ETV Bharat / state

पड रे पाण्या.. कर पाणी पाणी..! नांदेड जिल्ह्यातील बळीराजाची पावसाला आर्त साद

author img

By

Published : Jul 11, 2019, 11:48 AM IST

Updated : Jul 11, 2019, 2:30 PM IST

नांदेड जिल्ह्यात बळीराजाने दांडी मारली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे.

शेताचे छायाचित्र

नांदेड- पड रे पाण्या.. पड रे पाण्या.. कर पाणी पाणी...!, शेत माझं लई तहानलं चातकावानी...! अशी आर्त हाक जिल्ह्यातील बळीराजा पावसाला देत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला तरीही जिल्ह्यात पाऊस बरसला नाही. आतापर्यंत केवळ सरासरीच्या दहा टक्केच पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील भिषन पाणी टंचाईची परिस्थितीचे दृष्य

राज्यात सर्वत्र पाऊस सुरू असताना केवळ नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २८ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. मृग व आद्र नक्षत्रात पावसाने हजेरी लावली नाही. शनिवारी ६ जुलै रोजी पुनर्वसु नक्षत्र सुरू झाले आहे.

पावसाळ्याची सुरुवात होऊन एक महिना उलटला. तरी सरासरीच्या १० टक्केही पाऊस झाला नाही. परिणामी पेरणीसह भीषण पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर जिल्ह्यात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागासह नांदेड शहरात पाण्यासाठी प्रशासनाला टँकरची व्यवस्था करावी लागत आहे. जिल्ह्यात अजूनही १५६ टँकर द्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे येणारा काळ नागरीकांसाठी व प्रशासनासाठी अत्यंत कठीण राहण्याची शक्यता आहे.

सर्व साधारणपणे रोहिणी आणि मृग नक्षत्रात पावसाळ्याला सुरुवात होते. मृग निघाला की मुग, उडीद, तूर या खरीप पिकांची पेरणी केली जाते. या काळात या पिकांची पेरणी झाली तरच उत्पन्न चांगले होते. सध्या पावसाने एक महिना खंड दिल्याने या काळात घेण्यात येणाऱ्या पिकांची पेरणी शक्य नाही. आता शेतकरी उत्पन्नासाठी सोयाबीन व तूर या पिकांवर अवलंबून आहे. मात्र, तेही कोरडे गेल्यास शेतकऱ्यांच्या समस्येत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

दुबार पेरणीचे संकट

पाऊस पडेल या आशेने शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, ती वाया गेली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांना बियाने उपलब्ध करून देण्यास कृषी विभागाने आतापर्यंत कोणतीच तयारी केली नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात बियाण्यांसाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

नांदेड- पड रे पाण्या.. पड रे पाण्या.. कर पाणी पाणी...!, शेत माझं लई तहानलं चातकावानी...! अशी आर्त हाक जिल्ह्यातील बळीराजा पावसाला देत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला तरीही जिल्ह्यात पाऊस बरसला नाही. आतापर्यंत केवळ सरासरीच्या दहा टक्केच पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील भिषन पाणी टंचाईची परिस्थितीचे दृष्य

राज्यात सर्वत्र पाऊस सुरू असताना केवळ नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २८ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. मृग व आद्र नक्षत्रात पावसाने हजेरी लावली नाही. शनिवारी ६ जुलै रोजी पुनर्वसु नक्षत्र सुरू झाले आहे.

पावसाळ्याची सुरुवात होऊन एक महिना उलटला. तरी सरासरीच्या १० टक्केही पाऊस झाला नाही. परिणामी पेरणीसह भीषण पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर जिल्ह्यात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागासह नांदेड शहरात पाण्यासाठी प्रशासनाला टँकरची व्यवस्था करावी लागत आहे. जिल्ह्यात अजूनही १५६ टँकर द्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे येणारा काळ नागरीकांसाठी व प्रशासनासाठी अत्यंत कठीण राहण्याची शक्यता आहे.

सर्व साधारणपणे रोहिणी आणि मृग नक्षत्रात पावसाळ्याला सुरुवात होते. मृग निघाला की मुग, उडीद, तूर या खरीप पिकांची पेरणी केली जाते. या काळात या पिकांची पेरणी झाली तरच उत्पन्न चांगले होते. सध्या पावसाने एक महिना खंड दिल्याने या काळात घेण्यात येणाऱ्या पिकांची पेरणी शक्य नाही. आता शेतकरी उत्पन्नासाठी सोयाबीन व तूर या पिकांवर अवलंबून आहे. मात्र, तेही कोरडे गेल्यास शेतकऱ्यांच्या समस्येत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

दुबार पेरणीचे संकट

पाऊस पडेल या आशेने शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, ती वाया गेली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांना बियाने उपलब्ध करून देण्यास कृषी विभागाने आतापर्यंत कोणतीच तयारी केली नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात बियाण्यांसाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

Intro:पड रे पाण्या...पड रे पाण्या.. कर पाणी पाणी..नांदेड जिल्ह्यातील बळीराजाची पावसाला हाक....!


नांदेड: पड रे पाण्या...पड रे पाण्या... कर पाणी पाणी..., शेत माझं लई तहानल चातकावानी...! अशी आर्त हाक नांदेड जिल्ह्यातील बळीराजा पावसाला देत असल्याचे चित्र आहे. एक महिना उलटला तरीही जिल्ह्यावर पाऊस चांगलाच रुसला असून बळीराजा मात्र पावसाला हाक देऊन करून त्याचेच डोळे आता पाण्याविना सुकले आहेत. जिल्ह्यात आतपर्यंत केवळ सरासरीच्या दहा टक्केच पाऊस झाला आहे.Body:पड रे पाण्या...पड रे पाण्या.. कर पाणी पाणी..नांदेड जिल्ह्यातील बळीराजाची पावसाला हाक....!


नांदेड: पड रे पाण्या...पड रे पाण्या... कर पाणी पाणी..., शेत माझं लई तहानल चातकावानी...! अशी आर्त हाक नांदेड जिल्ह्यातील बळीराजा पावसाला देत असल्याचे चित्र आहे. एक महिना उलटला तरीही जिल्ह्यावर पाऊस चांगलाच रुसला असून बळीराजा मात्र पावसाला हाक देऊन करून त्याचेच डोळे आता पाण्याविना सुकले आहेत. जिल्ह्यात आतपर्यंत केवळ सरासरीच्या दहा टक्केच पाऊस झाला आहे.

मृग व अद्रा नक्षत्रात पावसाने हजेरी लावली नाही . शनिवारी ६ जुलै रोजी पनीवसू नक्षत्र सुरु झाले आहे. पावसाळ्याची सुरुवात होऊन एक महिना उलटला. तरी सरासरीच्या १० टक्के पाऊस झाला नाही. परिणामी पेरणीसह भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे . ही परिस्थिती अशीच राहिली तर मात्र पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होणार आहे. ग्रामीण भागासह नांदेड शहरात पाण्यासाठी प्रशासनाला टॅकरची व्यवस्था करावी लागत आहे . जिल्ह्यात अजूनही १५६ टँकर द्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे येणारा काळ नागरीकांसाठी व प्रशासनासाठी अत्यंत कठीण आहे.
राज्यात सर्वत्र पाऊस सुरु असताना केवळ नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २८ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे .
८ जून रोजी मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे. उंदीर वाहन घेऊन आलेले मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर २२ जून रोजी हत्ती वाहन घेऊन आद्रा नक्षत्रात पावसाने हजेरी लावलीच नाही. आता लोकांचे लक्ष पर्नवसू नक्षत्राकडे लागले आहे. गेंडा वाहन घेऊन आलेल्या पर्नवसू नक्षत्रात पाऊस होईल अशी अशा शेतकरी बाळगून आहेत. सर्व साधारणपणे रोहिण्या व भरण्या नक्षत्रात पावसाळ्याला सुरुवात होते . मृग निघाला की मुग , उडीद, तूर या खरीप पिकांची पेरणी केली जाते. या काळात या पिकांची पेरणी झाली तरच उत्पन्नाचा उतारा चांगला येतो. सध्या पावसाने एक महिना खंड दिल्याने सुरुवातीच्या काळात घेण्यात येणा - या मुग व उडीद या नगदी पिकांची पेरणी शेतक - यांना करता येणार नाही. आता शेतक - याची भिस्त सोयाबीन व तूर या पिकांवर
आहे. परंतु पर्नवसू नक्षत्र कोरडे गेले तर मात्र शेतक - यांना खरीप पेरणी करता येणार नाही अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी आसमानी संकटात सापडला आहे .

दुबार पेरणीचे संकट
-----------------------------------
काही भागात पाऊस झाला. पावसाळ्याचे दिवस आहेत . पाऊस पडेल या आशेने काही शेतक - यांनी पेरणी केली. परंतु पेरले ते उगवलेच नाही. त्यामुळे काही शेतक - यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. या शेतक - यांना बियाणे उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था प्रशासनाला करावी लागणार आहे . याबाबत कृषी विभागाने आतापर्यंत कोणतीच तयारी केली नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शेतक - यांना भविष्यात बियाण्यांसाठी अडचणी निर्माण होणार आहेत. तसेच बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.Conclusion:
Last Updated : Jul 11, 2019, 2:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.