ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढला; कोंबड्या केल्या नष्ट

author img

By

Published : Jan 28, 2021, 6:27 AM IST

Updated : Jan 28, 2021, 2:20 PM IST

वग्रीपाडा या आदिवासी लोकवस्तीच्या गावातील 300 कोंबड्यांचा 'बर्ड-फ्ल्यू'ने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर परिसरातील एक किलोमीटरचा परिसर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. पशुसंवर्धन विभाग व बर्ड फ्लू नियंत्रण टीम या गावात दाखल झाली आणि कलिंग ऑपरेशन दरम्यान परिसरातील जवळपास 1 हजार 192 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत.

bird flu infected 1192 hens destroying in vathoda nashik
नाशिक बर्ड फ्लू : 1 हजार 192 कोंबड्या केल्या नष्ट

सटाणा (नाशिक) - तालुक्यातील वाठोडा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वग्रीपाडा या आदिवासी लोकवस्तीच्या गावातील 300 कोंबड्यांचा 'बर्ड-फ्ल्यू'ने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर परिसरातील एक किलोमीटरचा परिसर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. पशुसंवर्धन विभाग व बर्ड फ्लू नियंत्रण टीम या गावात दाखल झाली आणि कलिंग ऑपरेशन दरम्यान परिसरातील जवळपास 1 हजार 192 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत.

बागलाणच्या पश्‍चिम आदिवासी भागात शेतकरी सुरेश महाले यांनी आर. आर. प्रजातीच्या सुमारे तीनशे कोंबड्या कुकूटपालनाचा व्यवसाय म्हणून आपल्या गावातील घरीच छोट्या शेडमध्ये ठेवल्या होत्या. या कोंबड्याचा अचानक मरू लागल्याने संशयित कोंबड्यांचे नमुने पशुधन अधिकाऱ्यांनी पुणे आणि भोपाळ येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असता या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ आदेश काढत या भागातील एक किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला.

पशुसंवर्धन विभाग व बर्ड फ्लू नियंत्रण टीम या गावात दाखल झाली झाली आणि किलिंग ऑपरेशन राबविण्यात आले. बर्ड फ्लू प्रभाव रोखण्यासाठी या भागातील 1 हजार 192 कोंबड्या पकडून एका विशिष्ट पद्धतीने प्रक्रिया करून पुरण्यात आल्या व गाव निर्जंतुक करण्यात आले.

सटाणा (नाशिक) - तालुक्यातील वाठोडा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वग्रीपाडा या आदिवासी लोकवस्तीच्या गावातील 300 कोंबड्यांचा 'बर्ड-फ्ल्यू'ने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर परिसरातील एक किलोमीटरचा परिसर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. पशुसंवर्धन विभाग व बर्ड फ्लू नियंत्रण टीम या गावात दाखल झाली आणि कलिंग ऑपरेशन दरम्यान परिसरातील जवळपास 1 हजार 192 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत.

बागलाणच्या पश्‍चिम आदिवासी भागात शेतकरी सुरेश महाले यांनी आर. आर. प्रजातीच्या सुमारे तीनशे कोंबड्या कुकूटपालनाचा व्यवसाय म्हणून आपल्या गावातील घरीच छोट्या शेडमध्ये ठेवल्या होत्या. या कोंबड्याचा अचानक मरू लागल्याने संशयित कोंबड्यांचे नमुने पशुधन अधिकाऱ्यांनी पुणे आणि भोपाळ येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असता या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ आदेश काढत या भागातील एक किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला.

पशुसंवर्धन विभाग व बर्ड फ्लू नियंत्रण टीम या गावात दाखल झाली झाली आणि किलिंग ऑपरेशन राबविण्यात आले. बर्ड फ्लू प्रभाव रोखण्यासाठी या भागातील 1 हजार 192 कोंबड्या पकडून एका विशिष्ट पद्धतीने प्रक्रिया करून पुरण्यात आल्या व गाव निर्जंतुक करण्यात आले.

हेही वाचा - नाशिक जिल्ह्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू;पहिल्या दिवशी केवळ 25 टक्के उपस्थिती

हेही वाचा - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 29 जानेवारीला ऑनलाइन दीक्षांत समारंभ

Last Updated : Jan 28, 2021, 2:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.