नागपूर - होळीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा घेतलेल्या गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने धुळवडीच्या दिवशी मंगळवारी सकाळी ग्राम स्वच्छता फेरी काढण्यात आली. मोठ्या प्रमाणात नागरिक पांढरे कपडे परिधान करून या स्वच्छता फेरीत सहभागी झाले होते.
हेही वाचा - होळीच्या उत्साहापुढे कोरोनाची दहशत शून्य; होळीत कोरोना विषाणूचे दहन
नागपूरच्या विश्वकर्मा नगर परिसरातून या फेरीला सुरूवात झाली. रंगांचा वापर न करता पांढरे कपडे परिधान करून नागरिक या फेरीत सहभागी झाले होते. फेरीच्या मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती. भजन व कीर्तनाच्या माध्यमातून तुकडोजी महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहचवण्याचे कार्य यामध्यमातून गेल्या 50 वर्षांपासून करण्यात येत आहे.