ETV Bharat / state

कोरोनाच्या युद्धात आता शाळकरी विद्यार्थ्यांचे योगदान; हजारो मास्क शिवून वाटप

author img

By

Published : May 29, 2020, 3:32 PM IST

ग्रामीण भागातील नागरिकांना शास्त्रयुक्त पद्धतीने हात धुण्याचे प्रात्यक्षिक त्या विद्यार्थ्यांनी करून दाखवले. त्याचसोबत योग्य अंतर ठेवत त्यांनी नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर पडू नका, बाहेर निघताना मास्कचा वापर करा, असे आवाहन केले.

made mask
कोरोनाच्या युद्धात आता शाळकरी विद्यार्थ्यांचे योगदान

नंदुरबार - जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर ग्रामीण भागात नागरिकांची काळजी घेण्यासाठी शाळकरी विद्यार्थी पुढे आले आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतः कापड आणून त्याचे मास्क शिवून गरजवंतांना वाटप करून जनजागृती केली.

शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सर्वोदय विद्यालयाचा स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांनी पुढे येत स्वत: मास्क शिवून त्यांचे वाटप आदिवासी वस्त्यांम्ध्ये गरजवंत नागरिकांना करण्यात आले. या विद्यार्थ्यांनी एकत्र येत मास्क शिवत हजारो नागरिकांना मास्क वाटप केले असून, याचसोबत प्रकाशा परिसरातील आदिवासी वस्तीमध्ये जाऊन स्थानिक बोलीभाषेत कोरोना संदर्भात काळजी घेण्याच्या संदर्भात आवाहन त्यांनी केले.

कोरोनाच्या युद्धात आता शाळकरी विद्यार्थ्यांचे योगदान

ग्रामीण भागातील नागरिकांना शास्त्रयुक्त पद्धतीने हात धुण्याचे प्रात्यक्षिक त्या विद्यार्थ्यांनी करून दाखवले. त्याचसोबत योग्य अंतर ठेवत त्यांनी नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर पडू नका, बाहेर निघताना मास्कचा वापर करा, असे आवाहन केले.

कोरोना विरोधाच्या या युद्धात आता ग्रामीण भागात शाळकरी विद्यार्थी समोर आले आहेत. आदिवासी वाड्या व पाड्यातील नागरिकांना कोरोनाविषयी विद्यार्थी व शिक्षकांनी जनजागृती त्यांच्याच बोलीभाषेत समजून सांगितली. जेणेकरून आदिवासी वस्तीमध्ये कोरोनाचा शिरकाव होणार नाही. विद्यार्थ्यांनी स्वत: मास्क शिवून वाटप करत एक नवा आदर्श उभा केला आहे.

नंदुरबार - जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर ग्रामीण भागात नागरिकांची काळजी घेण्यासाठी शाळकरी विद्यार्थी पुढे आले आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतः कापड आणून त्याचे मास्क शिवून गरजवंतांना वाटप करून जनजागृती केली.

शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सर्वोदय विद्यालयाचा स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांनी पुढे येत स्वत: मास्क शिवून त्यांचे वाटप आदिवासी वस्त्यांम्ध्ये गरजवंत नागरिकांना करण्यात आले. या विद्यार्थ्यांनी एकत्र येत मास्क शिवत हजारो नागरिकांना मास्क वाटप केले असून, याचसोबत प्रकाशा परिसरातील आदिवासी वस्तीमध्ये जाऊन स्थानिक बोलीभाषेत कोरोना संदर्भात काळजी घेण्याच्या संदर्भात आवाहन त्यांनी केले.

कोरोनाच्या युद्धात आता शाळकरी विद्यार्थ्यांचे योगदान

ग्रामीण भागातील नागरिकांना शास्त्रयुक्त पद्धतीने हात धुण्याचे प्रात्यक्षिक त्या विद्यार्थ्यांनी करून दाखवले. त्याचसोबत योग्य अंतर ठेवत त्यांनी नागरिकांना कामाशिवाय घराबाहेर पडू नका, बाहेर निघताना मास्कचा वापर करा, असे आवाहन केले.

कोरोना विरोधाच्या या युद्धात आता ग्रामीण भागात शाळकरी विद्यार्थी समोर आले आहेत. आदिवासी वाड्या व पाड्यातील नागरिकांना कोरोनाविषयी विद्यार्थी व शिक्षकांनी जनजागृती त्यांच्याच बोलीभाषेत समजून सांगितली. जेणेकरून आदिवासी वस्तीमध्ये कोरोनाचा शिरकाव होणार नाही. विद्यार्थ्यांनी स्वत: मास्क शिवून वाटप करत एक नवा आदर्श उभा केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.