ETV Bharat / state

'देवाला एकदाच रिटायर्ड करून टाकायला हवं' असं डॉ. लागू का म्हणाले होते?

author img

By

Published : Dec 18, 2019, 7:35 AM IST

देवाला रिटायर्ड करायची वेळ आली आहे, असा विचार डॉ. श्रीराम लागू यांनी त्यांच्या एका लेखातून मांडला होता.

डॉ. श्रीराम लागू
डॉ. श्रीराम लागू

मुंबई - देवाला रिटायर्ड करायची वेळ आली आहे, असा विचार डॉ. श्रीराम लागू यांनी त्यांच्या एका लेखातून मांडला होता. दैववादावर अवलंबून न राहता माणसाने कायम प्रयत्नवादावर अवलंबून रहायला हवं, असं त्यांचं मत होतं. मात्र, लोक देवावर अवलंबून राहून त्याच्या नादी लागून स्वतःच नुकसान करून घेतात, अशी भूमिका त्यांनी आपल्या या लेखातून मांडली होती.

हेही वाचा - 'मराठी रंभूमीला सुवर्ण काळात आणणाऱ्या दिग्गजांपैकी डॉ. लागू हे एक'

पेशाने डॉक्टर असलेले श्रीराम लागू हे विचारांनी नास्तिक होते. दैववादावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. देवाच्या नावाने केल्या जाणाऱ्या कर्मकांडाच्या ते ठाम विरोधात होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचे ते खंदे पुरस्कर्ते होते. अनेकदा त्यांनी समाजातील चुकीच्या चालीरितिच्या विरोधात आपली भूमिका मांडली. आपल्या लेखातून त्यांनी देवाला आता रिटायर्ड करायची वेळ आली आहे, अशी भूमिका मांडल्यानंतर त्यावर त्यांना विरोधाचा सामनाही करावा लागला. मात्र, त्याने ते आपल्या मतापासून कधीही विचलित झाले नाहीत.

हेही वाचा - नाट्यसृष्टीतील धगधगत पर्व शांत झाल - किरण यज्ञोपवीत

माणूस हा सध्या दैववादाच्या जास्तीत जास्त आहारी जायला लागला असून बुवाबाजी करणारे बाबा आणि बुवा त्याचा गैरफायदा घेत आहेत. हे टाळण्यासाठी तरुणांना दैववादापेक्षा प्रयत्नवादाकडे वळवायला हवं असं त्यांचं मत होतं. भारतीय समाज अशिक्षित आणि अडाणी असल्याने त्यांच्या मानगुटीवरून बुवाबाजीचं भूत दूर होणं खरच फार अवघड आहे याची डॉक्टरांना पूर्ण कल्पना होती. मात्र, सुशिक्षित लोकं जेव्हा बुवाबाजी आणि कर्मकांडाच्या नादी लागतात ते अत्यंत चुकीचं असल्याचं मत त्यांनी आपल्या या लेखातून मांडलं होतं.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अनेक कार्यक्रमाला डॉ. लागू आवर्जून उपस्थित रहायचे. त्यातूनच त्यांचं मत देवाला एकदाच रिटायर्ड करायला हवं या मताशी ठाम झालं होतं.

मुंबई - देवाला रिटायर्ड करायची वेळ आली आहे, असा विचार डॉ. श्रीराम लागू यांनी त्यांच्या एका लेखातून मांडला होता. दैववादावर अवलंबून न राहता माणसाने कायम प्रयत्नवादावर अवलंबून रहायला हवं, असं त्यांचं मत होतं. मात्र, लोक देवावर अवलंबून राहून त्याच्या नादी लागून स्वतःच नुकसान करून घेतात, अशी भूमिका त्यांनी आपल्या या लेखातून मांडली होती.

हेही वाचा - 'मराठी रंभूमीला सुवर्ण काळात आणणाऱ्या दिग्गजांपैकी डॉ. लागू हे एक'

पेशाने डॉक्टर असलेले श्रीराम लागू हे विचारांनी नास्तिक होते. दैववादावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. देवाच्या नावाने केल्या जाणाऱ्या कर्मकांडाच्या ते ठाम विरोधात होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचे ते खंदे पुरस्कर्ते होते. अनेकदा त्यांनी समाजातील चुकीच्या चालीरितिच्या विरोधात आपली भूमिका मांडली. आपल्या लेखातून त्यांनी देवाला आता रिटायर्ड करायची वेळ आली आहे, अशी भूमिका मांडल्यानंतर त्यावर त्यांना विरोधाचा सामनाही करावा लागला. मात्र, त्याने ते आपल्या मतापासून कधीही विचलित झाले नाहीत.

हेही वाचा - नाट्यसृष्टीतील धगधगत पर्व शांत झाल - किरण यज्ञोपवीत

माणूस हा सध्या दैववादाच्या जास्तीत जास्त आहारी जायला लागला असून बुवाबाजी करणारे बाबा आणि बुवा त्याचा गैरफायदा घेत आहेत. हे टाळण्यासाठी तरुणांना दैववादापेक्षा प्रयत्नवादाकडे वळवायला हवं असं त्यांचं मत होतं. भारतीय समाज अशिक्षित आणि अडाणी असल्याने त्यांच्या मानगुटीवरून बुवाबाजीचं भूत दूर होणं खरच फार अवघड आहे याची डॉक्टरांना पूर्ण कल्पना होती. मात्र, सुशिक्षित लोकं जेव्हा बुवाबाजी आणि कर्मकांडाच्या नादी लागतात ते अत्यंत चुकीचं असल्याचं मत त्यांनी आपल्या या लेखातून मांडलं होतं.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अनेक कार्यक्रमाला डॉ. लागू आवर्जून उपस्थित रहायचे. त्यातूनच त्यांचं मत देवाला एकदाच रिटायर्ड करायला हवं या मताशी ठाम झालं होतं.

Intro:देवाला रिटायर्ड करायची वेळ आली आहे असा विचार डॉ. श्रीराम लागू यांनी त्यांच्या एका लेखातून मांडला होता. दैववादावर अवलंबून न राहता माणसाने कायम प्रयत्नवादावर अवलंबून रहायला हवं असं त्यांचं मत होतं. मात्र लोक देवावर अवलंबून राहुन त्याच्या नादी लागून स्वतःच नुकसान करून घेतात अशी भूमिका त्यांनी आपल्या या लेखातून मांडली होती.

पेशाने डॉक्टर असलेले श्रीराम लागू हे विचारांनी नास्तिक होते. दैववादावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. देवाच्या नावाने केल्या जाणाऱ्या कर्मकांडाच्या ते ठाम विरोधात होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचे ते खंदे पुरस्कर्ते होते. अनेकदा त्यांनी समाजातील चुकीच्या चालीरितिच्या विरोधात आपली भूमिका मांडली. आपल्या लेखातून त्यांनी देवाला आता रिटायर्ड करायची वेळ आली आहे अशी भूमिका मांडल्यानंतर त्यावर त्याना विरोधाचा सामनाही करावा लागला. मात्र त्याने ते आपल्या मतापासून कधीही विचलित झाले नाहीत.

माणूस हा सध्या दैववादाच्या जास्तीत जास्त आहारी जायला लागला असून बुवाबाजी करणारे बाबा आणि बुवा त्याचा गैरफायदा घेत आहेत. हे टाळण्यासाठी तरुणांना दैववादापेक्षा प्रयत्नवादाकडे वळवायला हवं असं त्यांचं मत होतं. भारतीय समाज अशिक्षित आणि अडाणी असल्याने त्यांच्या मानगुटीवरन बुवाबाजीच भूत दूर होणं खरच फार अवघड आहे याची डॉक्टराना पूर्ण कल्पना होती. मात्र सुशिक्षित लोकं जेव्हा बुवाबाजी आणि कर्मकांडाच्या नादी लागतात ते अत्यन्त चुकीचं असल्याचं मत त्यांनी आपल्या या लेखातून माडल होतं.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अनेक कार्यक्रमाला डॉ. आवर्जून उपस्थित रहात असत. त्यातूनच त्यांचं मत देवाला एकदाच रिटायर्ड करायला हवं या मताशी ठाम झालं होतं. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.