ETV Bharat / state

नांदेडात विहिरीने गाठला तळ, पाणी शेंदण्यासाठी करावी लागतेय मानवी साखळी

मुखेड़, देगलूर, उदगीर तालुक्यासाठी वरदान ठरणारा लेंडी प्रकल्प गेल्या ३४ वर्षांपासून रखडलेला असल्यामुळे पाणीटंचाईत आणखी भर पडली आहे.

author img

By

Published : Apr 30, 2019, 5:12 PM IST

मुखेड : विहिरीतील पाण्यासाठी करावी लागतेय मानवी साखळी

नांदेड - मुखेड तालुक्यातील नागरिकांना थोड्याशा पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. घोटभर पाण्यासाठी तळ गाठलेल्या ४० ते ५० फुट खोल विहिरीत उतरून पाणी भरण्याची वेळ आली आहे. मुखेड़, देगलूर, उदगीर तालुक्यासाठी वरदान ठरणारा लेंडी प्रकल्प गेल्या ३४ वर्षांपासून रखडलेला असल्यामुळे पाणीटंचाईत आणखी भर पडली आहे.

मुखेड : विहिरीतील पाण्यासाठी करावी लागतेय मानवी साखळी

एका कडब्याच्या पेंडीचा भाव १५ ते १८ रुपये आहे. विकतचा चारा आणून जनावरांना घालणे शेतकऱ्यांना परवडत नाही. मुक्रमाबादसह तालुक्यातील नदी नाले, विहिरींनी तळ गाठला आहे. तालुक्यातील अनेक गावात हंडाभर पाण्यासाठी महिला पुरुष दीड ते दोन किलोमीटरची पायपीट करत आहेत. एवढ्यावर ही कसरत थांबत नसून मानवी हाताची साखळी करून विहिरीत उतरावे लागत आहे.

मुखेड तालुक्यात अनेक गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पण तालुक्यातील भीषण पाणी टंचाई पाहता टँकरही अपुरे पडत आहेत. पाण्याच्या समस्येचे कायमचे निवारण करण्यासाठी शासनाने गावस्तरावर नळ योजना राबवून त्यावर करोडो रुपये खर्ची केले, पण अनेक गावातील नळयोजना कुचकामी ठरली आहे.

नांदेड - मुखेड तालुक्यातील नागरिकांना थोड्याशा पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. घोटभर पाण्यासाठी तळ गाठलेल्या ४० ते ५० फुट खोल विहिरीत उतरून पाणी भरण्याची वेळ आली आहे. मुखेड़, देगलूर, उदगीर तालुक्यासाठी वरदान ठरणारा लेंडी प्रकल्प गेल्या ३४ वर्षांपासून रखडलेला असल्यामुळे पाणीटंचाईत आणखी भर पडली आहे.

मुखेड : विहिरीतील पाण्यासाठी करावी लागतेय मानवी साखळी

एका कडब्याच्या पेंडीचा भाव १५ ते १८ रुपये आहे. विकतचा चारा आणून जनावरांना घालणे शेतकऱ्यांना परवडत नाही. मुक्रमाबादसह तालुक्यातील नदी नाले, विहिरींनी तळ गाठला आहे. तालुक्यातील अनेक गावात हंडाभर पाण्यासाठी महिला पुरुष दीड ते दोन किलोमीटरची पायपीट करत आहेत. एवढ्यावर ही कसरत थांबत नसून मानवी हाताची साखळी करून विहिरीत उतरावे लागत आहे.

मुखेड तालुक्यात अनेक गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पण तालुक्यातील भीषण पाणी टंचाई पाहता टँकरही अपुरे पडत आहेत. पाण्याच्या समस्येचे कायमचे निवारण करण्यासाठी शासनाने गावस्तरावर नळ योजना राबवून त्यावर करोडो रुपये खर्ची केले, पण अनेक गावातील नळयोजना कुचकामी ठरली आहे.

Intro:नांदेड - तळ गाठलेल्या विहिरीत उतरून घोटभर पाण्यासाठी धडपड; चारा व पाण्यासाठी मुक्या जनावरांना करावी लागतेय रानोमाळ भटकंती.


नांदेड : मुखेड राज्यात कायम दुष्काळी म्हणून ख्यातिप्राप्त मुखेड तालुक्यात यंदा पाण्याच्या एका एका थेंबासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. घोटभर पाण्यासाठी नागरिक तळ गाठलेल्या ४० ते ५० फुट खोल विहिरीत उतरून पाणी भरू लागले आहेत. माणसांनाच पिण्याच्या पाण्यासाठी असा संघर्ष करावा लागत असताना मुक्या जनावरांना सोडूनच द्या जनावरांना चारा पाणी नाही शेतकरी शेतमजुरांच्या हाताला काम नाही.Body:मुखेड़ तातुक्यात सत्ता कोणत्याही पक्षाची असो से तालुका बारा महिने कायम दुष्काळ असतो, मुखेड़, देगलूर, उदगीर तालुक्यासाठी वरदान ठरणारा लेंडी प्रकल्प गेल्या ३४ वर्षांपासून रखडलेला असल्यामुळे पाणीटंचाईत आणखी भर पडली आहे.रानात जनावरांना
खाण्यासाठी काही नाही, एका कडब्याच्या पेंडीचा भाव पंधरा ते अठरा रुपये चालला असल्यामुळे विकतचा चारा आणून जनावरांना घालणे शेतकऱ्यांना परवडत नाही.Conclusion:मुक्रमाबादसह तालुक्यातील नदी नाले, विहिरींनी तळ गाठला आहे.तालुक्यातील अनेक गावात हंडाभर पाण्यासाठी महिला पुरुष दीड ते दोन किलोमीटरची पायपीट करून मानवी हाताची साखळी करून जीवघेण्या विहिरीत उतरून तांब्याने घागर भरून वर काढावी लागत आहे. मुखेड तालुक्यात अनेक गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पण तालुक्यातील भीषण पाणी टंचाई पाहता टँकरही अपुरे पडत आहेत. तालुक्यात पाणी समस्या कायमची निवारण करण्यासाठी शासनाने गावस्थरावर नळ योजना राबवून त्यावर करोडो रुपये खर्ची केले, पण अनेक गावातील नळयोजना कुचकामी ठरली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.