ETV Bharat / state

संततधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 बंद होण्याची शक्यता

मागील 24 तासांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे महामार्गाची अवस्था अधिकच बिकट होत आहे. पुढील काही तास पाऊस असाच सुरू राहिला तर महामार्ग कायमचा बंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

author img

By

Published : Aug 1, 2019, 2:29 PM IST

वाहतूक कोंडी

नंदुरबार - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर नवापूर ते कोंडाईबारी घाटा दरम्यान रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. यामुळे या रस्त्यावर अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच पुढील काही तास पाऊस असाच सुरू राहिला तर महामार्ग कायमचा बंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6
नवापूर, सारवट, विसरवाडी, चिंचपाडा, मासलीपाडा, बर्डीपाडा, सोंनखांब, मोरकरंजा या गावाजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. यामुळे चिखलात गाड्या फसून रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे जवळपास पाच किलोमीटर अंतराच्या लांबच लांब रांगा या रस्तावर पाहायला मिळत आहेत. मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याची तक्रार स्थानिक लोक करत आहेत.
nandurbar
चिखलात फसलेला ट्रक

मागील 24 तासांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे महामार्गाची अवस्था अधिकच बिकट होत आहे. पुढील काही तास पाऊस असाच सुरू राहिला तर महामार्ग कायमचा बंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नंदुरबार - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर नवापूर ते कोंडाईबारी घाटा दरम्यान रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. यामुळे या रस्त्यावर अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच पुढील काही तास पाऊस असाच सुरू राहिला तर महामार्ग कायमचा बंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6
नवापूर, सारवट, विसरवाडी, चिंचपाडा, मासलीपाडा, बर्डीपाडा, सोंनखांब, मोरकरंजा या गावाजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. यामुळे चिखलात गाड्या फसून रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे जवळपास पाच किलोमीटर अंतराच्या लांबच लांब रांगा या रस्तावर पाहायला मिळत आहेत. मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याची तक्रार स्थानिक लोक करत आहेत.
nandurbar
चिखलात फसलेला ट्रक

मागील 24 तासांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे महामार्गाची अवस्था अधिकच बिकट होत आहे. पुढील काही तास पाऊस असाच सुरू राहिला तर महामार्ग कायमचा बंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Intro:राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर नवापूर ते कोंडाईबारी घाटा दरम्यान रस्त्याची अत्यंत दुर्दैवी अवस्था झाल्याने अपघातांच्या संख्येत वाढ...


नवापूर, सारवट, विसरवाडी, चिंचपाडा, मासलीपाडा, बर्डीपाडा, सोंनखांब, मोरकरंजा या गावाजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्याने चिखलात गाड्या फसून ट्राफिक जाम होत आहे...Body:जवळपास पाच किलोमीटरच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे...

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं या राष्ट्रीय महामार्ग कडे पूर्णता दुर्लक्ष....


संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचेही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष...
Conclusion:गेल्या 24 तासा पासून पावसाची संततधार सुरू असल्याने महामार्गाची अवस्था बिकट...

येत्या काही तासात पाऊस असाच सुरू राहिला तर महामार्ग कायमचा बंद होण्याची शक्यता...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.