ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : तेलंगाणात जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना एका दिवसाची बंदी

author img

By

Published : Mar 21, 2020, 11:47 PM IST

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. यामुळे नांदेड शहरातून तेलंगणा राज्यात जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांवर एका दिवसाची बंदी घातली आहे. तेलंगणाकडून रविवारी 22 मार्चच्या सकाळी सात वाजल्यापासून ते 23 मार्चच्या सकाळी सात वाजेपर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे.

कोरोना इफेक्ट नांडेद
कोरोना इफेक्ट नांडेद

नांदेड - तेलंगाणा राज्यात जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी 'जनता कर्फ्यु' लागू केला आहे. याअनुषंगाने ही बंदी घालण्यात आली आहे.

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यामुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मोठया प्रमाणावर जीवित हानी होत आहे. कोरोना विषाणूबाधित रुग्ण आपल्या देशातील काही ठिकाणी आढळून आलेले आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. यामुळे नांदेड शहरातून तेलंगणा राज्यात जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांवर एका दिवसाची बंदी घातली आहे. तेलंगणाकडून रविवारी 22 मार्चच्या सकाळी सात वाजल्यापासून ते 23 मार्चच्या सकाळी सात वाजेपर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी जिल्ह्यातून तेलंगणामध्ये जाणे-येणे टाळावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा - CORONA VIRUS : 23 मार्च रोजी होणारा दहावीचा पेपर रद्द, नवी तारीख 31 मार्चनंतर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जनतेला आवाहन -

पंतप्रधान मोदींनी देशवासियांना 'जनता कर्फ्यू' स्वतःहून लागू करण्याचे आवाहन केले आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध आहे. प्रत्येक नागरिकाने याचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केली आहे. त्यासाठी 22 मार्चला रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत कुणीही बाहेर पडू नये, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

नांदेड - तेलंगाणा राज्यात जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी 'जनता कर्फ्यु' लागू केला आहे. याअनुषंगाने ही बंदी घालण्यात आली आहे.

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यामुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मोठया प्रमाणावर जीवित हानी होत आहे. कोरोना विषाणूबाधित रुग्ण आपल्या देशातील काही ठिकाणी आढळून आलेले आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. यामुळे नांदेड शहरातून तेलंगणा राज्यात जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांवर एका दिवसाची बंदी घातली आहे. तेलंगणाकडून रविवारी 22 मार्चच्या सकाळी सात वाजल्यापासून ते 23 मार्चच्या सकाळी सात वाजेपर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी जिल्ह्यातून तेलंगणामध्ये जाणे-येणे टाळावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा - CORONA VIRUS : 23 मार्च रोजी होणारा दहावीचा पेपर रद्द, नवी तारीख 31 मार्चनंतर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जनतेला आवाहन -

पंतप्रधान मोदींनी देशवासियांना 'जनता कर्फ्यू' स्वतःहून लागू करण्याचे आवाहन केले आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध आहे. प्रत्येक नागरिकाने याचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केली आहे. त्यासाठी 22 मार्चला रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत कुणीही बाहेर पडू नये, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.