नागपूर - कॉलरवाल्या वाघिणीच्या अंत्यसंस्कारवेळी भारतीयांचे सजीव प्राण्यांसाठीची सहानुभूती आणि संस्कृतीचे दर्शन झाल्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ( PM Narendra Modi on Collarwali Tigress Funeral ) रविवारी 'मन की बात' या रेडिओ ( Man Ki Baat ) कार्यक्रमात बोलताना भावना व्यक्त केली. प्रत्येक सजीवासाठी सहानुभूती दाखवण्याचा हा स्वभाव भारतीय संस्कृतीत असल्याचेही ते म्हणाले. 15 जानेवारीला सुपर मॉम म्हणून ओळख असलेल्या कॉलरववाल्या वाघिणीच्या पेंच व्याघ्र प्रकल्पात ( Pench Tiger Project ) मृत्यू झाला. यानंतर पतंप्रधानांनी आपली प्रतिक्रिया दिली.
निसर्गावर प्रेम करणे आणि सजीव प्राण्यांप्रती करुणामय स्वभाव व्यक्त करणे हीच आपली संस्कृती आहे. याचीच झलक नुकत्याच मध्यप्रदेशच्या पेंच व्याघ्र प्रकल्पात मरण पाववलेल्या कॉलरवाल्या वाघिणीच्या मृत्यूनंतर दिसून आली. कारण यावेळी तिच्या मृत्यूनंतर ज्या पद्धतीने शोक आणि दुःख कॉलरवाल्या वाघिणीसाठी व्यक्त केला, की जणू त्यांच्यातील कोणीतरी जगाचा निरोप घेतला. या पद्धतीने दुःख आणि संवेदना व्यक्त करण्यात आली.
हेही वाचा - Mann Ki Baat : हा दिवस बापूंच्या विचारांची शिकवण देतो - पंतप्रधान मोदी
लोकांनी आणि वन विभागाने रितसर अंत्यसंस्कार करून सन्मानपूर्वक जड अंतकरणाने त्या वाघिणीला शेवटचा निरोप दिला. जगभरात भारतीयांच्या हा स्वभाव आणि संस्कृती कौतुकास पात्र ठरली. या वाघिणीला काही वन्यप्रेमींनी कॉलवरवाली वाघीण म्हटले. वन विभागाने टी15 असे नाव दिले होते. कॉलरवाल्या वाघिणीने तिच्या जीवनकाल चक्रात 29 शावकाना जन्म दिला. त्याचाही आनंद व्यक्त केला. यासोबतच त्यामुळेच तिला सुपरमॉम असेही म्हटले आहे. प्रत्येक सजीव प्रजातीसोबत प्रेम आणि स्नेहपूर्ण संबंध बनून घेते, हीच भारतीयांची खरी ओळख आहे, असे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तर सोशल मीडियावरही तिला श्रद्धांजली वाहण्यात आली.