ETV Bharat / state

गंगेच्या पात्रात शव वाहण्याचे पाप मोदी सरकारचेच, बाळासाहेब थोरातांचा भाजपवर हल्ला बोल

author img

By

Published : May 30, 2021, 2:07 PM IST

केंद्रातील मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त देशभरात काॅंग्रेसकडून रविवारी (दि. ३०) आंदोलन करण्यात आले. थोरात यांनी एमजीरोड येथील शहर काॅंग्रेस कमिटी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी देशात कोरोनाचा जो उद्रेक झाला त्यास केंद्रातील भाजप सरकार जबाबदार आहे. असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

Balasaheb Thorat attacked on BJP In Nashik
बाळासाहेब थोरातांचा पत्रकार परिषदेत भाजपवर हल्ला बोल

नाशिक - कोरोना संकटाबाबत मोदी सरकार गंभीर दिसत नसून त्यांचे वागणे हे बेफिकिरीचे आहे. कोरोनाचे संकट हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले. देशात कोरोनाचा जो उद्रेक झाला त्यास केंद्रातील भाजप सरकार जबाबदार आहे. गंगेच्या पात्रात अनेकांचे शवं वाहत होते. हे पाप मोदी सरकारचे असल्याचा घणाघात काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

बाळासाहेब थोरातांचा पत्रकार परिषदेत भाजपवर हल्ला बोल

थोरातांनी लावले मोदींवर गंभीर आरोप -

केंद्रातील मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त देशभरात काॅंग्रेसकडून रविवारी (दि. ३०) आंदोलन करण्यात आले. थोरात यांनी एमजीरोड येथील शहर काॅंग्रेस कमिटी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी केंद्र सरकारवर त्यांनी हल्लाबोल केला. मोदी सरकारने मोठी आश्वासने दिली होती. १५ लाख रुपये खात्यावर देऊ, काळा पैसा परत आणू, महागाई कमी करु असे सांगितले. पण आता पेट्रोल शंभर पार झाले. एलपीजी गॅस नऊशेवर गेला. खाद्यतेल दोनशे रुपये लिटरवर झाले. कामगार कायद्यामध्ये बदल करताना कामगारांऐवजी मालकांना विचारात घेतले गेले. दिल्लीत शेतकरी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला गेला. कोरोना संकट येणार काळजी घ्या हे राहुल गांधी यांनी आधीच सांगितले. पण त्यांचे ऐकले नाही आणि कोरोना वाढला. थाळ्या वाजवणे, दिवे लावणे हा उपाय नव्हता. निवडणुकीचे मेळावे, धार्मिक मेळावे यामुळे कोरोना वाढला. असे गंभीर आरोप या वेळी थोरात यांनी केले आहे.

मतभेद असल्याच्या अफवा विरोधक पसरवत आहेत -

राज्य सरकारमधील घटक पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाही. मतभेद असल्याच्या अफवा विरोधक पसरवत आहेत, परंतु आम्ही प्रत्येक वेळी चर्चेतून मार्ग काढत असतो, असा दावा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, देशांमध्ये तेलाच्या किमती वाढण्यामागे केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे. त्यांनी आपले धोरण बदलावे म्हणजे किमती कमी होतील.

लस नसताना कोणत्या आधारावर लस महोत्सव? -

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती अतिशय चागल्या पध्दतीने अरोग्य विभागाने हाताळी आहे. त्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे. आणि महाराष्ट्र राज्याचे कौतुक देखील केले आहे. परंतु राज्याचे काही विरोधक यांच्या डोळ्यांमध्ये ही गोष्ट एखाद्या काट्याप्रमाणे खुजली अजून त्यांना फक्त राज्य सरकारचे अपयश दिसत आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेसाठी केंद्र सरकार सर्वस्वी जबाबदार आहे. लस नसताना कोणत्या आधारावर लस महोत्सव जाहीर केला, असा जाब त्यांनी विचारला. लसीकरणासाठी अॅप तयार केले गेले. तरी देखील सावळा गोंधळ सुरु आहे. पंतप्रधान मोदींनी स्वत:ची प्रतिमा मोठी करण्यासाठी दुसऱ्या देशाला लस दिली, अशी टीका थोरात यांनी केली आहे.

फडणवीसांना नाव न घेता लगावला टोला -

तौक्ते चक्रीवादळ नूकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान मोदी गुजरातला गेले. तिकडे हेलिकॉप्टर फिरले. भाजपवाल्यांनी विचारायला हवे मोदी गुजरातला जाता महाराष्ट्रात का नाही? महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांचा महाराष्ट्र द्रोह उघड दिसतो. अशी टिका थोरात यांनी फडणवीसांचे नाव न घेता केली आहे.

हेही वाचा - निवडणुका जिंकण्यासाठी वापरलेले 'टुलकीट' आता भाजपावर उलटले - संजय राऊत

नाशिक - कोरोना संकटाबाबत मोदी सरकार गंभीर दिसत नसून त्यांचे वागणे हे बेफिकिरीचे आहे. कोरोनाचे संकट हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले. देशात कोरोनाचा जो उद्रेक झाला त्यास केंद्रातील भाजप सरकार जबाबदार आहे. गंगेच्या पात्रात अनेकांचे शवं वाहत होते. हे पाप मोदी सरकारचे असल्याचा घणाघात काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

बाळासाहेब थोरातांचा पत्रकार परिषदेत भाजपवर हल्ला बोल

थोरातांनी लावले मोदींवर गंभीर आरोप -

केंद्रातील मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त देशभरात काॅंग्रेसकडून रविवारी (दि. ३०) आंदोलन करण्यात आले. थोरात यांनी एमजीरोड येथील शहर काॅंग्रेस कमिटी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी केंद्र सरकारवर त्यांनी हल्लाबोल केला. मोदी सरकारने मोठी आश्वासने दिली होती. १५ लाख रुपये खात्यावर देऊ, काळा पैसा परत आणू, महागाई कमी करु असे सांगितले. पण आता पेट्रोल शंभर पार झाले. एलपीजी गॅस नऊशेवर गेला. खाद्यतेल दोनशे रुपये लिटरवर झाले. कामगार कायद्यामध्ये बदल करताना कामगारांऐवजी मालकांना विचारात घेतले गेले. दिल्लीत शेतकरी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला गेला. कोरोना संकट येणार काळजी घ्या हे राहुल गांधी यांनी आधीच सांगितले. पण त्यांचे ऐकले नाही आणि कोरोना वाढला. थाळ्या वाजवणे, दिवे लावणे हा उपाय नव्हता. निवडणुकीचे मेळावे, धार्मिक मेळावे यामुळे कोरोना वाढला. असे गंभीर आरोप या वेळी थोरात यांनी केले आहे.

मतभेद असल्याच्या अफवा विरोधक पसरवत आहेत -

राज्य सरकारमधील घटक पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाही. मतभेद असल्याच्या अफवा विरोधक पसरवत आहेत, परंतु आम्ही प्रत्येक वेळी चर्चेतून मार्ग काढत असतो, असा दावा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, देशांमध्ये तेलाच्या किमती वाढण्यामागे केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे. त्यांनी आपले धोरण बदलावे म्हणजे किमती कमी होतील.

लस नसताना कोणत्या आधारावर लस महोत्सव? -

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती अतिशय चागल्या पध्दतीने अरोग्य विभागाने हाताळी आहे. त्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे. आणि महाराष्ट्र राज्याचे कौतुक देखील केले आहे. परंतु राज्याचे काही विरोधक यांच्या डोळ्यांमध्ये ही गोष्ट एखाद्या काट्याप्रमाणे खुजली अजून त्यांना फक्त राज्य सरकारचे अपयश दिसत आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेसाठी केंद्र सरकार सर्वस्वी जबाबदार आहे. लस नसताना कोणत्या आधारावर लस महोत्सव जाहीर केला, असा जाब त्यांनी विचारला. लसीकरणासाठी अॅप तयार केले गेले. तरी देखील सावळा गोंधळ सुरु आहे. पंतप्रधान मोदींनी स्वत:ची प्रतिमा मोठी करण्यासाठी दुसऱ्या देशाला लस दिली, अशी टीका थोरात यांनी केली आहे.

फडणवीसांना नाव न घेता लगावला टोला -

तौक्ते चक्रीवादळ नूकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान मोदी गुजरातला गेले. तिकडे हेलिकॉप्टर फिरले. भाजपवाल्यांनी विचारायला हवे मोदी गुजरातला जाता महाराष्ट्रात का नाही? महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांचा महाराष्ट्र द्रोह उघड दिसतो. अशी टिका थोरात यांनी फडणवीसांचे नाव न घेता केली आहे.

हेही वाचा - निवडणुका जिंकण्यासाठी वापरलेले 'टुलकीट' आता भाजपावर उलटले - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.