ETV Bharat / state

नागपुरात क्षुल्लक कारणातून तरुणाची निर्घृण हत्या

क्राईम कॅपिटल म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या नागपुरात शुल्लक कारणावरून तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. दुचाकी वेगात चालवल्याच्या रागात 5 आरोपींनी आशिष देशपांडे नावाच्या तरुणाला जबर मारहाण केली, यात त्याचा मृत्यू झाला.

author img

By

Published : Aug 13, 2019, 9:55 PM IST

मृत आशिष देशपांडे

नागपूर- नागपुरात क्षुल्लक करणातून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. क्राईम कॅपिटल म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या नागपुरात क्षुल्लक कारणावरून हत्या झाल्याची घटना घडली आहे. दुचाकी वेगात चालवल्याच्या रागात 5 आरोपींनी आशिष देशपांडे नावाच्या तरुणाला जबर मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आशिष देशपांडे याच्या हत्येप्रकरणी 5 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे.

नागपुरात क्षुल्लक कारणातून तरुणाची निर्घृण हत्या

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आशिष देशपांडे नावाचा तरुण शांतीनगर परिसरातील रहिवासी आहे. रात्री उशिरा आशिष घरी परत येत असताना त्याने त्याची दुचाकी वेगाने चालवली. या कारणाने 5 आरोपींनी आशिषच्या घरी जाऊन त्याला जबर मारहाण केली. आरोपींनी आशिषच्या डोक्यावर आणि पोटावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. पण जबर मार लागल्याने आशिषचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी सुरज मेश्राम, रॉकी मेश्राम, आशु मेश्राम आणि आदर्श नामक आरोपींवर हत्येचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे. दुचाकी वेगाने चालवल्याच्या कारणावरून आशिषची हत्या केल्याची माहिती आरोपींनी पोलिसांनी दिली आहे. तरी या मागे आणखी दुसरे कारण आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

नागपूर- नागपुरात क्षुल्लक करणातून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. क्राईम कॅपिटल म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या नागपुरात क्षुल्लक कारणावरून हत्या झाल्याची घटना घडली आहे. दुचाकी वेगात चालवल्याच्या रागात 5 आरोपींनी आशिष देशपांडे नावाच्या तरुणाला जबर मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आशिष देशपांडे याच्या हत्येप्रकरणी 5 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे.

नागपुरात क्षुल्लक कारणातून तरुणाची निर्घृण हत्या

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आशिष देशपांडे नावाचा तरुण शांतीनगर परिसरातील रहिवासी आहे. रात्री उशिरा आशिष घरी परत येत असताना त्याने त्याची दुचाकी वेगाने चालवली. या कारणाने 5 आरोपींनी आशिषच्या घरी जाऊन त्याला जबर मारहाण केली. आरोपींनी आशिषच्या डोक्यावर आणि पोटावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. पण जबर मार लागल्याने आशिषचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी सुरज मेश्राम, रॉकी मेश्राम, आशु मेश्राम आणि आदर्श नामक आरोपींवर हत्येचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे. दुचाकी वेगाने चालवल्याच्या कारणावरून आशिषची हत्या केल्याची माहिती आरोपींनी पोलिसांनी दिली आहे. तरी या मागे आणखी दुसरे कारण आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

Intro:क्राईम कॅपिटल म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या नागपुरात क्षुल्लक कारणावरून पुन्हा एकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे....दुचाकी स्पीडणे चालवल्याच्या कारणाने 5 आरोपिनी आशिष देशपांडे नावाच्या तरुणाला जबर मारहाण केली ज्यात त्याचा मृत्यू झाला आहे ...ही घटना शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हत्येचा थरार घडला आहे...आशिष देशपांडे यांच्या हत्येप्रकरणी 5 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे...Body:पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार आशी देशपांडे नावाचा तरुण शांतिनगर परिसरातला रहिवासी आहे....रात्री उशिरा आशिष घरी परत येत असताना त्याने त्याची दुचाकी वेगाने चालवली या शुक्लल कारणाने 5 आरोपींनी आशिषच्या घरी जाऊन त्याला जबर मारहाण केली....आरोपींनी आशिषच्या डोक्यावर आणि पोटावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला होता.... त्याला उपचाराकरिता मेयो रुग्णालयात दाखल केले असता आशिष चा दुर्दैवी मृत्यू झाला आहे...या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी सुरज मेश्राम,रॉकी मेश्राम,आशु मेश्राम,आणि आदर्श नामक आरोपींवर हत्येचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे...दुचाकी वेगाने चालवल्याच्या कारणावरून आशिषची हत्या केल्याची माहिती आरोपींनी पोलिसांनी दिली असली तरी या मागे आणखी दुसरे कारण आहे काय याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे

बाईट-कवडू बाजीराव उईके - पोलीस निरीक्षक शांतीनगर

Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.