ETV Bharat / state

पैसे द्या ! अन्यथा कामं बंद करू; कंत्राटदारांचा नागपूर मनपाला दम - इशारा

नागपूर महानगरपालिकेने कंत्राटदारांचे बिलाचे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे या कंत्राटदारांनी आधी पैसे द्या, अन्यथा काम बंद करू, असा इशारा दिला आहे. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्र्यांच्याच शहरातील विकासकामे ठप्प होण्याच्या मार्गावर आली आहेत.

महापौर नंदा जिचकार
author img

By

Published : Jun 4, 2019, 11:02 AM IST

नागपूर - गेल्या सहा महिन्यांपासून नागपूर महानगरपालिकेने कंत्राटदारांचे बिलाचे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे या कंत्राटदारांनी आधी पैसे द्या, अन्यथा काम बंद करू, असा इशारा महानगरपालिकेला दिला आहे. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्र्यांच्याच शहरातील विकासकामे ठप्प होण्याच्या मार्गावर आली आहेत.

आधी पैसे द्या, अन्यथा काम बंद करू,कंत्राटदारांचा मनपा ला इशारा

पावसाळ्याच्या तोंडावर नागनदीवरील सुरक्षा भिंत आणि अर्धवट कामे बंद पडली आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून मनपाने कंत्राटदारांची बिले थकविली आहेत. मालमत्ता कराचेही अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे नागपूर महानगरपालिका आर्थिक संकटात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मनपाने कंत्राटदारांचे साधारण १५० कोटी रुपयांची बिले थकवली आहेत. त्यामुळेच आता थेट कामे सोडण्याचा इशाराच कंत्राटदारांनी दिला आहे. नाले आणि नदीवरील सुरक्षा भिंत बाधण्याचे काम पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे. अशा स्थितीत कंत्राटदारांनी कामे बंद केल्यास त्याचा मोठा फटका नागपूरकरांना बसणार आहे. कंत्राटदारांचे त्यांच्या कामाचे त्वरीत पैसे देऊ, असे महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले आहे.

नागपूर - गेल्या सहा महिन्यांपासून नागपूर महानगरपालिकेने कंत्राटदारांचे बिलाचे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे या कंत्राटदारांनी आधी पैसे द्या, अन्यथा काम बंद करू, असा इशारा महानगरपालिकेला दिला आहे. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्र्यांच्याच शहरातील विकासकामे ठप्प होण्याच्या मार्गावर आली आहेत.

आधी पैसे द्या, अन्यथा काम बंद करू,कंत्राटदारांचा मनपा ला इशारा

पावसाळ्याच्या तोंडावर नागनदीवरील सुरक्षा भिंत आणि अर्धवट कामे बंद पडली आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून मनपाने कंत्राटदारांची बिले थकविली आहेत. मालमत्ता कराचेही अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे नागपूर महानगरपालिका आर्थिक संकटात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मनपाने कंत्राटदारांचे साधारण १५० कोटी रुपयांची बिले थकवली आहेत. त्यामुळेच आता थेट कामे सोडण्याचा इशाराच कंत्राटदारांनी दिला आहे. नाले आणि नदीवरील सुरक्षा भिंत बाधण्याचे काम पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे. अशा स्थितीत कंत्राटदारांनी कामे बंद केल्यास त्याचा मोठा फटका नागपूरकरांना बसणार आहे. कंत्राटदारांचे त्यांच्या कामाचे त्वरीत पैसे देऊ, असे महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले आहे.

Intro:सहा महिन्यांपासून पैसे थकीत मनपा कंत्राटदार कामं सोडण्याच्या तयारीत


मुख्यमंत्र्यांच्या शहरातील विकासकामं ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत सहा महिन्यांपासून महानगरपालिकेने पैसे न दिल्याने मनपा तर्फ़े घेतलेली विकास कामं सोडण्याचा इशारा कंत्राटदारांनी दिलाय.पावसाळ्याच्या तोंडावर नागनदीवरील सुरक्षा भिंत आणि अर्धवट कामं बंद पडल्यास नागपूरकरांना याचा मोठा फटका बसणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून
मनपाने कंत्राटदारांचे बिलं थकवलेय. नागपूर महानगरपालिका आर्थिक संकटात आहेत.मालमत्ता कराचंही अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही गेल्या सहा महिन्यापासून मनपानं कंत्राटदारांचे साधारण १५० कोटींचे बिलं पेंडिग ठेवलंयBody:त्यामुळेच आता कामं सोडण्याचा इशाराच कंत्राटदारांनी दिलाय.आता कंत्राटदारांचे पैसे देऊ, असं महापौर नंदा जिचकार सांगतात. नाले आणि नदीवरील सुरक्षा भिंत बाधण्याचं काम पावसाळ्यापूर्वी होणं गरजेचं आहे. अशा स्थितीत कंत्राटदारांनी कामं बंद केल्यास त्याचा मोठा फटका सर्वसामान्य नागपूरकरांना बसणार आहे

बाईट - विजय नायडू, अध्यक्ष, मनपा कंत्राटदार संघटना

बाईट - नंदा जिचकार, महापौर, नागपूर महानगरपालिका Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.