ETV Bharat / state

अंतापूर येथून ४० गोणी कांदा चोरी; शेतकऱ्याला १ लाख २५ हजाराचे नुकसान - Baglan Taluka Onion Theft Case News

कांद्यासोबत भेळ-भत्त्यावर ताव मारून चोरट्यांनी अंतापूर येथून ४० गोणी कांदा चोरून नेला. चोरट्यांच्या या कारणाम्यामुळे शेतकऱ्याला जवळपास १ लाख २५ हजार रुपयांचा भुर्दंड बसला आहे. मुस्ताक शेख असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

अंतापूर येथून ४० गोणी कांदा चोरी
author img

By

Published : Nov 5, 2019, 3:41 PM IST

नाशिक - कांद्यासोबत भेळ-भत्त्यावर ताव मारून चोरट्यांनी अंतापूर येथून ४० गोणी कांदा चोरून नेला. चोरट्यांच्या या कारणाम्यामुळे शेतकऱ्याला जवळपास १ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मुस्ताक शेख असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

कांद्याला सोन्यासारखा भाव आल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा कांदा चोरीकडे वळविला आहे. बागलाण तालुक्यातील ताहाराबाद-अंतापूर रस्त्यावर रावेर शिवारातील गट नंबर २३ मधील रस्त्यालगत मुस्ताक शेख यांची कांद्याची चाळ आहे. यात त्यांनी काही कांदा राखून ठेवला होता. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चाळीत प्रवेश करून प्रथम सोबत आणलेल्या भेळ भत्त्यावर ताव मारला व नंतर चाळीत साठवून ठेवलेल्या ६२ कांदा गोणींपैकी ४० गोणी कांदा सोबत आणलेल्या वाहनात टाकून पोबारा केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी शेख शेतात आल्यानंतर त्यांना लोखंडी गेटची साखळी व कुलूप तोडून कांद्याची चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी खाललेल्या पोत्यातील मुरमुरे व कांद्याची टरफले पडलेली त्यांना आढळून आली. त्यांनी या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. याआधी अंतापूर-मुल्हेर रस्त्यावरील आनंदा लाला गवळी यांच्या गट नंबर ३४७ मध्ये उभ्या असलेल्या दोन ट्रॅक्टरच्या बॅटरी, संजय पान पाटील यांच्या विस शेळ्या, साहेबराव साताळे यांची एक मोटरसायकल, यांच्यासह अनेक शेती उपयोगी साहित्य चोरीस गेले आहे. आधीच शेतकरी अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडले असतानाच चोरटे आता कांदे व शेती उपयोगी साहित्य व उत्पादने चोरी करू लागल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

हेही वाचा- आदित्य ठाकरेंचा नाशिक दौरा; ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

नाशिक - कांद्यासोबत भेळ-भत्त्यावर ताव मारून चोरट्यांनी अंतापूर येथून ४० गोणी कांदा चोरून नेला. चोरट्यांच्या या कारणाम्यामुळे शेतकऱ्याला जवळपास १ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मुस्ताक शेख असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

कांद्याला सोन्यासारखा भाव आल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा कांदा चोरीकडे वळविला आहे. बागलाण तालुक्यातील ताहाराबाद-अंतापूर रस्त्यावर रावेर शिवारातील गट नंबर २३ मधील रस्त्यालगत मुस्ताक शेख यांची कांद्याची चाळ आहे. यात त्यांनी काही कांदा राखून ठेवला होता. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चाळीत प्रवेश करून प्रथम सोबत आणलेल्या भेळ भत्त्यावर ताव मारला व नंतर चाळीत साठवून ठेवलेल्या ६२ कांदा गोणींपैकी ४० गोणी कांदा सोबत आणलेल्या वाहनात टाकून पोबारा केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी शेख शेतात आल्यानंतर त्यांना लोखंडी गेटची साखळी व कुलूप तोडून कांद्याची चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी खाललेल्या पोत्यातील मुरमुरे व कांद्याची टरफले पडलेली त्यांना आढळून आली. त्यांनी या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. याआधी अंतापूर-मुल्हेर रस्त्यावरील आनंदा लाला गवळी यांच्या गट नंबर ३४७ मध्ये उभ्या असलेल्या दोन ट्रॅक्टरच्या बॅटरी, संजय पान पाटील यांच्या विस शेळ्या, साहेबराव साताळे यांची एक मोटरसायकल, यांच्यासह अनेक शेती उपयोगी साहित्य चोरीस गेले आहे. आधीच शेतकरी अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडले असतानाच चोरटे आता कांदे व शेती उपयोगी साहित्य व उत्पादने चोरी करू लागल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

हेही वाचा- आदित्य ठाकरेंचा नाशिक दौरा; ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Intro:नाशिक/सटाणा
जयवंत खैरनार(10025)

"कांद्या सोबत भेळ भत्त्यावर ताव मारून चोरट्यांनी अंतापूर येथून ४० गोणी कांदा चोरून नेला. आधीच अवकाळी पावसाच्या माऱ्याने हैराण असलेल्या शेतकऱ्याला चोरट्यांच्या या कारणाम्यामुळे जवळपास १ ते सव्वा लाख रुपयांचा भुर्दंड बसला आहे.
Body:कांद्याला सोन्या सारखा भाव आल्याने, चोरट्यांनी आता आपला मोर्चा कांदा चोरीकडे वळविला आहे. बागलाण तालुक्यातील अंतापूर येथील रावेर शिवारातुन मुस्ताक इसाक शेख यांच्या कांदा चाळीतून जवळपास १ लाख २५ हजार रुपये किमतीचे कांदे चोरट्यांनी लांबविल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत जायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बागलाण तालुक्यातील ताहाराबाद- अंतापुर रस्त्यावरील रावेर शिवारातील गट नंबर २३ मधील रस्त्यालगत मुस्ताक शेख यांची कांद्याची चाळ आहे. यात त्यांनी काही कांदा राखून ठेवला होता. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास प्रथम सोबत आणलेल्या भेळ भत्त्यावर कांद्याबरोबर ताव मारला व नंतर चाळीत साठवून ठेवलेल्या ६२ कांदा गोणींपैकी ४० गोणी कांदा सोबत आणलेल्या वाहनात टाकून पोबारा केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी शेख शेतात आल्यानंतर त्यांना लोखंडी गेटचे साखळी व कुलूप तोडून कांद्याची चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी खाल्लेल्या भत्यातील मुरमुरे व कांद्याची टरफले येथे पडलेली त्यांना आढळून आली. त्यांनी या घटनेबाबत पोलीसांना माहिती दिली. Conclusion:याआधी अंतापुर- मुल्हेर रस्त्यावरील आनंदा लाला गवळी यांच्या गट नंबर ३४७ मध्ये उभ्या असलेल्या दोन ट्रॅक्टरच्या बॅटरी , संजय पानपाटील यांच्या विस शेळ्या, साहेबराव साताळे यांची एक मोटरसायकल ,यांच्यासह अनेक शेती उपयोगी साहित्य, चोरीस गेले आहे. आधीच शेतकरी अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडले असतांनाच चोरटे आता कांदे व शेतीउपयोगी साहित्य व उत्पादने चोरी करू लागल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
# फोटो - कांद्याची चोरी झालेली चाळ दाखवताना शेतकरी.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.