ETV Bharat / state

नागपुरात ५९२ तळीरामांसह १ हजार ९२ वाहन चालकांवर कारवाई

author img

By

Published : Jan 1, 2020, 4:59 PM IST

३१ डिसेंबरच्या रात्री सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागपूरकर रस्त्यावर उतरले होते. यात अनेकांनी नव वर्षाचा उत्सव शांततेत साजरा केला.

nagpur
वाहन चालकांना तपासताना पोलीस

नागपूर- ३१ डिसेंबरच्या रात्री दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या ५९२ तळीरामांवर नागपूर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. तर इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५०० वाहन चालकांवरही पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

माहिती देताना नागपूरचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित

३१ डिसेंबरच्या रात्री सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागपूरकर रस्त्यावर उतरले होते. यात अनेकांनी नव वर्षाचा उत्सव शांततेत साजरा केला. मात्र, यात अनेक असेही होते ज्यांनी रस्त्यावर दारू पिऊन वाहन चालविण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांचे आवाहन झुगारून त्यांनी नियमांचे उल्लंघन केले. अश्या ५९२ तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली आणि वाहन जप्त केले आहे. तर, इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५०० जणांवरसुद्धा कारवाई करण्यात आली असून एकूण १ हजार ९२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी शहरात ५० ठिकाणी नाकाबंदी केली होती. काल शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याने कुठलीही दुर्घटना घडली नाही. मात्र, ज्यांच्यावर आधीसुद्धा कारवाई झाली आणि काल पुन्हा कारवाई झाली त्यांचे लायसन्स रद्द करण्याची विनंती आर.टी.ओ. ला करणार असल्याचेही वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नूतन वर्षाचे आगमन होण्याच्या काही वेळ आधीच वरूणराजा मनसोक्तपणे बरसला. त्यामुळे, अनेकांच्या उत्साहावर विरजण पडल्याने नागरिकांनी रस्त्यावर येऊन सेलिब्रेशन करणे टाळले. त्यामुळे कारवाईची संख्या कमी झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा- नागपूर: महापौरांच्या आवाहनाकडे भाजप नगरसेवकांचा काणा डोळा

नागपूर- ३१ डिसेंबरच्या रात्री दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या ५९२ तळीरामांवर नागपूर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. तर इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५०० वाहन चालकांवरही पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

माहिती देताना नागपूरचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित

३१ डिसेंबरच्या रात्री सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागपूरकर रस्त्यावर उतरले होते. यात अनेकांनी नव वर्षाचा उत्सव शांततेत साजरा केला. मात्र, यात अनेक असेही होते ज्यांनी रस्त्यावर दारू पिऊन वाहन चालविण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांचे आवाहन झुगारून त्यांनी नियमांचे उल्लंघन केले. अश्या ५९२ तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली आणि वाहन जप्त केले आहे. तर, इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५०० जणांवरसुद्धा कारवाई करण्यात आली असून एकूण १ हजार ९२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी शहरात ५० ठिकाणी नाकाबंदी केली होती. काल शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याने कुठलीही दुर्घटना घडली नाही. मात्र, ज्यांच्यावर आधीसुद्धा कारवाई झाली आणि काल पुन्हा कारवाई झाली त्यांचे लायसन्स रद्द करण्याची विनंती आर.टी.ओ. ला करणार असल्याचेही वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नूतन वर्षाचे आगमन होण्याच्या काही वेळ आधीच वरूणराजा मनसोक्तपणे बरसला. त्यामुळे, अनेकांच्या उत्साहावर विरजण पडल्याने नागरिकांनी रस्त्यावर येऊन सेलिब्रेशन करणे टाळले. त्यामुळे कारवाईची संख्या कमी झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा- नागपूर: महापौरांच्या आवाहनाकडे भाजप नगरसेवकांचा काणा डोळा

Intro:31 डिसेंबर च्या रात्री दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या 592 तडीरामा वर नागपूर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली तर इतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 500 वाहन चालकांवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे Body:31 डिसेंबर च्या रात्री सरत्या वर्ष्याला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष्याच् स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागपूरकर रस्त्यावर उतरले होते यात अनेकांनी शांततेत हा उत्सव साजरा केला मात्र यात अनेक असेही होते ज्यांनी रस्त्यावर दारू पिऊन वाहन चालविण्याचा प्रयत्न केला पोलिसांचं आवाहन झुगारून त्यांनी नियमांचं उल्लंघन केल्या अश्या 592 तडीराम वर पोलिसांनी कारवाईकेली आणि वाहन जप्त केली तर इतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 500 जणांवर सुद्धा कारवाई करण्यात आली एकूण 1092 वाहनांवर ही कारवाई करण्यात आली...पोलिसांनी शहरात 50 ठिकाणी नाका बंदी केली होती,काल शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असल्याने कुठलीही दुर्घटना घडली नाही , मात्र ज्यांच्यावर आधी सुद्धा कारवाई झाली आणि काल पुन्हा कारवाई झाली त्यांचं लायसन्स रद्द करण्याची विनंती आर टी ओ ला करणार असल्याचं सुद्धा वाहतूक विभागाकडन सांगण्यात आलं...सर्वात महत्त्वाचे म्हणजे नूतन वर्षेचे आगमन होण्याच्या काही वेळ आधीच वरुणराजा मनसोक्तपणे बरसल्याने अनेकांच्या उत्साहावर विरजण पडल्याने नागरिकांनी रस्तावर येऊन सेलिब्रेशन करणे टाळल्याने कारवाईची संख्या कमी झाल्याचे अधिकारी सांगत आहेत

बाईट - चिन्मय पंडित - डीसीपी वाहतूक शाखा Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.