ETV Bharat / state

'नाहीतर लक्ष्मण मानेंवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करू'

लक्ष्मण माने यांनी थेट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरोप करून पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला असल्याचे डॉ. अंजरिया म्हणाले.

author img

By

Published : Jul 6, 2019, 8:10 PM IST

Updated : Jul 6, 2019, 9:13 PM IST

पत्रकारपरिषदेत बोलताना डॉ. अंजरिया

मुंबई - बहुजन वंचित आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वळचणीला गेले असल्याचा आरोप करणाऱ्या लक्ष्मण माने यांनी आठ दिवसात बाळासाहेब आंबेडकरांचे माफी मागावी. असे न केल्यास अब्रुनुकसानीचा खटला दाखल करून पक्षांतर्गत कारवाई करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे महासचिव डॉ. अंजरिया यांनी दिला आहे. शहरात आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

पत्रकारपरिषदेत बोलताना डॉ. अंजरिया

लक्ष्मण माने यांनी थेट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरोप करून पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. पडळकर आणि डॉ. अन्सारी यांच्यावरील आरोपाचा ८ दिवसात खुलासा करावा. असे न केल्यास थेट अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. त्याशिवाय पक्षांतर्गत शिस्तभंग केल्याप्रकरणी पक्षनेतृत्व लक्ष्मण मानेंवर कारवाई करेल, असा इशारा डॉ. अंजरिया यांनी दिला.

वंचित आघाडीने लोकसभा निवडणुकीत ४२ लाख मते घेऊन राजकीय अस्तित्व दाखवून दिले. त्यानंतर गेल्या आठवड्यातच वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला ४० विधानसभा जागांचीची ऑफर दिली आहे. याबाबत काँग्रेसने ८ दिवसात सांगितले नाहीतर 288 विधानसभा जागांवर उमेदवार उभे केले जातील, असा अल्टिमेटम देखील त्यांनी यावेळी दिला.

गोपीचंद पडळकर हे वंचित आघाडीमध्ये आघाडीवर आहेत. त्याचाच राग धरून लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकर, गोपीचंद पडळकर आणि डॉक्टर अन्सारी यांच्यावर आरोप केल्याचे अंजरीया म्हणाले. भविष्यात वंचितची ताकद वाढत असून आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे जास्तीच्या जागा निवडून वंचित आघाडी आपली राजकीय ताकद दाखवून देईल, असेही ते म्हणाले.

मुंबई - बहुजन वंचित आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वळचणीला गेले असल्याचा आरोप करणाऱ्या लक्ष्मण माने यांनी आठ दिवसात बाळासाहेब आंबेडकरांचे माफी मागावी. असे न केल्यास अब्रुनुकसानीचा खटला दाखल करून पक्षांतर्गत कारवाई करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे महासचिव डॉ. अंजरिया यांनी दिला आहे. शहरात आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

पत्रकारपरिषदेत बोलताना डॉ. अंजरिया

लक्ष्मण माने यांनी थेट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरोप करून पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. पडळकर आणि डॉ. अन्सारी यांच्यावरील आरोपाचा ८ दिवसात खुलासा करावा. असे न केल्यास थेट अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. त्याशिवाय पक्षांतर्गत शिस्तभंग केल्याप्रकरणी पक्षनेतृत्व लक्ष्मण मानेंवर कारवाई करेल, असा इशारा डॉ. अंजरिया यांनी दिला.

वंचित आघाडीने लोकसभा निवडणुकीत ४२ लाख मते घेऊन राजकीय अस्तित्व दाखवून दिले. त्यानंतर गेल्या आठवड्यातच वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला ४० विधानसभा जागांचीची ऑफर दिली आहे. याबाबत काँग्रेसने ८ दिवसात सांगितले नाहीतर 288 विधानसभा जागांवर उमेदवार उभे केले जातील, असा अल्टिमेटम देखील त्यांनी यावेळी दिला.

गोपीचंद पडळकर हे वंचित आघाडीमध्ये आघाडीवर आहेत. त्याचाच राग धरून लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकर, गोपीचंद पडळकर आणि डॉक्टर अन्सारी यांच्यावर आरोप केल्याचे अंजरीया म्हणाले. भविष्यात वंचितची ताकद वाढत असून आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे जास्तीच्या जागा निवडून वंचित आघाडी आपली राजकीय ताकद दाखवून देईल, असेही ते म्हणाले.

Intro:mh_mum01_dranjaria_pc_laxmanmane_vis_7204684


Body:
Marathi and Urdu byte attached
लक्ष्मण माने माफी मागा अन्यथा परिणामांना सामोरे जा ...
वंचितचा लक्ष्मण मानेनंवर पलटवार
मुंबई:
बहुजन वंचित आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वळचणीला गेले असल्याचा आरोप करून बंडाचे निशाण उभारणारे लक्ष्मण माने यांनी आठ दिवसात बाळासाहेब आंबेडकरांचे माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करून पक्षांतर्गत कारवाई करू असा इशारा बहुजन वंचित आघाडी ने दिला आहे.
बहुजन वंचित आघाडीचे महासचिव डॉ. अंजरिया यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत लक्ष्मण माननीयांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत लक्ष्मण मानेची कोणीतरी दिशाभूल करत असल्याचा आरोप केला बहुजन वंचित आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर आणि माझ्या पूर्वाश्रमीचे राजकीय पक्ष आणि कार्य जोडून लक्ष्मण माने दिशाभूल करत असल्याचे
डॉ.अंजरिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.जनता त्याला पासून सुरू केलेले राजकीय कारकीर्द काँग्रेस राष्ट्रवादी अशी झाल्याचे सांगत संबंधित पक्षांनी दिलेल्या राजकीय संधी आणि सहकार्याची कृतज्ञता याबाबत कागदपत्रे त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केली .लक्ष्मण माने यांनी थेट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर आरोप करून पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केले याबाबत त्यांनी तातडीने जाहीर माफी मागण्याची गरज आहे पडळकर आणि डॉ.अंजरिया
यांच्यावरील आरोपाच्या आठ दिवसात खुलासा न केल्यास थेट अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. त्याशिवाय पक्षांतर्गत शिस्तभंग केल्याप्रकरणी पक्षनेतृत्व लक्ष्मण मानेंवर कारवाई करेल असा इशारा डॉ.अंजरिया यांनी दिला. लोकसभा निवडणुकीत 42 लाख मते घेऊन राजकीय अस्तित्वच दाखवून दिल्यानंतर मागील आठवड्यातच बहुजन वंचित आघाडी ने काँग्रेसला चाळीस विधानसभा जागांची
ची ऑफर दिली आहे. याबाबत आठ दिवसात खुलासा न केल्यास 288 विधानसभा जागांवर उमेदवार उभे केले जातील असा अल्टिमेटम बहुजन वंचित आघाडी ने दिला आहे. गोपीचंद पडळकर हे वंचित आघाडी मध्ये आघाडी आघाडीवर असून ह्याचाच राग धरून लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकर गोपीचंद पडळकर आणि डॉक्टर अन्सारी या यांच्यावर आरोप केल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात वंचित ची ताकद वाढत असून आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे जास्तीच्या जागा निवडून वंचित आघाडी आपली राजकीय ताकद दाखवून देईल असेही, अंजरिया यांनी शेवटी सांगितले.



Conclusion:
Last Updated : Jul 6, 2019, 9:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.