ETV Bharat / state

Water Channel Leakage : मुलुंड जकात नाक्याजवळील जलवाहिनीच्या गळतीचे १५ तास आधीच काम पूर्ण - water channel leakage

मुंबईत रस्त्याच्या कामाच्यावेळी रात्री जलवाहिनी फुटली होती. मात्र ही जलवाहिनी विक्रमी वेळेत पहाटेच दुरुस्त करण्यात आली. त्यामुळे हजारो लीटर पाणी वाचले. तसेच लोकांचाही त्रास वाचला आहे.

water channel leakage
water channel leakage
author img

By

Published : Mar 29, 2023, 5:54 PM IST

मुंबई - शहरातील मुलुंड जकात नाका येथे रस्ते विकास महामंडळाच्या कामादरम्यान पालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला हानी पोहचली होती. या जलवाहीनीच्या दुरूस्तीचे काम पालिकेने हाती घेतले होते. हे काम पालिकेने १५ तास आधी विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे. नागरिकांनी या कालावधीत केलेल्या सहकार्यामुळे पालिकेने नागरिकांचे आभार मानले आहेत. दरम्यान येत्या ३१ मार्चपासून ठाणे येथील कामाच्या निमित्ताने ३० दिवस १५ टक्के पाणी कपात केली जाणार आहे.

जलवाहिनीला हानी - मुलुंड जकात नाका येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ द्वारे पर्जन्य जलवाहिनीसाठी बॉक्स कर्ल्व्हटचे काम सुरु होते. हे काम करण्यासाठी पालिकेने २७ मार्च ते २९ मार्च या दरम्यान १५ टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली होती. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम दिवस रात्र सुरु होते. हे काम करण्यासाठी महापालिकेने विविध विभागाची पथके तयार केली होती. त्याची एकूणच आपत्कालीन विभागाची टीम तयार केली होती. त्यामध्ये १२ अभियंते, ३० कर्मचारी यांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली होती.

जलवाहिनीतून गळती झालेल्या पाण्यातच हे दुरूस्तीचे काम चालले. सलग ३६ तास काम करून आज सकाळी पहाटे ५ वाजता हे काम पूर्ण झाले. या कामासाठी 15 तास लागतील असा जल विभागाच्या इंजिनियर्सनी अंदाज केला होता. मात्र सुमारे १५ तास लवकर हे काम पूर्ण करण्यात आले. आज सकाळीच लवकर हे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. पुढील ३० दिवस पाणीकपात - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ठाणे येथे खोदकाम करताना हानी पोहचली होती. या जलवाहिनीतून मुंबईला ६५ टक्के पाणी पुरवठा होतो. हा पाणी पुरवठा पर्यायी जलवाहिनीतून करून दुरुस्तीचे काम ३१ मार्चपासून सुरु केले जाणार आहे. या कामासाठी पुढील ३० दिवस मुंबईमध्ये १५ टक्के पाणी कपात लागू राहणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

हेही वाचा - Pawan Khera Attacked on Gov : मोदी सरकार डरपोक, अदानी घोटाळ्याची चौकशी करण्यास घाबरते : कॉंग्रेस नेते पवन खेरा यांचा घणाघात

मुंबई - शहरातील मुलुंड जकात नाका येथे रस्ते विकास महामंडळाच्या कामादरम्यान पालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला हानी पोहचली होती. या जलवाहीनीच्या दुरूस्तीचे काम पालिकेने हाती घेतले होते. हे काम पालिकेने १५ तास आधी विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे. नागरिकांनी या कालावधीत केलेल्या सहकार्यामुळे पालिकेने नागरिकांचे आभार मानले आहेत. दरम्यान येत्या ३१ मार्चपासून ठाणे येथील कामाच्या निमित्ताने ३० दिवस १५ टक्के पाणी कपात केली जाणार आहे.

जलवाहिनीला हानी - मुलुंड जकात नाका येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ द्वारे पर्जन्य जलवाहिनीसाठी बॉक्स कर्ल्व्हटचे काम सुरु होते. हे काम करण्यासाठी पालिकेने २७ मार्च ते २९ मार्च या दरम्यान १५ टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली होती. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम दिवस रात्र सुरु होते. हे काम करण्यासाठी महापालिकेने विविध विभागाची पथके तयार केली होती. त्याची एकूणच आपत्कालीन विभागाची टीम तयार केली होती. त्यामध्ये १२ अभियंते, ३० कर्मचारी यांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली होती.

जलवाहिनीतून गळती झालेल्या पाण्यातच हे दुरूस्तीचे काम चालले. सलग ३६ तास काम करून आज सकाळी पहाटे ५ वाजता हे काम पूर्ण झाले. या कामासाठी 15 तास लागतील असा जल विभागाच्या इंजिनियर्सनी अंदाज केला होता. मात्र सुमारे १५ तास लवकर हे काम पूर्ण करण्यात आले. आज सकाळीच लवकर हे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. पुढील ३० दिवस पाणीकपात - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ठाणे येथे खोदकाम करताना हानी पोहचली होती. या जलवाहिनीतून मुंबईला ६५ टक्के पाणी पुरवठा होतो. हा पाणी पुरवठा पर्यायी जलवाहिनीतून करून दुरुस्तीचे काम ३१ मार्चपासून सुरु केले जाणार आहे. या कामासाठी पुढील ३० दिवस मुंबईमध्ये १५ टक्के पाणी कपात लागू राहणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

हेही वाचा - Pawan Khera Attacked on Gov : मोदी सरकार डरपोक, अदानी घोटाळ्याची चौकशी करण्यास घाबरते : कॉंग्रेस नेते पवन खेरा यांचा घणाघात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.