ETV Bharat / state

'..तर मुख्यमंत्र्याच्या गादीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही'

author img

By

Published : Feb 8, 2020, 10:36 PM IST

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन ठाकरे राज्य करतात त्यांना शिवजयंतीची तारीख मान्य नाही. शिवजयंतीची १९ फेब्रुवारी तारीख मान्य नसल्यास मुख्यमंत्र्यांना गादीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली.

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे
शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे

मुंबई - सर्वत्र 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी केली जाते. मात्र, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्य करतात त्यांना ही तारीख मान्य नाही. शिवजयंतीची १९ फेब्रुवारी तारीख मान्य नसल्यास मुख्यमंत्र्यांना गादीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांची दुटप्पी भूमिका या महाराष्ट्रात चालू देणार नाही, अशी टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली. शिवसंग्राम पक्षाच्या 18 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्र्याच्या गादीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही


हे दुटप्पी सरकार पडले पाहिजे आणि समाजाला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आपल्याला काम करायचे आहे. सरकारला सत्तेत येऊन तीन महिने झाले, तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत दहा मिनिटे बोलायला महाविकास आघाडी सरकारला वेळ मिळाला नाही. मराठा आरक्षणाच्या कागदपत्रांचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले नाही म्हणून सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली नाही. एकीकडे आश्वासन द्यायचे आणि दुसरीकडे त्याकडे लक्षही द्यायचे नाही, असा प्रकार या सरकारने चालवला असल्याचे मेटे म्हणाले.

हेही वाचा - 'मैदान सोडून पळणारा मी नाही; सरकार येत नाही तोपर्यत कुठेही जाणार नाही'

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी दोन लाखांची घोषणा केली. त्याची पूर्तता अजूनही झालेली नाही. त्यामुळे जनतेच्या विकासासाठी यापुढे आम्ही भाजप सोबत राहणार आहोत, असे मेटे यांनी सांगितले.

मुंबई - सर्वत्र 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी केली जाते. मात्र, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्य करतात त्यांना ही तारीख मान्य नाही. शिवजयंतीची १९ फेब्रुवारी तारीख मान्य नसल्यास मुख्यमंत्र्यांना गादीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांची दुटप्पी भूमिका या महाराष्ट्रात चालू देणार नाही, अशी टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली. शिवसंग्राम पक्षाच्या 18 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्र्याच्या गादीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही


हे दुटप्पी सरकार पडले पाहिजे आणि समाजाला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आपल्याला काम करायचे आहे. सरकारला सत्तेत येऊन तीन महिने झाले, तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत दहा मिनिटे बोलायला महाविकास आघाडी सरकारला वेळ मिळाला नाही. मराठा आरक्षणाच्या कागदपत्रांचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले नाही म्हणून सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली नाही. एकीकडे आश्वासन द्यायचे आणि दुसरीकडे त्याकडे लक्षही द्यायचे नाही, असा प्रकार या सरकारने चालवला असल्याचे मेटे म्हणाले.

हेही वाचा - 'मैदान सोडून पळणारा मी नाही; सरकार येत नाही तोपर्यत कुठेही जाणार नाही'

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी दोन लाखांची घोषणा केली. त्याची पूर्तता अजूनही झालेली नाही. त्यामुळे जनतेच्या विकासासाठी यापुढे आम्ही भाजप सोबत राहणार आहोत, असे मेटे यांनी सांगितले.

Intro:मुंबई
सर्वत्र 19 फेब्रुवारी शिवजयंती ची तारीख असून शिवजयंती साजरी केली जाते. मात्र जे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन राज्य करतात त्यांना ही तारीख मान्य नाही. शिवजयंती तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून साजरी करावी लागेल किंवा पक्ष म्हणून साजरी करावी लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुमचं खरं रूप कोणतं आहे. १९ फेब्रुवारी तारीख मान्य करा अन्यथा तुम्हाला त्या गादीवर बसायचं नैतिक अधिकार नाही. दुटप्पी भूमिका आम्ही या महाराष्ट्रात चालू देणार नाही. असे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सांगितले. ते त्यांच्या पक्षाच्या 18 व्या वर्धापनदिनी कार्यक्रमात बोलत होते.

Body:जनतेच्या प्रश्नासाठी 1995 साली काँग्रेसची साथ सोडली आणि सेने भाजप सोबत आलो त्यानंतर २०१४ साली पुन्हा तुमच्या सोबत आलो. जो सोय करेल तो सोयरा म्हणून देवेंद्रजी तुम्ही आमचे सोयरे आहात. हे सरकार पडलं पाहिजे आणि समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपल्याला काम करायचं आहे. तुम्हाला तीन महिने झाले तरी छत्रपतीशिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत दहा मिनिटं काढायला महाविकास आघाडी सरकारला वेळ मिळाला नाही. इंगर्जी मध्ये भाषांतर केलं नाही म्हणून सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली नाही. दुटप्पीपणा करण्याचं वागणं या सरकारचे सुरु आहे. कर्जमुक्ती कुठे गेली दोन लाखाची घोषणा करण्यात आली .आता 15 फेब्रुवारी तारीख काढली आहे कोणता ज्योतिषी पाहिला हे माहित नाहीये. गेली पाच वर्षे आमच संघटनेकडे दुर्लक्ष झालं. भाजपसोबत आमची साथ आहे आणि यापुढे देखील आमची साथ भाजप सोबत राहील. बेरोजगार तरुणांना हाताला काम द्या नाहीतर ५ हजार बेरोजगार भत्ता द्या असे मेटे यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.