ETV Bharat / state

नागपूरकरांवरील पाणी कपातीचे संकट 15 दिवसांसाठी टळले

author img

By

Published : Sep 2, 2019, 2:10 PM IST

मध्य प्रदेशमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे चौराई धरण 92 टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणातून पाणी सोडल्याने तोतलाडोह 33 टक्के तर नवेगाव खैरी 28 टक्के भरले आहे. त्यामुळे 15 दिवसांसाठी पाणीकपातीचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.

नागपूर: नागपुरकरांवरील पाणी कपातीचे संकट 15 दिवसांसाठी टळले


नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणातील जलसाठा वाढल्यानंतर नागपूरकरांवरील पाणी कपातीचे संकट 15 दिवसांसाठी टळली आहे. गणेशोत्सवाच्या काळात पाणी कपात होणार नसली, तरी त्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतल्या नंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

पिंटू झलके सभापती पाणीपुरवठा विभाग मनपा

नागपुरामध्ये पाणीकपातीचा निर्णय 15 दिवसांसाठी स्थगित करण्यात आला आहे. गणेशोत्सव आणि सणासुदीचे दिवस असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 15 दिवसानंतर पुन्हा आढावा घेऊन यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने महापालिकेने एक दिवसाआड पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. मध्य प्रदेश सरकारने बांधलेल्या चौराई धरणामुळे तोतलाडोह आणि नवेगाव खैरी या नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचे पाणी अडवले जात आहे. मात्र, मध्य प्रदेश मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे चौराई धरण 92 टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणातून पाणी सोडल्याने तोतलाडोह 33 टक्के तर नवेगाव खैरी 28 टक्के भरले आहे. त्यामुळे 15 दिवसांसाठी पाणीकपातीचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.


नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणातील जलसाठा वाढल्यानंतर नागपूरकरांवरील पाणी कपातीचे संकट 15 दिवसांसाठी टळली आहे. गणेशोत्सवाच्या काळात पाणी कपात होणार नसली, तरी त्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतल्या नंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

पिंटू झलके सभापती पाणीपुरवठा विभाग मनपा

नागपुरामध्ये पाणीकपातीचा निर्णय 15 दिवसांसाठी स्थगित करण्यात आला आहे. गणेशोत्सव आणि सणासुदीचे दिवस असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 15 दिवसानंतर पुन्हा आढावा घेऊन यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने महापालिकेने एक दिवसाआड पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. मध्य प्रदेश सरकारने बांधलेल्या चौराई धरणामुळे तोतलाडोह आणि नवेगाव खैरी या नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचे पाणी अडवले जात आहे. मात्र, मध्य प्रदेश मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे चौराई धरण 92 टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणातून पाणी सोडल्याने तोतलाडोह 33 टक्के तर नवेगाव खैरी 28 टक्के भरले आहे. त्यामुळे 15 दिवसांसाठी पाणीकपातीचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.

Intro:नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलडोह धरणातील जलसाठा वाढल्यानंतर नागपूरकरांवरील पाणी कपातीचे संकट 15 दिवसांसाठी टळली आहे....गणपती उत्सवाच्या काळात पाणी कपात होणार नसली तरी त्यानंतर च्या परिस्थितीचा आढावा घेतल्या नंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे Body:नागपूरात पाणीकपातीचा निर्णय 15 दिवस स्थगित केलाय. गणेशोत्सव आणि सणासुदीचे दिवस असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. 15 दिवसानंतर पुन्हा आढावा घेऊन यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्यानं महापालिकेनं एक दिवसाआड पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. मध्य प्रदेश सरकारनं बांधलेल्या चौराई धरणामुळे तोतलडोह आणि नवेगाव खैरी या नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाचं पाणी अडलं होतं. मात्र मध्य प्रदेश मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळं चौराई धरण 92 टक्के भरलं. त्यामुळं या धरणातून पाणी सोडल्यानं तोटलाडोह 33 टक्के तर नवेगाव खैरी 28 टक्के भरला आहे. त्यामुळं 15 दिवस पाणीकपातीचा निर्णय स्थगित करण्यात आलाय.

बाईट- पिंटू झलके- सभापती पाणीपुरवठा मनपा Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.