ETV Bharat / state

नांदेड-हिंगोलीचे पालकमंत्री बदला; शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह हेमंत पाटील यांची मागणी...!

author img

By

Published : Dec 24, 2020, 2:30 PM IST

महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तेत योग्य वाटा मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील तसेच नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर आणि संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी देखील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याविषयी नाराजीचा सूर लावला

demand of changing Guardian Minister in nanded hingoli
शिवसेनेला सत्तेत योग्य वाटा मिळत नाही

नांदेड - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आयोजित मेळाव्यात खासदारांनी नांदेड-हिंगोलीचे पालकमंत्री बदलण्याची मागणी केली. तसेच काँग्रेस ऐवजी शिवसेनेकडे पालकमंत्री पद द्या, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी वनमंत्र्याकडे केली आहे. दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री काँग्रेसचे असल्याने कामे होत नसल्याचा आरोप खासदारांनी केला.
अशोक चव्हाण यांच्या विषयी नाराजीचा सूर
महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तेत योग्य वाटा मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील तसेच नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर आणि संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी देखील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याविषयी नाराजीचा सूर लावला.

शिवसेनेला सत्तेत योग्य वाटा मिळत नाही
नियोजन समितीत योग्य प्रतिनिधित्व नाहीनांदेड व हिंगोलीत शिवसेनेचा पालकमंत्री असला पाहिजे, अशोक चव्हाण जिल्हा नियोजन समितीत शिवसेनेला योग्य प्रतिनिधीत्व देत नाहीत. हिंगोलीत देखील पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या बाबतीतही हेच घडत असल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली. तसेच नांदेड व हिंगोली येथे शिवसेनेचा पालकमंत्री असावा अशी मागणी यावेळी हेमंत पाटील यांनी केली.लवकरच पालकमंत्र्याशी चर्चा करूशासकीय समित्यांवर शिवसेनेला योग्यप्रतिनिधीत्व मिळत नाही, अशी तक्रार यावेळी नांदेड उत्तरचे बालाजी कल्याणकर यांनी यावेळी केली. संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी देखील बैठकीत पालकमंत्र्यांविषयी तक्रारीचा सूर आळवला. यात कार्यकर्त्यांच्या भावना समजून नेते घेऊन पालकमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात येईल, असेही जाधव म्हणाले.

सत्तेत वाटा मिळणे अपेक्षित
आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 30-30-30 च्या फार्म्युल्यानुसार सत्तेत वाटा मिळणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात तसे होत नाही. नांदेड जिल्ह्यात याबाबतीत नाराजी आहे. जिल्हा विकास आराखड्याचे नियोजन करताना आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. निधीचे वाटप करताना देखील योग्य वाटा मिळत नाही. तसेच शासकीय समित्यांवरील नियुक्त्यांच्या बाबतीतही हेच घडत आहे. खरे तर जिल्हा नियोजन समितीवर शिवसेनेचे चार सदस्य नियुक्त केले पाहिजेत. परंतु, आमचे केवळ दोन सदस्य आहेत. एकूणच आघाडीच्या घटकपक्षांनी समन्वयाची भूमिका ठेवून काम करण्याची गरज असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले.

नांदेड - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आयोजित मेळाव्यात खासदारांनी नांदेड-हिंगोलीचे पालकमंत्री बदलण्याची मागणी केली. तसेच काँग्रेस ऐवजी शिवसेनेकडे पालकमंत्री पद द्या, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी वनमंत्र्याकडे केली आहे. दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री काँग्रेसचे असल्याने कामे होत नसल्याचा आरोप खासदारांनी केला.
अशोक चव्हाण यांच्या विषयी नाराजीचा सूर
महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तेत योग्य वाटा मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील तसेच नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर आणि संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी देखील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याविषयी नाराजीचा सूर लावला.

शिवसेनेला सत्तेत योग्य वाटा मिळत नाही
नियोजन समितीत योग्य प्रतिनिधित्व नाहीनांदेड व हिंगोलीत शिवसेनेचा पालकमंत्री असला पाहिजे, अशोक चव्हाण जिल्हा नियोजन समितीत शिवसेनेला योग्य प्रतिनिधीत्व देत नाहीत. हिंगोलीत देखील पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या बाबतीतही हेच घडत असल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली. तसेच नांदेड व हिंगोली येथे शिवसेनेचा पालकमंत्री असावा अशी मागणी यावेळी हेमंत पाटील यांनी केली.लवकरच पालकमंत्र्याशी चर्चा करूशासकीय समित्यांवर शिवसेनेला योग्यप्रतिनिधीत्व मिळत नाही, अशी तक्रार यावेळी नांदेड उत्तरचे बालाजी कल्याणकर यांनी यावेळी केली. संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी देखील बैठकीत पालकमंत्र्यांविषयी तक्रारीचा सूर आळवला. यात कार्यकर्त्यांच्या भावना समजून नेते घेऊन पालकमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात येईल, असेही जाधव म्हणाले.

सत्तेत वाटा मिळणे अपेक्षित
आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 30-30-30 च्या फार्म्युल्यानुसार सत्तेत वाटा मिळणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात तसे होत नाही. नांदेड जिल्ह्यात याबाबतीत नाराजी आहे. जिल्हा विकास आराखड्याचे नियोजन करताना आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. निधीचे वाटप करताना देखील योग्य वाटा मिळत नाही. तसेच शासकीय समित्यांवरील नियुक्त्यांच्या बाबतीतही हेच घडत आहे. खरे तर जिल्हा नियोजन समितीवर शिवसेनेचे चार सदस्य नियुक्त केले पाहिजेत. परंतु, आमचे केवळ दोन सदस्य आहेत. एकूणच आघाडीच्या घटकपक्षांनी समन्वयाची भूमिका ठेवून काम करण्याची गरज असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.