ETV Bharat / state

सततच्या पावसामुळे पिके भुईसपाट; तत्काळ नुकसान भरपाईसाठी तहसीलदारांना निवेदन - crop damaged due to heavy rain

सततच्या पावसामुळे कळवण तालुक्यातील मका पीक भुईसपाट झाले आहे. कळवण, ओतूर, मानूरसह तालुक्यातील सुमारे 700 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पंचनामेकरून तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी संघटनेने निवेदन दिले आहे.

कळवण तहसीलदारांना निवेदन
कळवण तहसीलदारांना निवेदन
author img

By

Published : Aug 17, 2020, 5:09 PM IST

नाशिक - कळवण तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे मका पीक भुई सपाट झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या नुकसानाचे शासनाने त्वरित पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत कळवण तहसीलदारांना शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी निवेदन देखील देण्यात आले आहे.

कळवण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सर्वदूर पाऊस होत आहे. या पावसामुळे कळवण तालुक्यातील ओतूर, मानूर पाळे यासह तालुक्यातील सुमारे 30 ते 40 गावांमध्ये पावसामुळे मका पीक भुईसपाट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे प्रशासनाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करावे आणि पीक विमा कंपनीच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच तारखेच्या आधी बंद पडलेल्या ऑनलाईन संकेतस्थळामुळे पीकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणीही तहसीलदार बंडू कापसे यांच्याकडे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

सततच्या पावसामुळे पीकांचे नुकसान

हेही वाचा - बदल्यांचे प्रकरण सीबीआयकडे द्या, अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल - चंद्रकांत पाटील

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कळवण तालुक्यातील सुमारे सातशे नव्वद हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा - राज्यभरात मुसळधार; अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा

नाशिक - कळवण तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे मका पीक भुई सपाट झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या नुकसानाचे शासनाने त्वरित पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत कळवण तहसीलदारांना शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी निवेदन देखील देण्यात आले आहे.

कळवण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सर्वदूर पाऊस होत आहे. या पावसामुळे कळवण तालुक्यातील ओतूर, मानूर पाळे यासह तालुक्यातील सुमारे 30 ते 40 गावांमध्ये पावसामुळे मका पीक भुईसपाट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे प्रशासनाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करावे आणि पीक विमा कंपनीच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच तारखेच्या आधी बंद पडलेल्या ऑनलाईन संकेतस्थळामुळे पीकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणीही तहसीलदार बंडू कापसे यांच्याकडे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

सततच्या पावसामुळे पीकांचे नुकसान

हेही वाचा - बदल्यांचे प्रकरण सीबीआयकडे द्या, अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल - चंद्रकांत पाटील

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कळवण तालुक्यातील सुमारे सातशे नव्वद हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा - राज्यभरात मुसळधार; अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.