ETV Bharat / state

ऑटोमोबाईल उद्योगातील मंदीचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेवर!

ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसत असल्याचे पाहायला मिळत आहे.

author img

By

Published : Aug 1, 2019, 11:31 AM IST

आशिष काळे

नागपूर- २०१८ पासून ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. चारचाकी गाड्यासाठी लागणारे थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या किंमती ५ पटीने वाढल्या आहेत. तसेच दुचाकी वाहनांसाठी लागणाऱ्या थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये ३ पटीने वाढ झाली आहे. याचा सरळ फटका हा ऑटोमोबाईल उद्योगाला बसत असून ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसत असल्याचे पाहायला मिळत आहे.

- आशिष काळे, अध्यक्ष विदर्भ ऑटोबाईल डीलर्स असोसिएशन

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. परिणामी लोकांचा कल चारचाकी वाहन खरेदीकडे कमी झाला. सोबतच दुचाकी वाहनांच्या विक्रीमध्ये देखील फरक दिसायला लागला आहे, अशी माहिती ऑटोबाईल डिलर्स असोसिएशन अध्यक्ष आशिष काळे यांनी दिली.

मंदी सदृश परिस्थिती बघता ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक नोकऱ्या देखील धोक्यात आहेत. आंतरराष्ट्रीय बाजार पेठेवर देखील याचे परिणाम दिसण्याची शक्यता आहे. कारण, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकवरील ऑटोमोबाईल उत्पादक देश आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम ऑटोमोबाईल पार्टसच्या निर्यातीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नागपूर- २०१८ पासून ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. चारचाकी गाड्यासाठी लागणारे थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या किंमती ५ पटीने वाढल्या आहेत. तसेच दुचाकी वाहनांसाठी लागणाऱ्या थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये ३ पटीने वाढ झाली आहे. याचा सरळ फटका हा ऑटोमोबाईल उद्योगाला बसत असून ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसत असल्याचे पाहायला मिळत आहे.

- आशिष काळे, अध्यक्ष विदर्भ ऑटोबाईल डीलर्स असोसिएशन

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. परिणामी लोकांचा कल चारचाकी वाहन खरेदीकडे कमी झाला. सोबतच दुचाकी वाहनांच्या विक्रीमध्ये देखील फरक दिसायला लागला आहे, अशी माहिती ऑटोबाईल डिलर्स असोसिएशन अध्यक्ष आशिष काळे यांनी दिली.

मंदी सदृश परिस्थिती बघता ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक नोकऱ्या देखील धोक्यात आहेत. आंतरराष्ट्रीय बाजार पेठेवर देखील याचे परिणाम दिसण्याची शक्यता आहे. कारण, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकवरील ऑटोमोबाईल उत्पादक देश आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम ऑटोमोबाईल पार्टसच्या निर्यातीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Intro:ऑटो मोबाईल क्षेत्रातील मंदीचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसतोय याचा परिणाम देखील बघायला मिळत आहे.तसच ऑटोबाईल पार्टस वर परिणाम दिसायला लागेल आहेत.२०१८ पासून सुरू मंदी सदृश्य परिस्थिती ही ऑटोमोबाईल क्षेत्रावर वर आहे. चारचाकी गाड्या साठी लागणारे तिसऱ्या पार्टी चे इन्शुरन्स किंमती ५ पटीने वाढल्या तसच दुचाकी वाहनांसाठी लागणाऱ्या थर्ड पार्टी इन्शुरन्स मध्ये ३ पटीने वाढ झाली आणि याचा सरड फटका हा ऑटोमोबाईल उद्योगावर बसायला लागलाय.


Body:त्या नंतर च्या काळात पेट्रोल आणि डिझेल मध्ये सातत्यानं वाढ झाली परिणामी लोकांचा कल चारचाकीवाहन खरेदी कडे कमी झाला सोबतच दुचाकी वाहनांन च्या विक्री मध्ये देखील फरक दिसायला लागला अशी माहिती ऑटोबाईल डीलर्स असोशी6 चे अध्यक्ष आशिष काळे यांनी दिली. मंदी या
सदृश परिस्थिती बघता ऑटो मोबाईल क्षेत्रातील अनेक नोकऱ्या देखील धोक्यात असून. आंतरराष्ट्रीय बाजार पेठेवर देखील याचे परिणाम दिसतील. भारत हे जगातील दुसऱ्या क्रमांकवरील ऑटो मोबाईल उत्पादक देश आहे.त्या मुळे याचा थेट परिणाम ऑटोमोबाईल पार्टस चा निर्यातीवर होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली

बाईट- आशिष काळे, अध्यक्ष,विदर्भ ऑटोबाईल डीलर्स असोसिएशन(वादा)


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.