ETV Bharat / state

नाशकातील सटाण्यात दुष्काळाचा पहिला बळी; पाणी आणताना टँकरखाली येऊन अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू

सटाणा तालुक्यातील विरगाव येथे शिकणाऱ्या या अकरा वर्षांच्या मुलाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. परिसरात सध्या पाणीबाणीची परिस्थिती आहे. पाणी आणताना मुलाचा झालेला मृत्यू, ही तालुक्यातील दुष्काळाचा पहिला बळी ठरली आहे.

author img

By

Published : Jun 6, 2019, 1:35 PM IST

नाशकातील सटाण्यात दुष्काळाचा पहिला बळी

नाशिक - सटाणा तालुक्यात दुष्काळाचा आणखी एक बळी गेल्याची घटना घडली आहे. वटार येथे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मामाच्या शेतातून पिण्याचे पाणी आणताना एका ११ वर्षीय मुलाचा टँकरखाली येऊन मृत्यू झाला. अक्षय नंदू गांगुर्डे, असे मृत मुलाचे नाव आहे.

सटाणा तालुक्यातील विरगाव येथे शिकणाऱ्या या अकरा वर्षांच्या मुलाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. परिसरात सध्या पाणीबाणीची परिस्थिती आहे. पाणी आणताना मुलाचा झालेला मृत्यू, ही तालुक्यातील दुष्काळाचा पहिला बळी ठरली आहे. अक्षय नंदू गांगुर्डे सकाळी सात वाजताच्या सुमारास वडिलांसोबत वटार येथे मामाच्या मळ्यात टँकर भरण्यासाठी गेला होता. यावेळी परत येताना अक्षयचा तोल गेला आणि त्याचा टँकरखाली येऊन मृत्यू झाला.

या घटनेमुळे सटाणा तालुक्यातील वीरगाववर शोककळा पसरली आहे. पाण्यासाठी एका अकरा वर्षीय मुलाला जीव गमवावा लागल्यामुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

नाशिक - सटाणा तालुक्यात दुष्काळाचा आणखी एक बळी गेल्याची घटना घडली आहे. वटार येथे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मामाच्या शेतातून पिण्याचे पाणी आणताना एका ११ वर्षीय मुलाचा टँकरखाली येऊन मृत्यू झाला. अक्षय नंदू गांगुर्डे, असे मृत मुलाचे नाव आहे.

सटाणा तालुक्यातील विरगाव येथे शिकणाऱ्या या अकरा वर्षांच्या मुलाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. परिसरात सध्या पाणीबाणीची परिस्थिती आहे. पाणी आणताना मुलाचा झालेला मृत्यू, ही तालुक्यातील दुष्काळाचा पहिला बळी ठरली आहे. अक्षय नंदू गांगुर्डे सकाळी सात वाजताच्या सुमारास वडिलांसोबत वटार येथे मामाच्या मळ्यात टँकर भरण्यासाठी गेला होता. यावेळी परत येताना अक्षयचा तोल गेला आणि त्याचा टँकरखाली येऊन मृत्यू झाला.

या घटनेमुळे सटाणा तालुक्यातील वीरगाववर शोककळा पसरली आहे. पाण्यासाठी एका अकरा वर्षीय मुलाला जीव गमवावा लागल्यामुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Intro:नाशिक मधील सटाणा तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासाठी एका चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची हद्यद्रावक घटना आज सकाळी घडलीय


Body:सटाणा तालुक्यातील वटार येथुन आज सकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या मामाच्या शेतातून पिण्यासाठी पाणी वाहतूक करत असताना स्वमालकीच्या टँकर खाली दबुन अक्षय नंदु गांगुर्डे वय.11 ह्या लहान चिमुरड्याचा मृत्यू झालाय अक्षय हा आज सकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या वडिलांसमवेत वटार येथे मामाच्या मळ्यात पाण्याचे टँकर भरण्यासाठी गेला होता यावेळी परत येत असताना अक्षयचा तोल गेल्याने तो खाली पडून त्याचे अपघाती निधन झाले यामुळे सटाणा तालुक्यातील वीरगाव गावावर शोककळा पसरली आहे पाण्यासाठी अशा गंभिर पद्धतीने जिव गमल्यामुळे समुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्‍तहोत आहे


Conclusion:अक्षय हा अकरा वर्षाचा असून इयत्ता पाचवी शिक्षण घेत होता सटाणा तालुक्यातील वीरगाव परिसरात सध्या पाणी बाणी झाली असताना घडलेली ही घटना तालुक्यात दुष्काळाचा पहिला बळी घेणारी ठरली आहे

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.