ETV Bharat / state

शिवजयंतीवरील निर्बंधामुळे मराठा संघटना नाराज

कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

author img

By

Published : Feb 14, 2021, 5:34 PM IST

Updated : Feb 14, 2021, 5:43 PM IST

नांदेड - कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान, राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्यात संदर्भात लादलेल्या अटी अन्याय कारक आहेत. या अटी तात्काळ रद्द कराव्यात, अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने केली आहे. या मागणीसाठी राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करत आंदोलन करण्यात आले.

जाचक अटी तात्काळ रद्द करा-शिवजयंती साजरी करण्याबाबद राज्य सरकाने जाचक अटी घातल्या आहेत. या अटी तात्काळ रद्द कराव्यात. राज्यभरात इतर कार्यक्रमांना परवानगी दिली जात आहे. मग शिवजयंतीला विरोध का? असा सूर मराठा संघटनांमधून येत आहे.स्वाभिमानीचा घंटानाद आंदोलन-शिवजयंती साजरी करण्यासाठी आघाडी सरकारने जाचक अटी लादल्या आहेत. त्या अटी तात्काळ रद्द कराव्यात या मागणीसाठी आज नांदेडमध्ये स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने निषेधाचे फलक घेऊन आंदोलन केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. पुढील प्रमाणे आहेत अटी-
  • करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे. शिवनेरी अथवा कोणत्याही गडावर एकत्र जमू नये.
  • कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करून फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

    राज्यभर शिवजयंती जल्लोषात साजरी होणार-

    राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्यात बाबत अटी लादल्या आहेत. मात्र शिवजयंती उत्साहात साजरी होणार आहे. अशी भूमिका स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने घेतली आहे. राज्यभर जल्लोषात शिवजयंती साजरे करण्याचे अवाहन केले आहे.

हेही वाचा- राज्यातील विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान; शालेय शिक्षण विभागाचे परिपत्रक

नांदेड - कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान, राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्यात संदर्भात लादलेल्या अटी अन्याय कारक आहेत. या अटी तात्काळ रद्द कराव्यात, अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने केली आहे. या मागणीसाठी राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करत आंदोलन करण्यात आले.

जाचक अटी तात्काळ रद्द करा-शिवजयंती साजरी करण्याबाबद राज्य सरकाने जाचक अटी घातल्या आहेत. या अटी तात्काळ रद्द कराव्यात. राज्यभरात इतर कार्यक्रमांना परवानगी दिली जात आहे. मग शिवजयंतीला विरोध का? असा सूर मराठा संघटनांमधून येत आहे.स्वाभिमानीचा घंटानाद आंदोलन-शिवजयंती साजरी करण्यासाठी आघाडी सरकारने जाचक अटी लादल्या आहेत. त्या अटी तात्काळ रद्द कराव्यात या मागणीसाठी आज नांदेडमध्ये स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने निषेधाचे फलक घेऊन आंदोलन केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. पुढील प्रमाणे आहेत अटी-
  • करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे. शिवनेरी अथवा कोणत्याही गडावर एकत्र जमू नये.
  • कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करून फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

    राज्यभर शिवजयंती जल्लोषात साजरी होणार-

    राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्यात बाबत अटी लादल्या आहेत. मात्र शिवजयंती उत्साहात साजरी होणार आहे. अशी भूमिका स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने घेतली आहे. राज्यभर जल्लोषात शिवजयंती साजरे करण्याचे अवाहन केले आहे.

हेही वाचा- राज्यातील विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान; शालेय शिक्षण विभागाचे परिपत्रक

Last Updated : Feb 14, 2021, 5:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.