ETV Bharat / state

'महात्मा गांधींनीही इंग्रजांना पत्र लिहिले होते हे सावरकरांना विरोध करणाऱ्यांनी विसरू नये'

author img

By

Published : Oct 19, 2019, 12:26 PM IST

Updated : Oct 19, 2019, 2:15 PM IST

भाजपने आपल्या जाहीरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देणार असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात वाद रंगला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. आता यामध्ये योगगुरू रामदेवबाबा यांनी सुद्धा उडी घेतली आहे.

रामदेवबाबा

नागपूर - सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिण्याचा कांगावा काँग्रेस करीत आहे. मात्र, महात्मा गांधींनी सुद्धा इंग्रजांना पत्र लिहिले होते, हे त्यांनी विसरू नये, असे वक्तव्य रामदेवबाबा यांनी केले. इंग्रजांना पत्र लिहून मदत करणे हे भारतीयांचे कर्तव्य असल्याचे खुद्द महात्मा गांधी यांनी म्हटले असल्याचा दावा देखील रामदेवबाबा यांनी केला. ते शुक्रवारी नागपुरात बोलत होते.

सावकरांवर बोलताना रामदेवबाबा

इंग्रजांना सावरकरांनी लिहिलेल्या पत्राबद्दल आरोप करणारी काँग्रेस महात्मा गांधी यांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रावर गप्प का बसते? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उफस्थित केला. सावरकरांनी इंग्रजांना त्यांच्या रणनितीचा भाग म्हणून पत्र लिहिले होते. कारण त्यांना तुरुंगातून बाहेर येऊन इंग्रजांविरोधात लढा द्यायचा होता. मात्र, महात्मा गांधी यांनी इंग्रजांना पत्र लिहून इंग्रजांना मदत करणे हे भारतीयांचे कर्तव्य असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यावर काँग्रेस काहीच बोलत नाही, असा आरोप रामदेव यांनी केला.

सावरकरांना भारतरत्न दिलाच पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. तसेच राम मंदिर बनणे गरजेचे आहे. मोदी, शाह ही जोडीच त्याचे निर्माण करणार असल्याचे रामदेव म्हणाले.

नागपूर - सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिण्याचा कांगावा काँग्रेस करीत आहे. मात्र, महात्मा गांधींनी सुद्धा इंग्रजांना पत्र लिहिले होते, हे त्यांनी विसरू नये, असे वक्तव्य रामदेवबाबा यांनी केले. इंग्रजांना पत्र लिहून मदत करणे हे भारतीयांचे कर्तव्य असल्याचे खुद्द महात्मा गांधी यांनी म्हटले असल्याचा दावा देखील रामदेवबाबा यांनी केला. ते शुक्रवारी नागपुरात बोलत होते.

सावकरांवर बोलताना रामदेवबाबा

इंग्रजांना सावरकरांनी लिहिलेल्या पत्राबद्दल आरोप करणारी काँग्रेस महात्मा गांधी यांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रावर गप्प का बसते? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उफस्थित केला. सावरकरांनी इंग्रजांना त्यांच्या रणनितीचा भाग म्हणून पत्र लिहिले होते. कारण त्यांना तुरुंगातून बाहेर येऊन इंग्रजांविरोधात लढा द्यायचा होता. मात्र, महात्मा गांधी यांनी इंग्रजांना पत्र लिहून इंग्रजांना मदत करणे हे भारतीयांचे कर्तव्य असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यावर काँग्रेस काहीच बोलत नाही, असा आरोप रामदेव यांनी केला.

सावरकरांना भारतरत्न दिलाच पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. तसेच राम मंदिर बनणे गरजेचे आहे. मोदी, शाह ही जोडीच त्याचे निर्माण करणार असल्याचे रामदेव म्हणाले.

Intro:भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस करणार असल्याचे नमूद केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला आहे....आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना योगगुरू रामदेवबाबा यांनी सुद्धा यामध्ये उडी घेतली आहे...सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिल्याचा कांगावा करत असलेल्या विरोधकांनी महात्मा गांधी यांनी सुद्धा इंग्रजांना पत्र लिहिले होते हे विसरू नये...महात्मा गांधी यांनी इंग्रजांना पत्र लिहून इंग्रजाना मदत करणे हे भारतीयांचे कर्तव्य असल्याचे म्हंटल्याचा दावा रामदेवबाबा यांनी केला आहे Body:इंग्रजांना सावरकरांनी लिहिलेल्या पत्राबद्दल आरोप करणारी काँग्रेस... महात्मा गांधी यांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रावर गप्प का बसते असा सवाल योगगुरू रामदेव बाबा यांनी विचारला आहे.. सावरकरांनी इंग्रजांना त्यांच्या रणनितीचा भाग म्हणून पत्र लिहिले होते.. कारण त्यांना तुरुंगातून बाहेर येऊन इंग्रजांविरोधात लढा द्यायचा होता असे रामदेव म्हणाले.. मात्र, महात्मा गांधी यांनी इंग्रजांना पत्र लिहून इंग्रजाना मदत करणे हे भारतीयांचे कर्तव्य असल्याचे मत व्यक्त केले होते.. त्यावर काँग्रेस काहीच बोलत नाही असा आरोप रामदेव यांनी केला.. सावरकर यांना भारत रत्न दिलेच पाहिजे अशी मागणी ही त्यांनी केली.. देशाचा आत्मसन्मान असलेला राम मंदिर बनणे निश्चित असून मोदी शाह ही जोडीच त्याचे निर्माण  करणार असे ही ते म्हणाले....


बाईट - रामदेव बाबा, योगगुरूConclusion:
Last Updated : Oct 19, 2019, 2:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.