ETV Bharat / state

Heavy rain in Nanded : नांदेडमध्ये मुसळधार! वडगावचा संपर्क तुटला, दोघांचा मृत्यू

author img

By

Published : Jul 13, 2022, 9:49 AM IST

Updated : Jul 13, 2022, 10:12 AM IST

नांदेड जिल्ह्यात सहा दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला ( Heavy rain in Nanded ) आहे. त्यामुळे गावांचा शहराशी संपर्क तुटला ( villages lost contact with city ) आहे. तेथील दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुना तलाव तुडूंब भरला असून, ओव्हरफ्लो ( Suna Lake overflow ) झाला आहे. नांदेड ते किंनवटला जाणारा राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. दोन जणांच्या मृत्यूची नोंद तर अतिवृष्टीमुळे 9 जणावरांच्या मृत्यू झाल्याची प्राथमीक माहिती आहे.

two people dead
दोघांचा मृत्यू

नांदेड - हिमायतनगर तालुक्यात 4 दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे ( Heavy rain in Nanded ) वडगाव येथील पुलावरुन पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वडगाव येथील गावांचा शहरांशी संपर्क तुटला ( villages lost contact with city ) आहे. तेथील दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान खाण्या पिण्याच्या वस्तू, अन्नधान्य, शाळेतील विद्यार्थी आणि आजारी रुग्णांना रुग्णालयात नेताना रेल्वे पटरीच्या मार्गाने हिमायतनगर गाठावे लागत आहे. कंधार तालुक्यात पाण्यात दोन जन वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

नांदेडमध्ये मुसळधार

पुलाची उंची वाढवण्याची मागणी - गेल्या अनेक वर्षापासून वडगाव येथील पुलाची उंची वाढवून तलावातील गाळ काढण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून वारंवार केली जात आहे. हिमायतनगर तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आदिवासी पट्ट्यात असलेल्या गणेशवाडी, गणेशवाडी तांडा, सवना, पिछोण्डी, वडगाव, वडगाव तांडा, बुरकुलवाडी, खैरगाव, खैरगाव तांडा, वाळकी, वाळकी तांडा, या गावासह परिसरात सततच्या पावसामुळे नदी, नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. त्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे. वडगावजवळील पुलावरुन पाणी वाहत असल्याने दोन दिवसापासून वडगावचा संपर्क तुटला आहे.

सुना तलाव ओव्हरफलो - वडगावच्या पिण्याच्या पाण्याची तसेच सिंचनाची भिस्त असलेला सुना तलाव तुडूंब भरला असून, ओव्हरफ्लो ( Suna Lake overflow ) झाला आहे. गाव परिसराला पुराच्या पाण्यामुळे वेढा बसला आहे. या सुना प्रकल्पातील सांडवा 202 मीटर असून, त्याची उंची 1 मीटरने वाढवण्यासाठी शासनाची सीमारेषा आणखी शिल्लक आहे. तलावाला दोन कॅनॉल असून, उजवा कॅनॉल 12 किलोमीटरचा तर डावा कालवा 6 किलोमीटरचा आहे. तसेच तलावाची पाळू 2 हजार 840 मीटर आहे. आज घडीला या तलावात झाडे झुडपे वाढली असून, गाळ साचला असल्याने कॅनॉल दुरुस्ती झाली नसल्याने व्यवस्थावपन बिघडून पाऊस जास्त झाला की, तलाव ओव्हरफलो होऊन गावचा मार्ग बंद पडत आहे. दरम्यान, सुना तलावाच्या सांडव्यातून येणाऱ्या पाण्यामुळे वडगावकडे जाणाऱ्या नाल्याचा पूल लहान असल्याने मुसळधार पावसामुळे पाणी नाल्यावरुन वाहू लागले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून गावचा संपर्क तुटला आहे. गतवर्षी आलेल्या पुरात एक ऑटो वाहून गेला होता. पण सुदैवाने सर्वजण सुखरुप बचावले. अशा घटना पुन्हा होऊ नयेत, म्हणून येथील पुलाची उंची वाढवून तलावातील गाळ काढावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

नांदेड - किंनवट राष्ट्रीय महामार्ग बंद - नांदेड जिल्ह्यात सहा दिवसापासून पावसामुळे नांदेड ते किंनवटला जाणारा राष्ट्रीय महामार्ग बंद झाला ( Nanded Kinwat national highway closed )आहे. त्याशिवाय पूराच्या पाण्यात अनेक ट्रक आडकले आहेत. पावसामुळे 13 तारखे पर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. गेल्या सहा दिवसापासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदीनाल्यांना पुर आला आहे. तर रस्ते पुलही जलमय झाले आहेत. किनवट तालुक्यातील इस्लापूर जवळ ट्रक पुरच्या पाण्यात उलटल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नांदेड़ शहर सह जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, हिमायतनगर, किनवट,माहुर, हदगाव, बिलोली, नायगाव ,कंधार तालुक्यातील लाखों हेक्टर पिकांच नुकसान झाले आहे.जिल्हा प्रशासनाकडून ठीक ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे.

पुराच्या पाण्यात ग्रामस्थांचा मृत्यू - कंधार तालुक्यात पाण्यात दोन जन वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला ( Two people dead ) आहे. सोमवारच्या रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या कंधार तालुक्यातील दहीकळंबा येथे अंकुश सावंत दुचाकीवरून नांदेडला येत असताना पुराच्या पाण्यात वाहून गेले. मंगळवारी त्यांचा मृतदेह सापडला. तर नायगांव येथील शौचास गेलेल्या लक्ष्मण गोंडाळे हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. अशा प्रकारे दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर अतिवृष्टीमुळे 9 जणावरांचा मृत्यू झाल्याची प्राथमीक माहिती आहे.

हेही वाचा - Mumbai Heavy rain : मुंबईत या आठवड्यात सलग 6 दिवस समुद्राला मोठी भरती, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

नांदेड - हिमायतनगर तालुक्यात 4 दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे ( Heavy rain in Nanded ) वडगाव येथील पुलावरुन पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून वडगाव येथील गावांचा शहरांशी संपर्क तुटला ( villages lost contact with city ) आहे. तेथील दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान खाण्या पिण्याच्या वस्तू, अन्नधान्य, शाळेतील विद्यार्थी आणि आजारी रुग्णांना रुग्णालयात नेताना रेल्वे पटरीच्या मार्गाने हिमायतनगर गाठावे लागत आहे. कंधार तालुक्यात पाण्यात दोन जन वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

नांदेडमध्ये मुसळधार

पुलाची उंची वाढवण्याची मागणी - गेल्या अनेक वर्षापासून वडगाव येथील पुलाची उंची वाढवून तलावातील गाळ काढण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून वारंवार केली जात आहे. हिमायतनगर तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आदिवासी पट्ट्यात असलेल्या गणेशवाडी, गणेशवाडी तांडा, सवना, पिछोण्डी, वडगाव, वडगाव तांडा, बुरकुलवाडी, खैरगाव, खैरगाव तांडा, वाळकी, वाळकी तांडा, या गावासह परिसरात सततच्या पावसामुळे नदी, नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. त्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे. वडगावजवळील पुलावरुन पाणी वाहत असल्याने दोन दिवसापासून वडगावचा संपर्क तुटला आहे.

सुना तलाव ओव्हरफलो - वडगावच्या पिण्याच्या पाण्याची तसेच सिंचनाची भिस्त असलेला सुना तलाव तुडूंब भरला असून, ओव्हरफ्लो ( Suna Lake overflow ) झाला आहे. गाव परिसराला पुराच्या पाण्यामुळे वेढा बसला आहे. या सुना प्रकल्पातील सांडवा 202 मीटर असून, त्याची उंची 1 मीटरने वाढवण्यासाठी शासनाची सीमारेषा आणखी शिल्लक आहे. तलावाला दोन कॅनॉल असून, उजवा कॅनॉल 12 किलोमीटरचा तर डावा कालवा 6 किलोमीटरचा आहे. तसेच तलावाची पाळू 2 हजार 840 मीटर आहे. आज घडीला या तलावात झाडे झुडपे वाढली असून, गाळ साचला असल्याने कॅनॉल दुरुस्ती झाली नसल्याने व्यवस्थावपन बिघडून पाऊस जास्त झाला की, तलाव ओव्हरफलो होऊन गावचा मार्ग बंद पडत आहे. दरम्यान, सुना तलावाच्या सांडव्यातून येणाऱ्या पाण्यामुळे वडगावकडे जाणाऱ्या नाल्याचा पूल लहान असल्याने मुसळधार पावसामुळे पाणी नाल्यावरुन वाहू लागले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून गावचा संपर्क तुटला आहे. गतवर्षी आलेल्या पुरात एक ऑटो वाहून गेला होता. पण सुदैवाने सर्वजण सुखरुप बचावले. अशा घटना पुन्हा होऊ नयेत, म्हणून येथील पुलाची उंची वाढवून तलावातील गाळ काढावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

नांदेड - किंनवट राष्ट्रीय महामार्ग बंद - नांदेड जिल्ह्यात सहा दिवसापासून पावसामुळे नांदेड ते किंनवटला जाणारा राष्ट्रीय महामार्ग बंद झाला ( Nanded Kinwat national highway closed )आहे. त्याशिवाय पूराच्या पाण्यात अनेक ट्रक आडकले आहेत. पावसामुळे 13 तारखे पर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. गेल्या सहा दिवसापासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदीनाल्यांना पुर आला आहे. तर रस्ते पुलही जलमय झाले आहेत. किनवट तालुक्यातील इस्लापूर जवळ ट्रक पुरच्या पाण्यात उलटल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नांदेड़ शहर सह जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, हिमायतनगर, किनवट,माहुर, हदगाव, बिलोली, नायगाव ,कंधार तालुक्यातील लाखों हेक्टर पिकांच नुकसान झाले आहे.जिल्हा प्रशासनाकडून ठीक ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे.

पुराच्या पाण्यात ग्रामस्थांचा मृत्यू - कंधार तालुक्यात पाण्यात दोन जन वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला ( Two people dead ) आहे. सोमवारच्या रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या कंधार तालुक्यातील दहीकळंबा येथे अंकुश सावंत दुचाकीवरून नांदेडला येत असताना पुराच्या पाण्यात वाहून गेले. मंगळवारी त्यांचा मृतदेह सापडला. तर नायगांव येथील शौचास गेलेल्या लक्ष्मण गोंडाळे हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. अशा प्रकारे दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर अतिवृष्टीमुळे 9 जणावरांचा मृत्यू झाल्याची प्राथमीक माहिती आहे.

हेही वाचा - Mumbai Heavy rain : मुंबईत या आठवड्यात सलग 6 दिवस समुद्राला मोठी भरती, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

Last Updated : Jul 13, 2022, 10:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.