ETV Bharat / state

Nana Patole News: गांधी कुटुंबावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे- नाना पटोलेंची संजय राऊत यांच्यावर टीका

author img

By

Published : May 3, 2023, 1:39 PM IST

Updated : May 3, 2023, 2:13 PM IST

संजय राऊत यांनी चोमडेगिरी बंद करावी, असा थेट इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय हे अध्यक्ष मल्लिकार्जुन असताना राहुल गांधी हे निर्णय घेतात, असे वक्तव्य केल्यामुळे नाना पटोले चांगलेच संतापले आहेत. संजय राऊत हे आमच्या पक्षाचे नेते नाहीत किंवा प्रवक्ते देखील नाहीत. गांधी कुटुंबावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे असल्याचे ते म्हणाले आहेत. आमचे अध्यक्ष मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करतात. म्हणून संजय राऊत त्यांच्यावर टीका करतात का, अशी शंका वाटते असे देखील नाना पटोले म्हणाले आहेत.

Nana Patole News
नाना पटोले

नागपूर : शरद पवार यांनी लिहिलेल्या पुस्तकात काँग्रेस पक्षाच्या एकूण भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याबाबत नाना पटोले म्हणाले की, शरद पवार मोठे राष्ट्रीय नेते आहे. ते काहीही लिहू शकतात, बोलू शकतात. आम्ही त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया देणे योग्य नाही. योग्य वेळी बोलू. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेले फेरबदल हे त्यांच्या पक्षांतर्गत बाब आहे. स्वतः शरद पवार यांनी मार्गदर्शक म्हणून राहणार, असे सांगितले आहे. त्यांच्या पक्षांतर्गत बाबीवर आम्ही बोलणे योग्य नसल्याचे ते म्हणाले आहेत. राष्ट्रवादीतील घडामोडींचा महाविकास आघाडीवर काही फरक पडणार नाही, असे देखील नाना म्हणाले आहेत. मुंबईत गेल्यावर वेळ ऍडजस्ट झाल्यावर शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी : शेतकरी अडचणीत आहे. सरकारचे अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे शेतकरी अनेक ठिकाणी सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे. हे सर्व आम्ही सोमवारी राज्यपाल यांना सांगितले आहे. खारघरच्या घटनेबद्दल सरकार बोलायला तयार नाही. आम्ही सोमवारी राज्यपालांकडे खारघारच्या घटनेबद्दल विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी केली असल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत.


आरक्षणात वाढ करण्याची मागणी : छत्तीसगड सरकारने लोकसंख्येनुसार तिथे आरक्षणात वाढ केली आहे. महाराष्ट्रात ही वाढलेल्या लोकसंख्येनुसार ओबीसी, एससी, एसटी आणि विजेएनटी यांच्या आरक्षणात वाढ करावी, अशी मागणी आम्ही राज्यपालांना केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी माझे काही बोलणे झाले नाही. मला वाटते, राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेणार नाही. राष्ट्रवादी पक्ष हा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर चालतो. भाजप तर हे विचार संपवायला निघालेला पक्ष आहे. राष्ट्रवादी त्यांच्यासोबत जाणार नाही. काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. आम्ही अनेक मतदारसंघात विजयी होत आहे. त्यामुळे विविध पक्षातील नेते आमच्याकडे येत आहे. उद्या नागपुरात काही पक्ष प्रवेश होतील.

हेही वाचा : Nana Patole On Sharad Pawar Resign : शरद पवारांनी राजीनामा का दिला हे समजण्यापलीकडे - नाना पटोले

नागपूर : शरद पवार यांनी लिहिलेल्या पुस्तकात काँग्रेस पक्षाच्या एकूण भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याबाबत नाना पटोले म्हणाले की, शरद पवार मोठे राष्ट्रीय नेते आहे. ते काहीही लिहू शकतात, बोलू शकतात. आम्ही त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया देणे योग्य नाही. योग्य वेळी बोलू. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेले फेरबदल हे त्यांच्या पक्षांतर्गत बाब आहे. स्वतः शरद पवार यांनी मार्गदर्शक म्हणून राहणार, असे सांगितले आहे. त्यांच्या पक्षांतर्गत बाबीवर आम्ही बोलणे योग्य नसल्याचे ते म्हणाले आहेत. राष्ट्रवादीतील घडामोडींचा महाविकास आघाडीवर काही फरक पडणार नाही, असे देखील नाना म्हणाले आहेत. मुंबईत गेल्यावर वेळ ऍडजस्ट झाल्यावर शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी : शेतकरी अडचणीत आहे. सरकारचे अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे शेतकरी अनेक ठिकाणी सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे. हे सर्व आम्ही सोमवारी राज्यपाल यांना सांगितले आहे. खारघरच्या घटनेबद्दल सरकार बोलायला तयार नाही. आम्ही सोमवारी राज्यपालांकडे खारघारच्या घटनेबद्दल विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी केली असल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत.


आरक्षणात वाढ करण्याची मागणी : छत्तीसगड सरकारने लोकसंख्येनुसार तिथे आरक्षणात वाढ केली आहे. महाराष्ट्रात ही वाढलेल्या लोकसंख्येनुसार ओबीसी, एससी, एसटी आणि विजेएनटी यांच्या आरक्षणात वाढ करावी, अशी मागणी आम्ही राज्यपालांना केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी माझे काही बोलणे झाले नाही. मला वाटते, राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेणार नाही. राष्ट्रवादी पक्ष हा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर चालतो. भाजप तर हे विचार संपवायला निघालेला पक्ष आहे. राष्ट्रवादी त्यांच्यासोबत जाणार नाही. काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. आम्ही अनेक मतदारसंघात विजयी होत आहे. त्यामुळे विविध पक्षातील नेते आमच्याकडे येत आहे. उद्या नागपुरात काही पक्ष प्रवेश होतील.

हेही वाचा : Nana Patole On Sharad Pawar Resign : शरद पवारांनी राजीनामा का दिला हे समजण्यापलीकडे - नाना पटोले

Last Updated : May 3, 2023, 2:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.