ETV Bharat / state

पावसावर ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम; पावसाळ्याचे दिवसही घटले?

author img

By

Published : Jun 15, 2019, 5:24 PM IST

पूर्वी पाऊस सतत तीन-चार दिवस पडायचा. पण गेल्या काही वर्षांत वातावरणात मोठे बदल झाले आहे. तापमान वाढले असून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या आठ-दहा वर्षांतली आकडेवारी पाहिली असता, देशात पावसाचे असमान वितरण वाढले आहे. यंदाही हवामान विभागाने महाराष्ट्रात सरासरी इतका पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे यंदाचा अंदाजही चुकणार का ? असा प्रश्न पुढे आला आहे.

पावसावर ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम

नागपूर- ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमानात बदल घडत आहे. यामुळे पावसाच्या आगमनातही बदल होत आहे. सोबतच, हवामान विभागाचेही अंदाज चुकत असल्याने त्याचा थेट फटका शेतकऱयांना बसत आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून हवामान विभागाचे अंदाज चुकत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे यंदाही पुन्हा मॉन्सून धोका देणार का? अशी संभ्रमावस्था शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

हवामानाबद्दल माहिती देतांना मोहनलाल शाहू, संचालक, हवामान विभाग, नागपूर


पूर्वी पाऊस सतत तीन-चार दिवस पडायचा. पण गेल्या काही वर्षांत वातावरणात मोठे बदल झाले आहे. तापमान वाढले असून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या आठ-दहा वर्षांतली आकडेवारी पाहिली असता, देशात पावसाचे असमान वितरण वाढले आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी खुप पाऊस, तर काही किलोमीटर अंतरावर पावसाचा एक थेंबही नसल्याचे चित्र आहे. कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ अशी परिस्थिती आहे. त्यातच हवामान विभागाने जेव्हा जेव्हा सरासरी पावसाचा अंदाज वर्तवला, तेव्हा पाऊस कमी प्रमाणात पडला.


खालील वर्षात विदर्भात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडलाय


वर्ष पावसाची टक्केवारी
२०१४ - १४ कमी पाऊस
२०१५ - ११ टक्के कमी पाऊस
२०१७ - २३ टक्के कमी पाऊस

ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामुळे पावसाळा कमी झालाय?

अ.क्र वर्ष पावसाची टक्केवारी
२०१४ १४ कमी पाऊस
२०१५ ११ टक्के कमी पाऊस
२०१७ २३ टक्के कमी पाऊस


ग्लोबल वॉर्मिंगचा पर्यावरणाला मोठा धोका आहे. याचे चटके आता सोसावे लागत आहे. गेल्या काही वर्षांत ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. याचा परिणाम परजन्यमानावरही पडत आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पावसाचे एकूण दिवसंही कमी झाल्याने त्याचा फटका राज्यातल्या शेतकऱ्यांना बसत आहे.


देशात पावसाचे प्रमाण कमी झाल्याची बाब हवामान विभागानेही मान्य केली आहे. दरवर्षी चुकलेला हवामानाच्या अंदाजाचा इतिहास आहे. असे असताना, यंदाही हवामान विभागाने महाराष्ट्रात सरासरी इतका पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे यंदाचा अंदाजही चुकणार का ? असा प्रश्न पुढे आला आहे.

नागपूर- ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमानात बदल घडत आहे. यामुळे पावसाच्या आगमनातही बदल होत आहे. सोबतच, हवामान विभागाचेही अंदाज चुकत असल्याने त्याचा थेट फटका शेतकऱयांना बसत आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून हवामान विभागाचे अंदाज चुकत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे यंदाही पुन्हा मॉन्सून धोका देणार का? अशी संभ्रमावस्था शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

हवामानाबद्दल माहिती देतांना मोहनलाल शाहू, संचालक, हवामान विभाग, नागपूर


पूर्वी पाऊस सतत तीन-चार दिवस पडायचा. पण गेल्या काही वर्षांत वातावरणात मोठे बदल झाले आहे. तापमान वाढले असून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या आठ-दहा वर्षांतली आकडेवारी पाहिली असता, देशात पावसाचे असमान वितरण वाढले आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी खुप पाऊस, तर काही किलोमीटर अंतरावर पावसाचा एक थेंबही नसल्याचे चित्र आहे. कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ अशी परिस्थिती आहे. त्यातच हवामान विभागाने जेव्हा जेव्हा सरासरी पावसाचा अंदाज वर्तवला, तेव्हा पाऊस कमी प्रमाणात पडला.


खालील वर्षात विदर्भात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडलाय


वर्ष पावसाची टक्केवारी
२०१४ - १४ कमी पाऊस
२०१५ - ११ टक्के कमी पाऊस
२०१७ - २३ टक्के कमी पाऊस

ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामुळे पावसाळा कमी झालाय?

अ.क्र वर्ष पावसाची टक्केवारी
२०१४ १४ कमी पाऊस
२०१५ ११ टक्के कमी पाऊस
२०१७ २३ टक्के कमी पाऊस


ग्लोबल वॉर्मिंगचा पर्यावरणाला मोठा धोका आहे. याचे चटके आता सोसावे लागत आहे. गेल्या काही वर्षांत ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. याचा परिणाम परजन्यमानावरही पडत आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पावसाचे एकूण दिवसंही कमी झाल्याने त्याचा फटका राज्यातल्या शेतकऱ्यांना बसत आहे.


देशात पावसाचे प्रमाण कमी झाल्याची बाब हवामान विभागानेही मान्य केली आहे. दरवर्षी चुकलेला हवामानाच्या अंदाजाचा इतिहास आहे. असे असताना, यंदाही हवामान विभागाने महाराष्ट्रात सरासरी इतका पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे यंदाचा अंदाजही चुकणार का ? असा प्रश्न पुढे आला आहे.

Intro:पावसाचा अंदाज चुकतो मॉन्सून यंदाही धोका देणार का?

ग्लोबल वॉर्मिंगचा पावसावर परिणाम पावसाचे दिवसंही कमी झालेत?


पूर्वी पाऊस सतत तीन-चार दिवस पडायचा... पण गेल्या काही वर्षांत वातावरणात मोठे बदल झालेय, तापमान वाढलं, आणि पावसाचं प्रमाण कमी झालं.गेल्या आठ-दहा वर्षांतली आकडेवारी बघीतली तर देशात पावसाचं असमान वितरण
वाढलंय, म्हणजे एका ठिकाणी खुप पाऊस पडला, तर काही किलोमिटर अंतरावर पावसाचा एक थेंबही नसते.कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ अशी परिस्थिती आहे हवामान विभागाने जेव्हा जेव्हा सरासरी पावसाचा अंदाज वर्तवलाय, तेव्हा पाऊस कमी पडला गेल्या सात-आठ वर्षांपासून हवामान विभागाचे अंदाज चुकतात त्यामुळे यंदाही पुन्हा मॉन्सून धोका देणार अशी संभ्रमावस्था आहे विभागाचा सरासरी पावसाचा अंदाज पुन्हा चुकीचा सिद्ध होणार का प्रश्न आहेBody:खालील वर्षात विदर्भात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडलाय

वर्ष पाऊसाची टक्केवारी
२०१४ १४% कमी पाऊस
२०१५ ११ टक्के कमी पाऊस
२०१७ २३ टक्के कमी पाऊस


ग्लोबल वॉर्मिगचा मोठा धोका आहे, याचे चटके आता सोसावे लागतायत. गेल्या काही वर्षांत तापमानात मोठी वाढ झालीय. आणि पावसाचं प्रमाण कमी झालंय. पावसाचे एकूण दिवसंही कमी झालेत त्याचा राज्यातल्या शेतकऱ्यांना बसतोय. देशात
पावसाचं प्रमाण कमी झाल्याची बाब हवामान विभागंही मान्य करतोय. दरवर्षी चुकलेला हवामानाचा अंदाजाचा इतिहास आहे असं असतानाही यंदाही हवामान विभागानं महाराष्ट्रात सरासरी इतका पाऊस पडेल असा अंदाज
वर्तवलाय.

बाईट- मोहनलाल शाहू, संचालक, हमावाम विभाग, नागपूर
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.