ETV Bharat / state

'परमबीर सिंग पत्र प्रकरणाची चौकशी सेवानिवृत्त महासंचालकांकडे द्यावी'

author img

By

Published : Mar 21, 2021, 3:01 PM IST

Updated : Mar 21, 2021, 5:02 PM IST

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शनिवारी (दि. 20 मार्च) मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गृहमंत्र्यांनी 100 कोटी रुपयांचे महिन्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप माजी पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. त्यानंतर भाजप आक्रमक झाली असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

Devendra Fadanvis
देवेंद्र फडणवीस

नागपूर - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शनिवारी (दि. 20 मार्च) मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गृहमंत्र्यांनी 100 कोटी रुपयांचे महिन्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप माजी पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. त्यानंतर भाजप आक्रमक झाली असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर जो आरोप केला तो पहिल्यांदा झालेला नाही. यापूर्वीही पोलीस महासंचालक पदावर असतांना पोलीस विभागातील बदल्यांसाठी बदल्यांचे प्रकरणात सुबोधकुमार जयस्वाल यांनी एक अहवाल तयार करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. तो अहवाल मुख्यमंत्र्यांकडून गृहमंत्र्यांकडे गेला. त्यानंतर काहीच कारवाई झालाी नाही. अखेर त्यांनी सुबोधकुमार जयस्वाल सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याला सेवानिवृत्तीचे दोन वर्षे राहिले असताना केंद्राच्या सेवेत निघून गेले. त्यानंतर रश्मी शुक्ला यांनीही अहवाल दिला पण काही झाले नाही.

...तर राज्यावर ही वेळ आली नसती

परमबीर यांनी त्यांच्या बदलीनंतर गृहमंत्र्यांवर आरोप केले. मात्र, हे पहिल्यांदा लागलेले आरोप नाही. तसेच हे चॅट त्यांची बदली होण्यापूर्वीचे आहे. त्यामुळे ते नाकारून चालणार नाही. सुबोधकुमार जयस्वाल आणि रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरून कारवाई झाली असती तर राज्यावर ही वेळ आली नसल्याचेही फडणवीस म्हणाले.या अहवालानंतर पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी तेव्हा काही फोन सर्विलेन्सवर लावले होते असेही ते म्हणालेत. यातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली होती. मात्र, काहीच करवाईन न झाल्याने त्या सुद्धा केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर निघून गेले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवार यांच्या बद्दल काही म्हणायचे नाही, कारण ते सरकारचे निर्माते आहे. ते आपल्या सरकारवर लगलले आरोप फेटाळून लावतीलच. सेवानिवृत्त महासंचाकलाकडे चौकशी द्यावी, असेही ते म्हणाले. मात्र ही चौकशी फक्त वाझे यांची होणार की गृहमंत्र्यांचीही होणार आहे, असा सवालही उपस्थित केला. तसेच चौकशी होणार असेल तर दहा पंधरा वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेला एक अधिकारी ही चौकशी करू शकतो का? त्यांना ते अधिकार आहेत का? आणि ते गृहमंत्री पदावर असताना खरोखर त्यांची निष्पक्ष चौकशी करू शकतील का? याचे उत्तर शरद पवार यांनी दिले नाही.

तोपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे आंदोलन सुरू राहील

महाराष्ट्राच्या प्रतिमेला बसलेल्या धक्क्याबद्दल कारवाई होत नाही. तोपर्यंत भाजपचे आंदोलन सुरू राहील, असे भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आदेश दिला आहे. यासोबत वाझे या प्रकरणात आलिशान गाड्या मागील सहा महिन्यात कोण-कोण वापरत होते याचीही चौकशी एनआयए यांनी केली पाहिजे, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : 'या' अधिकाऱ्यांमुळे गोत्यात आलं महाविकास आघाडी सरकार!

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून देशभरात खळबळ माजवणारे परमबीर सिंग कोण आहेत?

नागपूर - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शनिवारी (दि. 20 मार्च) मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गृहमंत्र्यांनी 100 कोटी रुपयांचे महिन्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप माजी पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. त्यानंतर भाजप आक्रमक झाली असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर जो आरोप केला तो पहिल्यांदा झालेला नाही. यापूर्वीही पोलीस महासंचालक पदावर असतांना पोलीस विभागातील बदल्यांसाठी बदल्यांचे प्रकरणात सुबोधकुमार जयस्वाल यांनी एक अहवाल तयार करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. तो अहवाल मुख्यमंत्र्यांकडून गृहमंत्र्यांकडे गेला. त्यानंतर काहीच कारवाई झालाी नाही. अखेर त्यांनी सुबोधकुमार जयस्वाल सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याला सेवानिवृत्तीचे दोन वर्षे राहिले असताना केंद्राच्या सेवेत निघून गेले. त्यानंतर रश्मी शुक्ला यांनीही अहवाल दिला पण काही झाले नाही.

...तर राज्यावर ही वेळ आली नसती

परमबीर यांनी त्यांच्या बदलीनंतर गृहमंत्र्यांवर आरोप केले. मात्र, हे पहिल्यांदा लागलेले आरोप नाही. तसेच हे चॅट त्यांची बदली होण्यापूर्वीचे आहे. त्यामुळे ते नाकारून चालणार नाही. सुबोधकुमार जयस्वाल आणि रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरून कारवाई झाली असती तर राज्यावर ही वेळ आली नसल्याचेही फडणवीस म्हणाले.या अहवालानंतर पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी तेव्हा काही फोन सर्विलेन्सवर लावले होते असेही ते म्हणालेत. यातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली होती. मात्र, काहीच करवाईन न झाल्याने त्या सुद्धा केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर निघून गेले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवार यांच्या बद्दल काही म्हणायचे नाही, कारण ते सरकारचे निर्माते आहे. ते आपल्या सरकारवर लगलले आरोप फेटाळून लावतीलच. सेवानिवृत्त महासंचाकलाकडे चौकशी द्यावी, असेही ते म्हणाले. मात्र ही चौकशी फक्त वाझे यांची होणार की गृहमंत्र्यांचीही होणार आहे, असा सवालही उपस्थित केला. तसेच चौकशी होणार असेल तर दहा पंधरा वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेला एक अधिकारी ही चौकशी करू शकतो का? त्यांना ते अधिकार आहेत का? आणि ते गृहमंत्री पदावर असताना खरोखर त्यांची निष्पक्ष चौकशी करू शकतील का? याचे उत्तर शरद पवार यांनी दिले नाही.

तोपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे आंदोलन सुरू राहील

महाराष्ट्राच्या प्रतिमेला बसलेल्या धक्क्याबद्दल कारवाई होत नाही. तोपर्यंत भाजपचे आंदोलन सुरू राहील, असे भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आदेश दिला आहे. यासोबत वाझे या प्रकरणात आलिशान गाड्या मागील सहा महिन्यात कोण-कोण वापरत होते याचीही चौकशी एनआयए यांनी केली पाहिजे, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : 'या' अधिकाऱ्यांमुळे गोत्यात आलं महाविकास आघाडी सरकार!

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून देशभरात खळबळ माजवणारे परमबीर सिंग कोण आहेत?

Last Updated : Mar 21, 2021, 5:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.