ETV Bharat / state

...अन्यथा गणेश विसर्जन करणार नाही, लेंडी प्रकल्पग्रस्तांचा पवित्रा

मुखेड तालुक्यातील बहुचर्चित लेंडी प्रकल्प बाधीत प्रकल्पग्रस्तांच्या मावेजाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला असून मुक्रमाबाद येथील प्रकल्प बाधीत घरांचा मावेजा दिला नाही तर श्री गणेश विसर्जन करणार नाही, असा पावित्रा घेतला

author img

By

Published : Sep 11, 2019, 12:53 PM IST

रस्ता रोको आंदोलन करताना

नांदेड - मुखेड तालुक्यातील बहुचर्चित लेंडी प्रकल्प बाधीत प्रकल्पग्रस्तांच्या मावेजाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. मुक्रमाबाद येथील प्रकल्प बाधीत घरांचा मावेजा दिला नाही तर श्री गणेश विसर्जन करणार नाही, असा पावित्रा येथील प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे. परंतु, या मागणीकडे संबंधीत प्रशासनाने पाठ फिरवली असल्यामुळे मुक्रमाबाद येथील प्रकल्पग्रस्त आणि नागरिकांनी मंगळवारी सकाळी १० वाजता सुरू केलेले रास्ता रोको आंदोलन रात्री उशिरापर्यंत चालूच होते.

आंदोलन करताना आंदोलनकर्ते


लेंडी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होऊन ३३ वर्षे झाली. तरीही मुक्रमाबाद (ता.मुखेड) येथील १ हजार ३१० प्रकल्पबाधीत घरांच्या मावेजाचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे. अंतिम निवाडा (आवार्ड) पास होऊन दोन वर्षांपेक्षा अधिक काळ ऊलटला आहे. शिवाय शासनाकडून निधीची ऊपलब्धता होऊनही त्या प्रल्पग्रस्तांना थकीत मावेजा देण्यास संबंधीत प्रशासन वारंवार टाळा-टाळ करीत आहे. मुक्रमाबाद येथील लेंडी प्रकल्पग्रस्तांनी मावेजासाठी वेळोवेळी निवेदने दिली. रास्ता-रोको आंदोलन, बाजारपेठ कडकडीत बंद ठेवणे, धरणे आणि आदी आंदोलने केली. परंतू संबंधीत प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करत केवळ आश्वासने देत झुलवत ठेवले आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.


त्यामुळे लेंडी प्रकल्पग्रस्तांना ९ सप्टेंबरपर्यंत मुक्रमाबाद येथील प्रकल्प बाधीत व संपादित घरांचा मावेजा न दिल्यास दि.१० सप्टेंबर २०१९ पासून बेमुदत रास्ता-रोको आंदोलन करण्यात येईल व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात येईल आणि दि.१२ सप्टेंबर रोजी होणारे श्री गणेश विसर्जन करणार नाही, असा इशारा या प्रकल्प बाधीतांनी संबंधीत प्रशासनास दिला होता. तसेच आगामी विधानसभा निवडणूक मतदानावर बहिष्कारही टाकू, असाही इशारा दिलेला आहे. असे असतांनाही संबंधीत प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे अखेर काल मुक्रमाबाद येथील बाजारपेठ बंद ठेऊन सकाळी दहा वाजता मुख्य रस्त्यावर प्रकल्प बाधीतांसह गावक-यांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे.यावेळी पोलीस व प्रशासनाच्या अधिकारी प्रतिनिधींनी हे आंदोलन करु नये यासाठी मध्यस्थितीचे प्रयत्न केले.परंतू केवळ पोकळ आश्वासने आहेत असे म्हणत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे.रात्री उशिरा पर्यंत आंदोलकानी आंदोलनाची सांगता केली नाही व ते चालूच ठेवले होते.


रात्री उशिरा पर्यंत उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांची प्रकल्पग्रस्तासोबत मध्यस्ती चालू होती. पण, ही चर्चा निष्फळ ठरली. जोपर्यत ७७ अ ची संपूर्ण नोटीस वाटप करत नाही व जिल्हाधिकारी स्वतः येवून प्रकल्पग्रस्ताना भेट देणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भुमिका धरणग्रस्तांनी घेतल्याने हे आंदोलन सुरुच राहिले. परंतु रात्री ९ वाजेपर्यंत तरी कोणतेही वरीष्ठ अधिकारी आंदोलन स्थळी पोहचले नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी रात्रभर भजन आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधले.


अंदोलनात अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेत उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांनी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आले आहे.

नांदेड - मुखेड तालुक्यातील बहुचर्चित लेंडी प्रकल्प बाधीत प्रकल्पग्रस्तांच्या मावेजाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. मुक्रमाबाद येथील प्रकल्प बाधीत घरांचा मावेजा दिला नाही तर श्री गणेश विसर्जन करणार नाही, असा पावित्रा येथील प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे. परंतु, या मागणीकडे संबंधीत प्रशासनाने पाठ फिरवली असल्यामुळे मुक्रमाबाद येथील प्रकल्पग्रस्त आणि नागरिकांनी मंगळवारी सकाळी १० वाजता सुरू केलेले रास्ता रोको आंदोलन रात्री उशिरापर्यंत चालूच होते.

आंदोलन करताना आंदोलनकर्ते


लेंडी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होऊन ३३ वर्षे झाली. तरीही मुक्रमाबाद (ता.मुखेड) येथील १ हजार ३१० प्रकल्पबाधीत घरांच्या मावेजाचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे. अंतिम निवाडा (आवार्ड) पास होऊन दोन वर्षांपेक्षा अधिक काळ ऊलटला आहे. शिवाय शासनाकडून निधीची ऊपलब्धता होऊनही त्या प्रल्पग्रस्तांना थकीत मावेजा देण्यास संबंधीत प्रशासन वारंवार टाळा-टाळ करीत आहे. मुक्रमाबाद येथील लेंडी प्रकल्पग्रस्तांनी मावेजासाठी वेळोवेळी निवेदने दिली. रास्ता-रोको आंदोलन, बाजारपेठ कडकडीत बंद ठेवणे, धरणे आणि आदी आंदोलने केली. परंतू संबंधीत प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करत केवळ आश्वासने देत झुलवत ठेवले आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.


त्यामुळे लेंडी प्रकल्पग्रस्तांना ९ सप्टेंबरपर्यंत मुक्रमाबाद येथील प्रकल्प बाधीत व संपादित घरांचा मावेजा न दिल्यास दि.१० सप्टेंबर २०१९ पासून बेमुदत रास्ता-रोको आंदोलन करण्यात येईल व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात येईल आणि दि.१२ सप्टेंबर रोजी होणारे श्री गणेश विसर्जन करणार नाही, असा इशारा या प्रकल्प बाधीतांनी संबंधीत प्रशासनास दिला होता. तसेच आगामी विधानसभा निवडणूक मतदानावर बहिष्कारही टाकू, असाही इशारा दिलेला आहे. असे असतांनाही संबंधीत प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे अखेर काल मुक्रमाबाद येथील बाजारपेठ बंद ठेऊन सकाळी दहा वाजता मुख्य रस्त्यावर प्रकल्प बाधीतांसह गावक-यांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे.यावेळी पोलीस व प्रशासनाच्या अधिकारी प्रतिनिधींनी हे आंदोलन करु नये यासाठी मध्यस्थितीचे प्रयत्न केले.परंतू केवळ पोकळ आश्वासने आहेत असे म्हणत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे.रात्री उशिरा पर्यंत आंदोलकानी आंदोलनाची सांगता केली नाही व ते चालूच ठेवले होते.


रात्री उशिरा पर्यंत उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांची प्रकल्पग्रस्तासोबत मध्यस्ती चालू होती. पण, ही चर्चा निष्फळ ठरली. जोपर्यत ७७ अ ची संपूर्ण नोटीस वाटप करत नाही व जिल्हाधिकारी स्वतः येवून प्रकल्पग्रस्ताना भेट देणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भुमिका धरणग्रस्तांनी घेतल्याने हे आंदोलन सुरुच राहिले. परंतु रात्री ९ वाजेपर्यंत तरी कोणतेही वरीष्ठ अधिकारी आंदोलन स्थळी पोहचले नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी रात्रभर भजन आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधले.


अंदोलनात अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेत उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांनी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आले आहे.

Intro:नांदेड : लेंडी प्रकल्प बाधितांना त्वरीत मावेजा द्या! अन्यथा श्री गणेश विसर्जन करणार नाही


- मुक्रमाबाद येथील लेंडी प्रकल्पग्रस्तांनी असा पावित्रा घेत सुरु केले आहे रास्ता रोको आंदोलन.

- रात्री नऊ वाजेपर्यंत रास्तारोको आंदोलन करत राञभर भजन आंदोलन करण्यात आले.

मुखेड : तालुक्यातील बहुचर्चित लेंडी प्रकल्प बाधीत प्रकल्पग्रस्तांच्या मावेजाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला असुन दि.९ सप्टेंबर पर्यंत मुक्रामाबाद येथिल प्रकल्प बाधीत घरांचा मावेजा दिला नाही तर श्री गणेश विसर्जन करणार नाही असा पावित्रा घेतला.परंतू या मागणीकडे संबंधीत प्रशासनाने पाठ फिरवली असल्यामुळे मुक्रमाबाद येथील प्रकल्पग्रस्त व नागरीकांनी दि.१० सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरु केलेले रास्ता रोको आंदोलन रात्री उशिरा पर्यंत चालूच होते.Body:
लेंडी प्रकल्पाला कामाला सुरुवात होऊन ३३ वर्षे झाली.तरीही मुक्रमाबाद ता.मुखेड येथिल १ हजार ३१० प्रकल्प बाधीत घरांच्या मावेजाचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबीत आहे.अंतिम निवाडा (आवार्ड) पास होऊन दोन वर्षापेक्षा जास्तीचा काळ ऊलटला आहे.शिवाय शासनाकडून निधीची ऊपलब्धता होऊनही त्या प्रल्पग्रस्तांना थकीत मावेजा देण्यास संबंधीत प्रशासन वारंवार टाळा-टाळ करीत आहे.मुक्रमाबाद येथील लेंडी प्रकल्पग्रस्तांनी मावेजासाठी वेळोवेळी निवेदने दिली. रास्ता-रोको आंदेलन,बाजारपेठ कडकडीत बंद ठेवणे,धरणे व आदी आंदोलने केली.परंतू संबंधीत प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करत केवळ आश्वासने देत झुलवत ठेवले आहे.यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे लेंडी प्रकल्पग्रस्तांना दि.९ सप्टेंबर २०१९ पर्यंत मुक्रमाबाद येथील प्रकल्प बाधीत व संपादीत घरांचा मावेजा न दिल्यास दि.१० सप्टेंबर २०१९ पासून बेमुदत रास्ता-रोको आंदोलन करण्यात येईल व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात येईल आणि दि.१२ सप्टेंबर रोजी होणारे श्री गणेश विसर्जन करणार नाही असा निर्धार या प्रकल्प बाधीतांनी संबंधीत प्रशासनास दिला होता.तसेच आगामी विधानसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार ही टाकू असा इशारा ही दिलेला आहे.असे असतांनाही संबंधीत प्रशासनाने उपरोक्त मागणीकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे अखेर दि.१० सप्टेंबर २०१९ रोजी मुक्रमाबाद येथील बाजारपेठ बंद ठेऊन सकाळी दहा वाजता मुख्य रस्त्यावर प्रकल्प बाधीतांसह गावक-यांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे.यावेळी पोलीस व प्रशासनाच्या अधिकारी प्रतिनिधींनी हे आंदोलन करु नये यासाठी मध्यस्थितीचे प्रयत्न केले.परंतू केवळ पोकळ आश्वासने आहेत असे म्हणत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे.रात्री उशिरा पर्यंत आंदोलकानी आंदोलनाची सांगता केली नाही व ते चालूच ठेवले होते.Conclusion:
रात्री उशिरा पर्यंत उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांची प्रकल्पग्रस्तासोबत मध्यस्ती चालू होती पण ही चर्चा निष्फळ ठरली. जोपर्यत ७७ अ ची संपूर्ण नोटीस वाटप करत नाही व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी स्वतः येवुन प्रकल्पग्रस्ताना भेट देणार नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भुमिका धरणग्रस्तानी घेतल्याने हे आंदोलन सुरुच राहिले परंतू रात्री ९:०० वाजता पर्यंत तरी कोणतेही वरीष्ठ अधिकारी आंदोलन स्थळी पोहचले नसल्याने प्रकल्पग्रस्ताने राञभर भजन आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधले . या अंदोनाचे नेतृत्व सामाजिक कार्येकर्ते सुभाषअप्पा बोधने, सुरेशदादा पंदीलवार, शिवराजअप्पा आवडके, बालाजी बोधने, बालाजी पसरगे, सदाशिव बोयवार, आदि करत असुन या आंदोलनाला विविध सामाजिक, राजकीय संघटना व पक्षानी पाठींबा दिला आहे.
अंदोलनात अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेत उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नी.कमलाकर गड्डीमे यांनी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.