ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये संततधार; नद्या-नाल्यांना पूर

author img

By

Published : Aug 17, 2020, 11:25 AM IST

मागील पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यात पावसाची 35 टक्के तूट भरून निघाली आहे. यंदाच्या तुलनेत गेल्या वर्षी कमी प्रमाणावर पाऊस झाल्याने बळीराजावर मोठे संकट होते, तर जिल्ह्यातील काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता.

monsoon in nandurbar
नंदुरबारमध्ये संततधार पाऊस; नद्या-नाले पूरपरिस्थितीत

नंदुरबार - मागील पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यात पावसाची 35 टक्के तूट भरून निघाली आहे. यंदाच्या तुलनेत गेल्या वर्षी कमी प्रमाणावर पाऊस झाल्याने बळीराजावर मोठे संकट होते. तर जिल्ह्यातील काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता.

नंदुरबारमध्ये संततधार पाऊस; नद्या-नाले पूरपरिस्थितीत

जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने सर्व नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प देखील भरले आहेत. त्याचबरोबर शहराला पाणीपुरवठा करणारे अंबाबारी धरण व विरचक धरण पूर्णपणे भरले आहेत. या काळात जिल्ह्यातील नवापूर, तळोदा, अक्कलकुवा या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे, तर उर्वरित तीन तालुक्यांमध्ये 50 मिली पेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

नदी-नाले प्रभावित झाल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणारा वीरचक्र आणि आंबेबारा धरण भरले असून वीरचक्र धरणातून ५१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणारे धरण भरल्याने नंदुरबारवासियांवरील पाणीटंचाईचे संकट टळले आहे. तर संततधार पावसामुळे विहिरी देखील भरल्या आहेत. भुईमूग, चवळी, मूग या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. तर मे महिन्यात लागवड केलेल्या कापसाला देखील पावसाचा फटका बसलाय.

नंदुरबार - मागील पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यात पावसाची 35 टक्के तूट भरून निघाली आहे. यंदाच्या तुलनेत गेल्या वर्षी कमी प्रमाणावर पाऊस झाल्याने बळीराजावर मोठे संकट होते. तर जिल्ह्यातील काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता.

नंदुरबारमध्ये संततधार पाऊस; नद्या-नाले पूरपरिस्थितीत

जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने सर्व नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प देखील भरले आहेत. त्याचबरोबर शहराला पाणीपुरवठा करणारे अंबाबारी धरण व विरचक धरण पूर्णपणे भरले आहेत. या काळात जिल्ह्यातील नवापूर, तळोदा, अक्कलकुवा या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे, तर उर्वरित तीन तालुक्यांमध्ये 50 मिली पेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

नदी-नाले प्रभावित झाल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणारा वीरचक्र आणि आंबेबारा धरण भरले असून वीरचक्र धरणातून ५१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणारे धरण भरल्याने नंदुरबारवासियांवरील पाणीटंचाईचे संकट टळले आहे. तर संततधार पावसामुळे विहिरी देखील भरल्या आहेत. भुईमूग, चवळी, मूग या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. तर मे महिन्यात लागवड केलेल्या कापसाला देखील पावसाचा फटका बसलाय.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.