नाशिक - श्रीनगर येथे कर्तव्य बजावत असताना जवान सागर चौधरी यांचा त्यांच्याकडील बंदुकीची गोळी लागल्याने अपघाती मृत्यू झाला. सागर हे आई वडिलांना एकुलते एक होते. सागर यांच्या जाण्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ते निफाड तालुक्यातील भडवस गावचे रहिवाशी आहेत.
जवान सागर यांचे पार्थिव विशेष विमानाने नाशिकला येणार आहे. सागर चौधरी यांच्यावर भडवस या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.