नागपूर - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर पाकिस्तानला धडा शिवण्यासाठी भारताने पाकिस्तानवर थेट हल्ला करावा, अशी भावना जनमानसात निर्माण झाली होती. जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करत आज भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला आहे.
भारतीय वायुसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हजार किलोचा बॉम्ब फेकला आहे.
हवाई हल्ल्यातून भारताने नापाक अशा दशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला अद्दल घडवली, असल्याचे मत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधीने केलीली बातचीत करून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.