ETV Bharat / state

नांदेडमध्ये ट्रकने मोटारसायकलस्वारांना चिरडले, दोघांचा जागीच मृत्यू

author img

By

Published : Oct 2, 2019, 5:50 PM IST

बालाजी आणि पुंडलिक हे त्यांच्या (एमएच-26- यूए- 5444) दुचाकीने अर्धापूरकडून तिरकसवाडीला जात असताना अर्धापूर पूर्व वळण रस्त्यावर तामसा टी पॉईंटवर हिंगोलीकडून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच-35-के-3690) धडक दिली.

नांदेडमध्ये ट्रकने मोटारसायकलस्वारांना चिरडले

नांदेड - अर्धापूर पूर्व वळण रस्त्यावरील तामसा टी पॉईंटवर हिंगोलीकडून नांदेडकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास झाला. बालाजी गुणाजी कोकाटे (वय -40), पुंडलिक दामाजी शिंदे (वय 52, दोघेही रा. तिरकसवाडी, तालुका मुदखेड) अशी अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

नांदेडमध्ये ट्रकने मोटारसायकलस्वारांना चिरडले

हेही वाचा - माहूर शहरात अस्वलाचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

याबाबत अधिक माहिती अशी, की बालाजी आणि पुंडलिक हे त्यांच्या (एमएच-26- यूए- 5444) दुचाकीने अर्धापूरकडून तिरकसवाडीला जात असताना अर्धापूर पूर्व वळण रस्त्यातीवर तामसा टी पॉईंटवर हिंगोलीकडून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच-35-के-3690) धडक दिली. त्यावेळी बालाजी कोकाटे यांचा जागीच मृत्यू झाला. तर पुंडलिक शिंदे यांना उपचारासाठी नेत आसताना त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा - विधानसभा निवडणूक 2019 : खा.चिखलीकरांना दे धक्का... होमपीचवरची उमेदवारी शिवसेनेच्या वाट्याला..!

अपघातानंतर अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विष्णूकांत गुट्टे व महामार्ग सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख रहेमान व कर्मचारी व अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, या वळण रस्त्यावर 4 चौक आहेत. या चौकात गतिरोधक, दिशादर्शक फलक नसल्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे याकडे बांधकाम विभाग व वाहतूक शाखेने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नांदेड - अर्धापूर पूर्व वळण रस्त्यावरील तामसा टी पॉईंटवर हिंगोलीकडून नांदेडकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास झाला. बालाजी गुणाजी कोकाटे (वय -40), पुंडलिक दामाजी शिंदे (वय 52, दोघेही रा. तिरकसवाडी, तालुका मुदखेड) अशी अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

नांदेडमध्ये ट्रकने मोटारसायकलस्वारांना चिरडले

हेही वाचा - माहूर शहरात अस्वलाचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

याबाबत अधिक माहिती अशी, की बालाजी आणि पुंडलिक हे त्यांच्या (एमएच-26- यूए- 5444) दुचाकीने अर्धापूरकडून तिरकसवाडीला जात असताना अर्धापूर पूर्व वळण रस्त्यातीवर तामसा टी पॉईंटवर हिंगोलीकडून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच-35-के-3690) धडक दिली. त्यावेळी बालाजी कोकाटे यांचा जागीच मृत्यू झाला. तर पुंडलिक शिंदे यांना उपचारासाठी नेत आसताना त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा - विधानसभा निवडणूक 2019 : खा.चिखलीकरांना दे धक्का... होमपीचवरची उमेदवारी शिवसेनेच्या वाट्याला..!

अपघातानंतर अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विष्णूकांत गुट्टे व महामार्ग सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख रहेमान व कर्मचारी व अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, या वळण रस्त्यावर 4 चौक आहेत. या चौकात गतिरोधक, दिशादर्शक फलक नसल्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे याकडे बांधकाम विभाग व वाहतूक शाखेने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Intro:अर्धापूरात ट्रकने मोटार सायकला चिरडले;

दोन जणांचा जागीच मृत्यू...!

नांदेड: अर्धापूर पुर्व वळण रस्त्यावरील तामसा टी पाॅइंटवर हिंगोलीकडून नांदेडकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोघांचा मृत्यू झाला आहे. सदरील अपघात बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास झाला आहे. मयत मुदखेड तालुक्यातील तिरकसवाडी येथील रहिवासी आहेत. Body:अर्धापूरात ट्रकने मोटार सायकला चिरडले;

दोन जणांचा जागीच मृत्यू...!

नांदेड: अर्धापूर पुर्व वळण रस्त्यावरील तामसा टी पाॅइंटवर हिंगोलीकडून नांदेडकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोघांचा मृत्यू झाला आहे. सदरील अपघात बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास झाला आहे. मयत मुदखेड तालुक्यातील तिरकसवाडी येथील रहिवासी आहेत.
या बाबत पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की, अर्धापूरकडून तिरकसवाडी (ता. मुदखेड) येथील बालाजी गुणाजी कोकाटे (वय-४०), पुंडलिक दामाजी शिंदे (वय 52) हे आपल्या दुचाकीवरून लहानकडे जात असतांना त्यांची दुचाकी (एम.एच.२६ यू ए. ५४४०अर्धापूर पुर्व वळण रस्त्यातील तामसा टी पाॅइंटवर आली आसता हिंगोलीकडून नांदेडकडे जाणा-या भरधाव वेगातील ट्रकने (एम.एच.३५ के ३६९०) धडक देऊन दुचाकीस्वारास गंभीर जखमी केले. यात बालाजी गुणाजी कोकाटे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुस-या जखमीस उपचारासाठी नेत आसतांना पुंडलिक दामाजी शिंदे (वय ५२) यांचा मृत्यू झाला.
अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विष्णूकांत गुट्टे व महामार्ग सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख रहेमान व कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी भेट देवून वाहतूक सुरळीत केली.

-----------------------

या वळण रस्त्यावर चार चौक आहेत. या चौकात गतिरोधक, दिशादर्शक फलक, रस्त्यावर आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाय योजना न केल्याने अपघातांच्या घटनेत वाढ झाली असून जीव गमवावा लागले आहेत. बांधकाम विभाग, वाहतूक शाखेने लक्ष घालण्याची गरज आहे.
-------------------------Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.