असल्यामुळे भावात घसरण होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. गेल्या चार दिवसाच्या तुलनेत आज भावात मोठी घसरण झाली असून आधीच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असल्याने त्यातून थोड्या प्रमाणात कांद्याला चांगला भाव मिळून दोन पैसे मिळक होते. मात्र, सरकारने विदेशातून कांदा आयात करून कांद्याचे भाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

जेव्हा भाव वाढतात तेव्हा सर्वजण ओरडत असतात मात्र भाव कमी झाल्यास कोणीच बोलण्यास तयार नसते यामुळे शेतकरी मोठया प्रमाणावर नाराज झाला आहे. गेल्या चार दिवसांत कांद्याला अत्यंत कमी भाव मिळाला असून अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांना उत्पन्न घेण्यासाठी लागलेले पैसेही मिळणार नाहीत. अशी भिती आता शेतकऱ्यांना वाटून लागली आहे.

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये मागील चार ते पाच दिवसांत असलेल्या कांद्याच्या भावात आज मोठ्या प्रमाणावर घसरण बघायला मिळाली आधीच एकरामागे उत्पादन घटले त्यात चांगले असलेले भाव कोसळले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून सरकारने कांद्याची आयात बंद करून निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी संतप्त शेतकरी करत आहे.

हेही वाचा - विद्यार्थ्यांकडून गटारांची साफसफाई; संबंधीतांवर कारवाईचे आदेश

नाशिक - बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून, सरासरी भावात 1 क्विंटल मागे 2500 रुपयांची तर जास्तीत जास्त भावात 2635 रुपयांनी भाव कोसळले आहेत. चार दिवसांपूर्वी कांद्याला प्रति क्विंटल जास्तीत जास्त 9100 रुपये तर सरासरी 7500 रुपये इतका भाव मिळाला होता. अवघ्या 4 दिवसात भावात मोठी घसरण झाल्याचे पाहून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव घसरले; शेतकरी चिंताग्रस्त

हेही वाचा -आपल्यात आता कोणतेही नाते उरले नाही... नात्यांचे तसे ओझेच होते, तेही उतरले!

नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये आज कांद्याचे भाव कोसळले. आज जास्तीत जास्त 6435 रुपये तर सरासरी 5000 रुपये इतका भाव मिळत आहे. असून आवक जास्त तर मागणी कमी असल्यामुळे भावात घसरण होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. गेल्या चार दिवसाच्या तुलनेत आज भावात मोठी घसरण झाली असून आधीच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असल्याने त्यातून थोड्या प्रमाणात कांद्याला चांगला भाव मिळून दोन पैसे मिळक होते. मात्र, सरकारने विदेशातून कांदा आयात करून कांद्याचे भाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

जेव्हा भाव वाढतात तेव्हा सर्वजण ओरडत असतात मात्र भाव कमी झाल्यास कोणीच बोलण्यास तयार नसते यामुळे शेतकरी मोठया प्रमाणावर नाराज झाला आहे. गेल्या चार दिवसांत कांद्याला अत्यंत कमी भाव मिळाला असून अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांना उत्पन्न घेण्यासाठी लागलेले पैसेही मिळणार नाहीत. अशी भिती आता शेतकऱ्यांना वाटून लागली आहे.

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये मागील चार ते पाच दिवसांत असलेल्या कांद्याच्या भावात आज मोठ्या प्रमाणावर घसरण बघायला मिळाली आधीच एकरामागे उत्पादन घटले त्यात चांगले असलेले भाव कोसळले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून सरकारने कांद्याची आयात बंद करून निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी संतप्त शेतकरी करत आहे.

हेही वाचा - विद्यार्थ्यांकडून गटारांची साफसफाई; संबंधीतांवर कारवाईचे आदेश

Intro:ब्रेकिंग
मनमाड:-बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून सरासरी भावात क्विंटल मागे 2500 रुपयांची तर जास्तीत जास्त भावात 2635 रुपयांनी भाव कोसळले आहेत चार दिवसा पूर्वी कांद्याला प्रति क्विंटल जास्तीत जास्त 9100 रुपये तर सरासरी 7500 रुपये इतका भाव मिळाला होता आज जास्तीत जास्त 6435 रुपये तर सरासरी 5000 रुपये इतका भाव मिळाला आहे अवघ्या 4 दिवसात भावात मोठी घसरण झाल्याचे पाहून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून आवक जास्त तर मागणी कमी असल्यामुळे भावात घसरण होत असल्याचे व्यापारी सांगत असले तरी सरकारने विदेशातुन कांद्याची केलेली आवक मुख्य कारण मानले जात आहे.Body:नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये आज कांद्याचे भाव कोसळले गेल्या चार दिवसाच्या तुलनेत आज भावात मोठी घसरण झाली असुन आधीच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असल्याने त्यातून थोड्या प्रमाणात कांद्याला चांगला भाव मिळून दोन पैसे पदरात पडत होते मात्र सरकारने विदेशातून कांदा आयात करून कांद्याचे भाव कमी करण्याचा प्रयत्न चालवला आहे जेव्हा भाव वाढतात तेव्हा सर्वजण ओरडत असतात मात्र भाव कमी झाल्यास कोणीच बोलण्यास तयार नसते यामुळे शेतकरी मोठया प्रमाणावर नाराज झाला आहे.गेल्या चार दिवसांत कांद्याला अत्यंत कमी भाव मिळाला असुन अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांना उत्पन्न घेण्यासाठी लागलेले पैसेही मिळणार नाही.Conclusion:नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये मागील चार ते पाच दिवसांत असलेल्या कांद्याच्या भावात आज मोठ्या प्रमाणावर घसरण बघायला मिळाली आधीच एकरामागे उत्पादन घटले त्यात चांगले असलेले भाव कोसळले आहे.यामुळे शेतकरी संकटात सापडला असुन सरकारने कांद्याची आयात बंद करून निर्यात बंदी उठवावी अशी मागणी संतप्त शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
बाईट
१.बाळासाहेब पाटील शेतकरी
२.आनंदा वाघमोडे शेतकरी
३.नाना उगले शेतकरी
आमिन शेख मनमाड नांदगांव
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.